Devendra Fadnavis Latest news saam tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात 33000 'फेक मतदार'? कुणी केला गंभीर आरोप? वाचा सविस्तर

Devendra Fadnavis Latest news : देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात 33000 'फेक मतदार' असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते प्रफुल गुडदे यांनी केला आहे.

Vishal Gangurde

पराग ढोबळे, साम टीव्ही

नागपूर : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या काळात मतदारानंतर तब्बल ७६ लाख मते अचानक वाढल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला जात आहे. मतदानानंतर ७६ लाख मते वाढल्याचं प्रकरण कोर्टातही पोहोचलं आहे. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसने या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. ७६ लाख मतांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं असताना काँग्रेसचे प्रफुल गुडदे यांनी गंभीर आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात 33000 'फेक मतदार' असल्याचा दावा प्रफुल गुडदे यांनी केला आहे.

राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 'मॅच फिक्सिंग' असल्याचा गंभीर आरोप केला होता. राहुल गांधी यांच्या आरोपावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील नोंदणीकृत मतदारांच्या संख्येवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. २०२४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या पाच महिन्यात म्हणजे विधानसभा निवडणुकीत नोंदणीकृत मतदारांची संख्या ४१ लाख इतकी वाढल्याचा दावा केला होता. अवघ्या पाच महिन्यात इतके मतदार कसे वाढल्याचा सवाल राहुल गांधी यांनी केला होता. राहुल गांधी यांच्या आरोपानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधात पराभूत उमेदवार प्रफुल गुडधे यांनी गंभीर आरोप केला आहे.

काँग्रेसचे पराभूत उमेदवार प्रफुल गुडधे यांनी गंभीर आरोप करताना म्हटलं की, 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या मतदारसंघांमध्ये पाच महिन्याच्या कालावधीमध्ये ३३ हजार मतदार वाढले. यामध्ये विशेष म्हणजे मतदार नोंदविताना बीएलोकडून पत्ते प्रमाणित केली जाणारी प्रक्रिया कायदेशीररित्या पार पडली गेली नाही. त्यामुळे ही निवडणूक रद्द करण्यात यावी. तसेच यासंदर्भात आमची एक याचिका नागपूर खंडपीठातही प्रलंबित आहे. त्यामध्ये सुद्धा अनेक नियमात बदल करण्यात आला आहे'.

७६ लाख मते रहस्यमयरित्या वाढल्याचा वंचितचा आरोप

मुंबई उच्च न्यायालयात महाराष्ट्र २०२४ विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी ६ वाजल्यानंतर अचानक वाढलेल्या ७६ लाख मतांबाबत सोमवारी सुनावणी पार पडली. या याबाबत चेतन अहिरे यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. कोर्टात चेतन अहिरे यांची बाजू ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बाजू मांडली. या सुनावणीदरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी आपली बाजू कोर्टात मांडली. प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीही निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'राष्ट्रवादीचं विलीनीकरण भाजपच्या अटींवर'; सुनील तटकरेंनी सांगितलं गुपित?

Nishikant Dubey: मोदी हे भाजपची मजबुरी; नरेंद्र मोदींशिवाय भाजप 150 जागाही जिंकणार नाही; खासदाराच्या विधानानं खळबळ

Maharashtra Live News Update: आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीसांची हॉटेलमध्ये भेट, अर्धा तास गुप्त चर्चा?

Maharashtra Politcis : हिंदीसक्तीवरुन भाजप-मनसेत जुंपली; राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना चॅलेंज, VIDEO

Hindi Marathi Language Controversy : 'दुबे मुंबई आओ, डुबो डुबो कर मारेंगे'; दुबे विरुद्ध राज ठाकरे वाद आणखी पेटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT