Mumbai Nashik Highway Accident Saam Digital
महाराष्ट्र

Mumbai Nashik Highway Accident : मुंबई-नाशिक महामार्गावर विचित्र अपघात; एकमेकांवर आदळल्याने ५ वाहनांचा झाला चुराडा

Sandeep Gawade

मुंबई नाशिक महामार्गावर कसारा घाटत 5 वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. मागून येणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने वाहने एकमेंकांवर आदळल्याने ही दुर्घटना घडली आहे. यात १४ ते १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. कसारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नवीन कसारा घाटत कंटेनर चा ब्रेक फेल झाल्याने नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, नवीन कसारा घाटात धबधबा पॉईंटनजीक मुंबई नाशिक महामार्गावर सहा ते सात वाहनं थांबली होती. यावेळी मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या ट्रेलर चा ब्रेक फेल झाला. त्यातचं घाटात धुकं असल्यामुळे झाल्यामुळे वाहनाचा अंदाज आला नाही आणि तब्बल सहा ते सात वाहनांना धडक दिली. यात जवळपास तीन ते चार जण गंभीर जखमी झाले आहेत तर सात ते आठ जण किरकोळ जखमी झाले आहेत.

सुदैवाने उभ्या असलेल्या वाहनांमधील काही प्रवासी हे त्यांच्या पार्क केलेल्या वाहनांमध्ये नसल्याने मोठा अनर्थ टळला. यामध्ये आतापर्यंत कोणाच्याही जीवितहानीची नोंद नाही, परंतु कसारा घाट परिसरात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनी वाहने रस्त्यात वाहने उभी केलेली होती. या ठिकाणी कोणताही पोलीस सुरक्षा रक्षक तैनात नव्हते. जखमी झालेल्या नागरिकांना तत्काळ इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT