महाराष्ट्र

नंदुरबार : जिल्ह्यातील चार आगारातील २३ कर्मचारी निलंबित

नंदुरबार : जिल्ह्यातील चार आगारातील २३ कर्मचारी निलंबित

दिनू गावित

नंदुरबार : जिल्ह्यात ३ नोव्हेंबर मध्यरात्रीपासून संप पुकारून काम बंद आंदोलनात सहभागी झालेल्या २३ एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. (Nandurbar-news-23-st-employees-suspended-in-four-depots-in-the-district)

राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी राज्यात विविध ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने समिती नेमण्याबाबत अधिसूचना काढूनही एसटी संघटनांनी संप मागे घेतला नाही. अखेर एसटी महामंडळाच्या विभागीय पातळीवरून गुरुवारी कारवाईचा बडगा उगारत नंदुरबार जिल्ह्यातील ४ आगारांतील २३ कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे.

चारही आगारातील कर्मचारींचा समावेश

निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये नंदुरबार बस आगारातील ५ तर शहादा आगारातील ६, नवापूर आगारातील ५ तर अक्कलकुवा आगारातील ७ जणांचा समावेश आहे. राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. ग्रामीण भागातील विशेषतः गाव - खेड्यातील प्रवासीवर्ग प्रवासासाठी एसटीवरच अवलंबून आहे. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे; यासह अन्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या आंदोलनामुळे एसटीच्या जिल्ह्यातील ४ आगारांमधील वाहतूक यामुळे पूर्णपणे ठप्प झाली आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT