Nagpur Crime News
Nagpur Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime: पत्‍नीने पतीला जीवे मारले; डोके आपटून आत्‍महत्‍या केल्‍याचा बनाव

मंगेश मोहिते

नागपूर : दारूच्या नशेत असलेल्या नवऱ्याने स्वतःचे डोके शिलाई मशीनवर आपटून आत्महत्या केली. असा बनाव रचलेल्या पत्नीचा पोस्टमार्टममध्ये भांडाफोड (Crime) झाला. यानंतर सदर महिला तुरुंगात पोहोचली आहे. (Nagpur Crime News)

नागपूरच्या (Nagpur) कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या वाजपेयीनगरमध्ये ही घटना उघडकीस आली आहे. मृतक ग्याणी यादव सोबत आरोपी राणीचे १८ वर्षापूर्वी लग्न (Marriage) झाले होते. मात्र कुठलाही कामधंदा न करता दारू पिऊन येत ग्यानी घरी गोंधळ घालत होता. त्यामुळे मुलांवर देखील त्याचा परिणाम होत असल्याने संतापलेल्या पत्नीने त्याची गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो यशस्वी झाला नाही. तर राणीने रॉडने डोक्यावर मारून त्याची हत्या केली.

अन्‌ सत्‍य आले समोर

नवरा रोज रात्री दारु पिऊन येतो आणि घरात गोंधळ घालतो. याला वैतागलेल्या बायकोने नवऱ्याने शिलाई मशीनवर डोके आपटून आत्महत्या (Suicide) केल्याचा बनाव रचला. हत्या केल्यानंतर नवऱ्याने शिलाई मशीनवर डोके आपटून आत्महत्या केल्याची माहिती परिसरात दिली. पोलिसांनी (Police) देखील त्याची नोंद घेतली. मात्र शवविच्छेदन अहवालात सत्य समोर आल्याने पोलिसांनी आरोपी पत्नी राणीला ताब्यात घेतले आहे. पत्नी शिलाईचे काम करून घर चालवायची. मात्र ग्यानीच्या वागण्याने संतप्त झालेल्या राणीने नवऱ्याचा काटा तर काढला पण आता वडील नाही आणि आई तुरुंगात गेल्यामुळे त्यांचे मुल मात्र उघड्यावर पडले आहेत. कलमना पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT