आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या लासलगावसह जिल्ह्यातील प्रमुख कांदा बाजार समित्यांमध्ये जानेवारी महिन्यात लाल कांद्याची बंपर आवक झाल्याने कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण झाली केवळ जानेवारी महिन्यात तब्बल 35 लाख क्विंटल लाल कांद्याची आवक झाल्याची नोंद लासलगाव सह जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये झाली आहे, देशांतर्गत तसेच परदेशी बाजारातील मागणीच्या तुलनेत कांद्याची आवक प्रचंड वाढल्याने बाजारात पुरवठ्याचा ताण निर्माण झाला.
सावंतवाडी शहरातील वनविभागाच्या कार्यालयासमोरील एका जुन्या गोदामाला मध्यरात्री भीषण आग लागली. भरवस्ती लगत असलेल्या या गोदामात लागलेल्या आगीच्या ज्वाळा आणि आतील वस्तूंच्या स्फोटांच्या आवाजांमुळे नागरिक भयभीत झाले होते. वारंवार फोन करून आणि माहिती देऊनही सावंतवाडी पालिकेचा अग्निशमन बंब आला नव्हता. अखेर वेंगुर्ला नगरपरिषदचा अग्निशमन बंब सावंतवाडीत दाखल झाला. या प्रकाराबाबत सावंतवाडीतील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. थोड्या वेळाने कुडाळ नगरपंचायत अग्निशमन दाखल झाले. त्यानंतर रात्री ३.०० वाजता आग विझवण्यात यश आले.
कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या मातंग वसाहतीमध्ये किरकोळ कारणावरून तरुणांच्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली... या हाणामारी मध्ये काठ्या आणि तलवारीचाही वापर केल्यामुळे परिसरात भीतीच वातावरण निर्माण झालं होतं.. या हाणामारीत तीन ते चार जण किरकोळ जखमी झाले आहेत शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या हाणामारीचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आल आहे... याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी देखील दाखल करण्याचं काम शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होतं..
मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तावडे या रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील विल्ये गावच्या सासरवाशीण आहेत. त्यामुळे देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेची सूत्रे आता राजापूरच्या सूनेच्या हातात असणार आहेत. त्यामुळे समस्त विल्ये ग्रामस्थ व राजापूरवासीयांसाठी ही अभिमानाची बाब असणार आहे. महापौरपदी त्यांची निवड जाहीर झाल्यानंतर गावातील मंडळींकडूनही आनंद व्यक्त करण्यात आला.
अहिल्यानगर शहरातल्या बालिकाश्रम रोडवरील ढोरवस्ती जवळ भीषण अपघात..
भरधाव इनोव्हाकारने 4 पॅगो रिक्षा, एक मोटर सायकल आणि एका घराचे केले नुकसान..
मध्यरात्री 2.30 वाजता घडली घटना..
या अपघातात वाहनांचं झालं मोठ्या प्रमाणावर नुकसान तर घराची भिंतही पडली..
सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही..
इनोव्हाकार चालक शुभम पेवाल याच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..
नवी मुंबई मधील सीबीडी बेलापूर मधील सेक्टर ८,९ मध्ये बिबट्याचे दर्शन झाले
रात्री बिबट्या दिसल्याने अनेकांच्या मनात धडकी भरल्या दिसून येत आहे
नवी मुंबईत बिबट्या अनेकवेळा दिसल्याने पूर्ण परिसरात भीतीचे वातावरण
हा व्हिडिओ सोशल मीडियातून वायरल होत आहे
नागपूरच्या मेडिकल कॉलेजमदज्ये मध्ये सिकल सेल वेलनेस हब बनणार
राज्यातील हे पहिलेच केंद्र आहे निदान, उपचारा सोबत तिथे संशोधन सुद्धा केलं जाणार आहे.
नागपूर जिल्ह्यात सिकलसेलचे दीड हजार रुग्ण आहेत
विदर्भ आणि मध्य भारताच्या सीमेवरून सिकलसेल रुग्णांच्या वेदनांना आता विज्ञानाची आणि मायेची फुंकर मिळणार आहे
नागपूर मेडिकल मध्ये सिकलसेल वेलनेस हबच्या रूपाने एक नवे वरदान उभे राहिले आहे
या केंद्रातून सोमवारपासून सिकलसेलग्रस्तांना एका छताखाली निदान आणि उपचारासोबत संशोधनही होणार आहे...
अमरावती जिल्ह्यातील ५६ जलप्रकल्पांत सध्या ७९.६६ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध.
