mahavitran 
महाराष्ट्र

पैसे नसल्याने दाेन लाख ७६ हजार ९५० ग्राहकांनी थकविले वीज बिल

विजय पाटील

सांगली : एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे कृष्णा नदीला येणारा महापूर या दुहेरी संकटात सांगलीकर सापडले असल्याने आर्थिक परिस्थिती बिकट बनली असताना आता सांगलीकर जनतेवर वीज बिलाचे संकट काेसळले आहे. वीज बिल भरले नसल्याने महावितरण नागरिकांचे विद्युत कनेक्शन तोडू लागले आहे. पूरेसे पैसे नसल्याने कनेक्शन ताेडू नये असे विनंती करुनही महावितरण mahavitran कारवाई करीत असल्याने सामान्य सांगलीकरांना आता जगायचे कसे असा प्रश्न निर्माण पडला आहे. mseb-mahavitran-appeals-sangli-citizens-to-pay-electricity-bills-marathi-news-sml80

सांगली जिल्ह्यात दाेन लाख ७६ हजार ९५० ग्राहकांचे वीजबिल थकले आहे. या थकबाकीदारांची एकूण रक्कम सुमारे दाेन कोटी २६ लाखांपर्यंत पाेचली आहे. महावितरण सातत्याने ग्राहकांना वीजबिल भरा असे आवाहन करीत आहे. परंतु ग्राहक पैसे भरत नसल्याने महावितरण विद्युत कनेक्शन तोडण्याची कार्यवाही करीत आहे.

गेले दोन वर्षे कोरोना मुळे हाताला काम नाही. होत्या त्या नोकऱ्या काही जणांच्या गेल्या आहेत. जगायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला असताना दुसरीकडे महापुराचा फटका बसला. अनेकांचे अतोनात नुकसान झाले. यातून जिल्हा सावरत असताना आता वीज महावितरण विभागाने वीज बिल भरण्यासाठी तगादा लावला आहे. आम्ही पैसे काेठून आणायचे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करु लागला आहे. सतीश साखळकर, लालू मिस्त्री यांनी विद्युत वितरणने सहकार्य केले पाहिजे अशी मागणी केली.

दरम्यान सांगली जिल्ह्यात नऊ हजार ३१३ ग्राहकांची वीजबिल तोडली आहेत. ज्या ग्राहकांची कनेक्शन तोडले आहे. त्यांनी शेजारच्याकडून वीज कनेक्शन घेतलेले आढळून आले तर त्यांच्यावर फाैजदारी दाखल करु असा इशारा महावितरणने दिला आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stomach cancer: दररोजच्या या ४ सवयी लावाच; पोटाच्या कॅन्सरचा धोका होतो ५० टक्क्यांनी कमी

Maharashtra News Live Update: आत्तापर्यंत महायुती सरकारने मदत केली आहे, जस संकट येईल तशी मदत करणार - मंत्री भरत गोगावले

Suhasini Mulay: सोशल मीडियावरून जुळल्या मनाच्या तारा; ६०व्या वर्षी प्रेमात पडली अभिनेत्री, अवघ्या ७५ दिवसांत बांधली लग्नगाठ

तांदूळ, ज्वारी की बाजरी? डायबिटीजच्या रूग्णांनी कोणती भाकरी खावी?

Cable Stayed Bridge : खुशखबर! ठाणे-नवी मुंबई प्रवास अवघ्या काही मिनिटांत होणार; कोपरी ते पटनीदरम्यान पूल उभारला जाणार, कसा असेल मार्ग?

SCROLL FOR NEXT