भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सुंदरटोला येथे एका ३० वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. महेंद्र इनवाते असे मृत तरुणाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र हा गेल्या काही दिवसांपासून एका दीर्घकालीन आजाराने त्रस्त होता. या आजारपणामुळे तो अत्यंत नैराश्यात होता. अखेर या आजाराला आणि वेदनेला कंटाळून त्याने आपले जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला.या घटनेमुळे सुंदरटोला परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच गोबरवाही पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.
महाशिवरात्रीनिमित्त श्रीक्षेत्र रामेश्वरम येथे यावेळी भाविकांनी महादेवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. मंदिर हे सकाळपासूनच भाविकांसाठी खुल करण्यात आलं होतं .या मंदिराची आख्यायिका अशी आहे की प्रभू श्रीराम व सीता माता हे वनवासात जात असताना यावेळी प्रभू श्रीराम व सीतामाता यांनी या दोन स्वयंभू शिवलिंगाची स्थापना केली आहे अशी या मंदिराची आख्यायिका असून तापी अंजनी गिरणा या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगम या ठिकाणी असून या वेळी महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी मोठी दर्शनासाठी या मंदिरात गर्दी केली होती
धाराशिवच्या उमरगा शहरात ऐतिहासिक महादेव मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात येत आहे.पहाटेपासूनच विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.‘हर हर महादेव’च्या घोषणांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला असून सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. पहाटे मंगळआरतीनंतर अभिषेक, रुद्राभिषेक आणि विशेष पूजाविधी पार पडले.महाशिवरात्री निमित्त धार्मिक वातावरण निर्माण झाले असून भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा संगम पाहायला मिळत आहे.प्रशासनाकडून सुरक्षेची काळजी घेतली जात असून सण शांततेत आणि आनंदात पार पडावा यासाठी सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत.
नागरिकांना सरकारी खाजगी नोकरी तसेच प्रदेशात जाण्यासाठी आवश्यक असलेल्या पासपोर्टसाठीच्या चरित्र पडताळणी प्रक्रियेचा कालावधी 30 दिवस निश्चित केला आहे मात्र अर्जाची वाढती संख्या निवडणुका सण उत्सवातील बंदोबस्त आणि तांत्रिक अडचणीमुळे काही प्रकरणे प्रलंबित राहत असल्याची माहिती समोर आली आहे. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे सादर केल्यास या पुढील काळात चारित्र्य पडताळणी पंधरा दिवसांत करण्याचा प्रयत्न राहणार आहे.
श्री देव कुणकेश्वर मंदिरामध्ये यावर्षी प्रथम पूजेचा मान सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर आणि सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांना देण्यात आला. मध्यरात्री जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे व आमदार दिपक केसरकर यांच्याहस्ते शासकीय पुजा संपन्न झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. कुणकेश्वरला दक्षिण कोकणची काशी म्हणून मानलं जातं कोकणच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाची पर्वणी असल्याचे दिपक केसरकर यांनी सांगितलेय
आकाशात उडणारे हेलिकॉप्टर अनेकांनी पाहिलेले असते; पण त्यात बसण्याचा अनुभव प्रत्येकाला मिळत नाही.ओय फाउंडेशन आणि महालक्ष्मी एव्हिएशन यांनी दिव्यांग मुलांसाठी असा क्षण साकारला, ज्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे तेज खुलले. ओवायई फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. सिमरन जेठवानी यांच्या पुढाकाराने व महालक्ष्मी एव्हिएशनचे नितीन गोते, कॅप्टन नितीन वेल्डे यांच्या सहकार्याने ३५ मुलांना सहा मिनिटांची हेलिकॉप्टर सफर घडवून आणण्यात आली.
सांगलीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कुस्त्यांचे मैदान पार पडले आहे.. सांगलीतल्या कृष्णा नदीच्या काठावर सह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आलं होतं.. यावेळी 100 हून अधिक छोट्या-मोठ्या निकाली कुस्त्या यावेळी पार पडल्या. यामध्ये भारत विरुद्ध इराण अशी कुस्ती सर्वात लक्षवेधी ठरली.. महाराष्ट्राच्या पैलवान सुबोध पाटील विरुद्ध इराणचा जलाल यांच्यात कुस्ती पार पडली.. तर माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या हस्ते ही कुस्ती लावण्यात आली.. मात्र थरारक कुस्ती बरोबरीत सुटली.. त्यामुळे दोघांनाही विजय घोषित करण्यात आलं. या कुस्त्या पाहण्यासाठी कृष्णा काठी कुस्ती शौकीनाणी तोबा गर्दी केली होती..
आज महाशिवरात्री उत्सवास महाडमध्ये उत्साहात प्रारंभ झाला. महाडचे ग्राम दैवत श्री विरेश्वर महाराज मंदीर, महाकालेश्वर मंदीर, दादली येथील बाराजोर्तिंलींग मंदीरामध्ये सकाळ पासुनच भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. आभिषेक, विधीवत पुजाविधींचे शिव मंदीरांमध्ये आयोजन करण्यात आले. आज पासून महाडचे ग्रामदैवत असलेल्या श्री वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवास प्रारंभ होत आहे. पुढे पाच दिवस चालणाऱ्या या छबिना उत्सवाला शिवकालिन परंपरा आहे.
महाशिवरात्रीनिमित्त देशभरातील शिव मंदिरांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिरात मध्यरात्रीपासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सपत्नीक औंढा नागनाथ मंदिरात शासकीय महापूजा करत प्रभू शिवशंकराला दुग्धाभिषेक केला तर यंदाच्या वर्षी प्रथमच जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून औंढा नागनाथ मध्ये ड्रोन कॅमेराद्वारे शिवमंदिराच्या परिसरात लेझर शो दाखवण्याचा संकल्प केला आहे.
अंबरनाथचं हे प्राचीन शिवमंदिर तब्बल ९६६ वर्ष जुनं असून एक जागृत देवस्थान म्हणून त्याची ख्याती आहे. त्यामुळेच दरवर्षी महाशिवरात्रीला ५ ते ६ लाख भाविक शिवमंदिरात येत असतात. यानिमित्ताने अंबरनाथ शहरात ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी जत्राही भरते. यासाठी प्राचीन शिवमंदिराचे परंपरागत पुजारी पाटील कुटुंब आणि पोलीस, तसंच अंबरनाथ नगरपालिका यांच्याकडून चोख नियोजन केलं जातं.
राज अपार्टमेंट, रविकिरण सोसायटी, जय भारत स्कूलजवळ, चेडा नगर, सागाव – डोंबिवली पूर्व येथे पहाटे 4.15 वाजताच्या सुमारास पार्किंगमध्ये अचानक आग
बेसमेंटमधील मोटरसायकल पार्किंगला लागलेल्या आगीत एकूण 29 दुचाकी जळून खाक
आगीचा भडका उडाल्याने पाच जण किरकोळ जखमी, काहींना ऑप्टिलाईट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल
बीडच्या परळी येथे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभुवैद्यनाथा चा महाशिवरात्रीनिमित्त दर्शन योग साधण्यासाठी लाखो भाविक दाखल झाले आहेत... पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी गर्दी वाढत असून जय शिवशंभूचा गजर परिसरात निनादत आहे... आज दिवसभरात लाखो भाविक या ठिकाणी दर्शन घेणार असून या सर्व भाविकांसाठीच्या सुविधा मंदिर संस्थांकडून उपलब्ध करून देण्यात आले आहेत याबरोबरच पोलीस प्रशासनाकडून देखील शहरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.. मंदिर परिसरात विविध सेवाभावी संस्थांकडून उपवासाचे पदार्थ देखील वाटप केले जात असून रात्री उशिरापर्यंत दर्शन रांगा सुरू राहतील अशी माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली.
बीडमध्ये महाशिवरात्रीनिमित्त मध्यरात्रीपासून शिवालय दर्शनासाठी गजबजली आहे. बीड मधील कंकालेश्वर या प्राचीन हेमाडपंती मंदिरात मध्यरात्रीपासून दर्शन आणि अभिषेक सुरू आहे. तर पहाटे भाविकांच्या उपस्थितीत महापूजा पार पडली. कंकालेश्वर मंदिर साधारणपणे १२ व्या शतकात चालुक्य किंवा यादव काळातील असावे असा अंदाज वर्तवला जातो. भगवान शंकरांनी 'कंकासुर' नावाच्या राक्षसाचा वध येथे केला होता. अशी पौराणिक कथा आहे. तर हे मंदिर एका मोठ्या सरोवराच्या मध्यभागी बांधलेले आहे. मंदिरापर्यंत जाण्यासाठी एक अरुंद पूल आहे. मंदिराचे बांधकाम काळ्या पाषाणात असून त्यावर अत्यंत कोरीव काम केलेले आहे. हे हेमाडपंती स्थापत्यशैलीचे उत्तम उदाहरण आहे. कंकालेश्वर बीड शहराचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते. यावर्षी मंदिरावरील आकर्षक विद्युत रोषणाई लक्ष वेधून घेत आहे.
हिंगोली शहरात एका वेडसर व्यक्तीला मुलं पकडणाऱ्या टोळीतील सदस्य समजून जमावाने मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे, हिंगोली बस स्थानकाच्या पाठीमागील भाग असलेल्या मस्तानशाह नगर मध्ये ही घटना घडली आहे मात्र पोलिसांच्या चौकशी मध्ये हा व्यक्ती वेडसर असल्याचे स्पष्ट झाले असून तो लहान चिमुकल्या सोबत खेळत असल्याने नागरिकांना संशय आला असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे दरम्यान या घटने प्रकरणी हिंगोली शहर पोलिसांनी नोंद केली आहे.
अजून सुद्धा मी सांगतो माझ्या नादाला लागला तर ठाणे जिल्ह्यातील त्यांचं जे अस्तित्व आहे फक्त परवानगी मिळाली पाहिजे. एकनाथ शिंदे यांची एकही महापालिका येऊ देणार नाही तसेच एकनाथ शिंदे यांची पुत्र असलेले श्रीकांत शिंदे यांना कायमचा माजी खासदार करायला लावला लागेल, असे एकनाथ शिंदे
पुणे जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत महाशिवरात्रीची शासकीय महापूजा पार पडली. मात्र, भिमाशंकर विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या मंदिराच्या दुरुस्ती आणि सुशोभीकरण कामांमुळे मंदिर भाविकांसाठी तीन महिने बंद ठेवण्यात आले असून, यंदा महाशिवरात्रीचा उत्सव भाविकांविना पार पडलाय
डहाणूकारांचे धवल लक्ष्मी हे कासव अडीच हजार किलोमीटरचा सागरी प्रवास करत ओमान देशाच्या समुद्रात पोहोचले आहे. ऑलिव्ह रीडले या प्रजातीच्या मादी कासवाच्या पाठीवर सॅटॅलाइट टॅग लावल्यामुळे कासवाच्या जीवन पद्धतीच्या अभ्यासाला गती मिळत आहे. डहाणू जवळच्या समुद्रातून वीस नंबर पासून प्रवासाला निघालेल्या या मादी कासवाने आत्तापर्यंत साधारण 2500 किलोमीटरचा समुद्र प्रवास केला आहे या प्रवासात ते समुद्रात अडीचशे मीटर खोलीपर्यंत देखील जाऊन आले आहे सध्या ते ओमानच्या 212 सागरी मैल समुद्री कक्षेत आहे .कांदळवन कक्षाने भारतीय वन्य जीव संस्थेच्या सहकार्याने आणि वाईल्ड लाईफ कंजर्वेशन अँड ऍनिमल वेल्फेअर वाईल्ड लाईफच्या मदतीने या कासवाच्या पाठीवर टॅग लावल्याने डहाणू ते ओमान पर्यंत या कासवाचा सागरी प्रवास झाल्याचे आता निष्पन्न झाले आहे.
पालघर _ मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहनांना आग लागल्यानंतर डहाणू, पालघर , वसई विरार येथील अग्निशमना दलाला प्राचारण करावे लागते. मात्र अग्निशामकल दल पोहोचेपर्यंत वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.त्यामुळे महामार्गावर अग्निशमन तैनात करण्याची मागणी सातत्याने होत आहे. मात्र नियमात बसत नसल्याचे कारण देत महामार्ग प्राधिकरण नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याने प्रवासी वर्ग तसेच नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गेल्या काही वर्षात वाहनांची वर्दळ वाढली आहे. चालत्या गाडीला आग लग्नाच्या घटना कमालीने वाढल्या आहेत. तीन ते चार वर्षात महामार्गावर जवळपास 300 ते 400 वाहनांना आग लागण्याची घटना घडल्या आहेत. असे असताना महामार्गावर महामार्ग प्राधिकरणाची सुसज्ज अशी अग्निशमन यंत्रणा नाही हे मोठे दुर्दैव मानावे लागेल
जालन्यात दुचाकीवर आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावून नेल्याची घटना समोर आली आहे.जालना शहरातील संभाजीनगर परिसरात काल सायंकाळी हि घटना घडली असून संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय.सुनीता गवडे या फिरण्यासाठी गेल्या होत्या. त्या घरी परतताना दोन अनोळखी दुचाकीवरून आले. त्यांनी सुनीता गवडे यांच्या गळ्यातील सुमारे दीड तोळ्याचे 60 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण हिसकावून पळ काढलाय. याप्रकरणी दोन अज्ञात आरोपींविरोधात सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.