गतवर्षी याच कालावधीत पाणीसाठा सुमारे ८४ टक्के होता.
यंदा पाणीसाठ्यात जवळपास १३ टक्क्यांची झाली घट.
ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात ७०.६१ टक्के पाणीसाठा शिल्लक.
सहा मध्यम प्रकल्पांमध्ये मिळून ५६.२४ टक्के साठा उपलब्ध.
४२ लघु प्रकल्पांमध्ये केवळ ४८.९९ टक्के पाणी उरले.
पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्यास उन्हाळ्यात टंचाईची शक्यता.
नियोजनबद्ध पाणी वापराचे प्रशासनाकडून आवाहन होण्याची गरज.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मानले मतदारांचे आभार
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदान करणाऱ्या मतदारांचे सुनेत्रा पवार यांनी मानले आभार
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मानले आभार
अजित दादांचे विचार व कार्य अधिक सक्षमपणे पुढे जात असल्याचा वर्तवला विश्वास
राज्यात नगरपालिका आणि महानगरपालिका मधील यशाप्रमाणेच जिल्हा परिषदा निवडणुकीमध्ये देखील महायुतीला यश मिळेल..
राज्यातल्या निवडणुका सुरू असलेल्या जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता बसेल असा विश्वास भाजपच्या केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी व्यक्त केला आहे
नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा परफॉर्मन्स हा चांगला राहिला आहे...
त्यानुसार आता जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये देखील महायुतीचे सत्ता येईल असा विश्वास केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी व्यक्त केला आहे.
पुणे जिल्ह्यातील सर्वात कमी मतदान बारामती तालुक्यात
अजित दादांच्या निधनानंतर बारामतीकरांनी मतदान करणं टाळलं
बारामतीच्या निवडणुकीवर दुःखाची चादर
बारामती मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ५४ टक्के मतदान
पुणे जिल्ह्यात सरासरी ६९ टक्के मतदान
पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत सरासरी ६९ टक्के मतदान झाल्याची जिल्हा प्रशासनाची माहिती
पुणे जिल्ह्यातील वेल्हे या ठिकाणी सर्वाधिक ७९ टक्के मतदान
भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांचा आज तेलंगणा राज्यात निवडणुकीसाठी रोड-शो आणि जनसंवाद सभा..
तेलंगणामध्ये सुरू असलेल्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आज चार ठिकाणी नवनीत राणा यांचा रोड शो..
तेलंगणामध्ये प्रचार सभेला जाऊन नवनीत राणा एमआयएम चे खासदार असरुद्दीन ओवीसींवर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष.
तेलंगणा राज्यातील निर्मल आणि नारायण पेठ जिल्ह्यामध्ये नवनीत राणांचे रोड शो.
विंचूर-प्रकाशा महामार्ग वरील मध्यरेलच्या लासलगाव रेल्वे स्टेशन जवळील गेट क्रमांक 105 येथील कामानिमित्त 7, 8 आणि 9 फेब्रुवारी दरम्यान रात्री दहा ते सकाळी आठ वाजेपर्यंत असे तीन दिवस रेल्वे गेट रात्रीच्या दरम्यान 10 तास बंद राहणार असल्याने गुजरात राजस्थान येथून दक्षिण भारतात जाणारी व दक्षिण भारतातून येणाऱ्या अवजड वाहनधारकांची गैरसोय होऊ नये म्हणून वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा अशा सूचना वाहनधारकांना रेल्वे विभागाच्या वतीने प्रसिद्धी पत्रक जाहीर करत देण्यात आले आहे
रब्बी हंगामात मोठ्या आशेने लावलेल्या टरबूज आणि खरबूज या वेलवर्गीय पिकांवर यंदा मधमाशांची संख्या घटल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.परागीकरणासाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या मधमाशा शेतात दिसत नसल्यामुळे फळांची 'सेटिंग' होत नाहीये, परिणामी उत्पादनात मोठी घट होण्याची भीती निर्माण झाली आहे. काही शेतकरी तर हतबल होऊन आपले उभे टरबूज पीक मोडण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.टरबूज आणि खरबूज या पिकांमध्ये नर आणि मादी फुले वेगवेगळी असतात. मधमाशी जेव्हा एका फुलावरून दुसऱ्या फुलावर बसते, तेव्हाच परागीकरण होऊन फळ धारणा होते. सध्या या परिसरात मोठ्या प्रमाणात वेलवर्गीय पिकांची लागवड झाली आहे, परंतु कीटकनाशकांचा अतिवापर किंवा बदलत्या वातावरणामुळे मधमाश्यांचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे.मधमाशांशिवाय फळाची संख्या वाढणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य असल्याने बागा फुलांनी बहरलेल्या असल्या तरी फळे दिसत नाहीत.
