Nagar : अण्णा हजारे हे एक आदर्शवत महान व्यक्तिमत्व : राज्यपाल  सचिन आगरवाल
महाराष्ट्र

Nagar : अण्णा हजारे हे एक आदर्शवत महान व्यक्तिमत्व : राज्यपाल

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आदर्शगाव हिवरेबाजार नंतर राळेगणसिद्धी गावाला देखील भेट दिली. यावेळी त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भेट घेतली.

सचिन आगरवाल

अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे एक आदर्शवत महान व्यक्तित्व आहे. त्यांनी केवळ गावलाच नव्हे तर मला आणि अगदी पंतप्रधानांना सुद्धा वेगवेगळ्या ग्रामविकासाच्या प्रयोगाद्वारे मार्ग दाखवला आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राळेगणसिद्धी मध्ये अण्णांच्या भेटीनंतर ग्रामस्थांशी संवाद साधताना काढले.

हे देखील पहा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आदर्शगाव हिवरेबाजार नंतर राळेगणसिद्धी गावाला देखील भेट दिली. त्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भेट घेतली. अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी गावात केलेले बंधारे आणि पाणलोट क्षेत्राची माहिती दिली. त्याचप्रमाणे गावातील सौरऊर्जा प्रकल्पाची देखील माहिती दिली.

यावेळी बोलताना, अण्णांनी आपल्याला रस्ता दाखवला तर आम्हाला आणि मोदींना देखील रास्ता दाखवत येईल असं मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे राळेगणसिद्धी मध्ये अण्णांनी केलेला सौरऊर्जा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याही संकल्पनेत असल्याचे कोश्यारी यांनी म्हटलं आहे. राळेगणसिद्धी मध्ये ज्याप्रमाणे पाणलोट आणि बंधाऱ्यांचे काम झाले, तसेच इतर राज्यांमध्ये केले तर पाण्याचा प्रश्न सुटेल असा सल्ला अण्णांनी राज्यपालांना दिलाय.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT