Mla Baban Shinde, Ujani Dam, Pandharpur News saam tv
महाराष्ट्र

Mla Baban Shinde News : शेतक-यांचे दोन हजार कोटी रूपयांचे नुकसान हाेणार, आमदार बबन शिंदेंना भीती

भारत नागणे

Ujani Dam News : येत्या काही दिवसात उजनी धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडले नाही तर सोलापूर जिल्ह्यातील शेतक-यांचे सुमारे दोन हजार कोटी रूपयांचे आर्थिक नुकसान होणार आहे. प्रसंगी सोलापूर शहरासाठी टॅंकरने पाणी पुरवठा करा पण उजनीच्या उजवा आणि डाव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडावे अशी मागणी आमदार बबन शिंदे (mla baban shinde) यांनी केली आहे. (Maharashtra News)

सध्या उजनी धरणात उपयुक्त 13 टक्के पाणीसाठा (ujani dam water level) शिल्लक आहे. शेतीसाठी आणि जनावरांसाठी धरणातून कालव्याद्वारे दहा टीएमसी सोडले तरी 50 टीएमसी पाणी शिल्लक राहणार आहे.

सध्या सोलापूर जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने पाठ फिरवल्याने ऊस पिक जळू लागले आहे. धरणातून पाणी सोडले नाही तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे.

सोलापूर शहराला टॅंकरने पाणी पुरवठा करण्यासाठी दोनशे ते अडीचशे कोटी रुपये लागतील तुलनेने शेतक-यांचे होणारे नुकसान मोठे आहे. कालवा समितीच्या बैठकीत पाणी सोडण्यावर सकारात्मक चर्चा होईल असा आशावाद आमदार शिंदे व्यक्त केला. दरम्यान पुणे जिल्ह्यातील धरणातून सध्या तरी उजनीत पाणी सोडण्याची गरज नसल्याचेही आमदार बबन शिंदे यांनी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Rain Alert : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय, मराठवाडा-विदर्भात जोरदार पाऊस होणार; या जिल्ह्यांना अलर्ट

Rashi Bhavishya today : मनातील भावना जोडीदाराला शेअर कराल; तुमची रास यात आहे का?

Horoscope Today : भाग्य फळफळणारा आजचा दिवस, मामाच्या संमिश्र गोष्टी कानावर येतील; तुमच्या नशिबात काय लिहिलंय? वाचा

Dombivli Politics : मंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच विरोधात बॅनरबाजी, प्रकरण थेट पोलिसांत पोहोचलं

Mumbai Crime : पार्किंगवरून भांडण, महिलेकडून विनयभंगाच्या गुन्ह्याची धमकी; भीतीपोटी वृद्धाने संपवले आयुष्य

SCROLL FOR NEXT