बैलगाडा शर्यत बंदीविरोधात झालेल्या या आंदोलनात दोन माजी खासदार, एक माजी मंत्री आणि सात आमदारांसह सुमारे ३५०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आंदोलकांमध्ये माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, आमदार महेश लांडगे, दिवंगत माजी आमदार सुरेश गोरे, आमदार शरद सोनवणे, माजी मंत्री बाळा भेगडे, खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार दिलीप मोहिते, माजी आमदार दिगंबर भेगडे आणि देवराम लांडे यांचा समावेश होता.चाकण येथे सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत हे रास्तारोको आंदोलन पार पडले होते. आंदोलनादरम्यान चिथावणीखोर भाषण आणि तब्बल तीन तास रास्ता अडवल्याचा आरोप पोलिसांनी केला होता. मात्र, आठ साक्षीदारांची साक्ष नोंदवल्यानंतर न्यायालयाने सबळ पुरावे आढळले नाहीत, असा निष्कर्ष काढत सर्व आरोपींना निर्दोष मुक्तता दिली आहे.
पुणे महापौर निवड सोमवारी, समित्यांचा फैसला १३ तारखेला
पुणे महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक उद्या सकाळी ११ वाजता महापालिकेच्या मुख्य सभगृहात पार पडणार
त्यानंतर पुढील काही दिवसात स्थायी समिती अध्यक्षांसह अन्य समित्यांच्या अध्यक्षांची निवडणूक होणार
पुणे महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक ही भाजपच्या मंजूषा नागपुरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शितल सावंत आणि काँग्रेच्या अश्विनी लांडगे यांच्यात होत आहे
तर उपमहापौर पदाची निवडणूक रिपाइचे परशुराम वाडेकर, राष्ट्रवादीचे दत्ता बहिरट आणि काँग्रेसचे साहिल केदारी यांच्यात होणार
उद्या फक्त महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक होईल
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकी साठी काल सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया सुरू असतानाच नाधवडे येथील एका मतदान केंद्रावर दुपारी गोंधळाची घटना घडली... बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, या मागणीसाठी शिवसेना उबाठा गटाच्या ग्राहक सेनेचे जिल्हाप्रमुख जयवंत वायदंडे यांनी मतदान केल्यानंतर ईव्हीएम मशीन जमिनीवर आपटून निवडणूक आयोगासह शासन आणि निवडणूक विभागाचा निषेध व्यक्त केला. या प्रकारामुळे मतदान केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले...जयवंत वायदंडे यांनी निवडणूक प्रक्रिये संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याची चर्चा होती. त्यामुळे त्याच्या हालचालीवर बारीक लक्ष होते. साडेतीनच्या सुमारास मतदान केल्यानंतर जयवंत वायदंडे यांनी ईव्हीएम मशीन जमीनीवर जोरात आपटले. अचानक केलेल्या या कृतीमुळे मतदान केंद्रावर उपस्थित मतदारांमध्ये गोंधळ उडाला...घटनेची माहिती मिळताच बंदोबस्तावर असलेले पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपनिरीक्षक योगेश गोरे यांनी संबंधित व्यक्तीस ताब्यात घेतले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर काही वेळातच मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीतपणे सुरू करण्यात आली. जयवंत वायदंडे याच्यावर कारवाईची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती...
नंदुरबार शहरात बनावट जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र तयार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून हे रॅकेट सुरू असल्याचा आरोप भाजपच्या माजी खासदार हीना गावित यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून यामागील मुख्य सूत्रधार शोधावा, अशी मागणी माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी केली आहे. कोणाच्या आशीर्वादाशिवाय एवढे मोठे रॅकेट सुरू राहू शकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच मागील काळात नगरपालिकेत कार्यरत असलेल्या संबंधित व्यक्तींचीही चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात यंदाची महाशिवरात्री शिवभक्तांविना साजरी होणार आहे भिमाशंकर मंदिर तीन महिन्यांसाठी बंद रहाणार असुन महाशिवरात्रीच्या कालावधीत मंदिर सुरु ठेवण्यात येणार होते मात्र भाविकांच्या सुरक्षेसाठी महाशिवरात्री काळात म्हणजेच १२ ते १८ फेब्रुवारी दरम्यान मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद राहणार आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.