अजित पवारांच्या निधनानंतर बारामती मध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार जनता दरबार घेत आहेत. विविध समस्या सोडवण्यासाठी बारामतीकर सहयोग बंगल्यावर दाखल झाले आहेत. दादा प्रमाणेच वहिनी आमचे प्रश्न सोडवतील असा विश्वास बारामतीकारांना वाटत आहे.
देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मध्ये शिवमंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी नवीन संकल्पना आणली आहे , महाशिवरात्रीच्या उत्सवात शिव मंदिरावर ड्रोन कॅमेऱ्याचा लेझर शो पार पडणार आहे, जिल्हाधिकाऱ्यांच्या या संकल्पनेमुळे औंढा नागनाथ मध्ये पर्यटकांची संख्या देखील वाढणार आहे दरम्यान लवकरच औंढा नागनाथ मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात विकास कामे देखील करण्यात येणार असून मंदिर परिसरात याचे काम देखील सुरू करण्यात आले आहे.
ग्रामीण कृषी सहकारातील पहीलं वहीलं साहीत्य संमेलन
चिपळूण मधील पालवण येथे आज पासून पुढचे तीन दिवस चालणार संमेलन
राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते उद्घाटन
ढोल ताशांच्या गजरात निघाली ग्रंथदिंडी
आकर्षक देखाव्यासोबत संमेलनाच्या ठिकाणी निघाली शोभायात्रा
विद्यार्थी वर्गाचा ग्रंथ दिंडीत उत्साहात सहभाग
पालखी, कोकणातल्या विविध लोककला या शोभायात्रेमधला आकर्षण
परभणी पोलीस दलातील 97 जागांसाठी आजपासून पोलीस भरतीला सुरुवात केली आहे एकूण 97 जागांसाठी तब्बल दहा हजार 679 अर्ज दाखल झालेत आहे आणि या सर्वांसाठी आजपासून मैदान चाचणीला सुरुवात झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यंदाची पोलीस भरती प्रक्रिया पार पडणार आहे. दररोज 1000 उमेदवार मैदानी चाचणी देतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आज रुग्णालयातून मिळणार डिस्चार्ज
शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात करण्यात आलं होत दाखल
खोकल्याचा त्रास आणि इतर काही व्याधीमुळे शरद पवार गेल्या 5 दिवसांपासून होते रुग्णालयात
शरद पवार यांची प्रकृती आता व्यवस्थित असल्याचे डॉक्टरांची माहिती
आज सकाळी 11 वाजल्यानंतर शरद पवार यांना हॉस्पीटल मधून डिस्चार्ज मिळणार
थकबाकीदार,मिळकतकरधारकांना आणखी दिलासा, पुणे महापालिकेच्या अभय योजनेस 15 मार्चपर्यंत मुदतवाढ
पुणे महापालिकेच्या मिळकतकर थकबाकीदारांसाठी राबविण्यात येत असलेल्या अभय योजनेची मुदत १५ फेब्रुवारी रोजी संपणार होती.
या पार्श्वभूमीवर योजनेस एक महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती.या मागणीचा सकारात्मक विचार करत महापालिका कर विभागाकडून तात्काळ निर्णय घेत अभय योजनेस १५ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे.
अभय योजनेअंतर्गत मिळकतकराच्या थकीत रकमेवर ७५ टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येत आहे. १३ फेब्रुवारीपर्यंत सुमारे १ लाख ३५ हजारांहून अधिक मिळकतधारकांनी या योजनेचा लाभ घेतला असून तब्बल ८०१ कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल महापालिकेला प्राप्त झाला आहे.
सोन्या चांदीच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी वाढ झाली असून त्यामुळे व्हॅलेंटाईन डे ला आपल्या प्रियजनांना मौल्यवान अशी भेट काय द्यावी असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी कारण कोणाच्या वाढत्या भावामुळे अनेक जण आता 22 व 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यान ऐवजी रोज गोल्ड च्या दागिन्यांना प्राधान्य देत आहेत. त्यामुळे व्हॅलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर जळगाव सुवर्ण नगरीमध्ये ही आकर्षक असे रोज गोल्ड चे दागिने दाखल झाले असून कमी बजेटमध्ये ग्राहकांसाठी रोज गोल्ड चे दागिने उत्तम पर्याय ठरणार आहे
यवतमाळ जिल्ह्यात आग लागून ट्रॅव्हल्स अपघात होणे यामध्ये जीवितहानी झाल्याच्या घटनांची नोंद यापूर्वी झालीये आग लागून अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत त्यामुळे पुढील कालावधीत अशा घटनांची नोंद होऊ नये याकरिता यवतमाळ जिल्हाधिकारी विकास मीना यांनी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या असून याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी यांनी ट्रॅव्हल्स एजन्सी संचालकांना पाठविले आहे.
अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या अमरावती जिल्ह्यातील येवदा बसस्थानक व राष्ट्रीय महामार्गालगतच्या अतिक्रमणांवर अखेर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग,महसूल प्रशासन आणि पोलिसांच्या उपस्थितीत अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात आली.यापूर्वी संबंधितांना नोटिसा देऊन मुदत देण्यात आली होती. मात्र काही ठिकाणी अतिक्रमण कायम असल्याचे निदर्शनास आल्याने प्रशासनाने थेट कारवाई सुरू केली.जेसीबीच्या सहाय्याने रस्त्याच्या हद्दीतील शेड, पत्रे व तात्पुरती बांधकामे हटविण्यात आली.कारवाईदरम्यान काही व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपले साहित्य हटवले,तर काही ठिकाणी प्रशासनाला यंत्रणांच्या मदतीने अतिक्रमण काढावे लागले. परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.कारवाईमुळे येथील व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते.पोटापाण्याच्या व्यवसायावर गदा आल्याने मजुरी दाखल होत असलेली कमाई बंद झाली त्यामुळे बेरोजगारीची वेळ आल्याचे मत काहींनी व्यक्त केले..
अँकर - यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील तळणी येथील इन्फ्रा कंपनीमुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे गेल्या दोन वर्षापासून नुकसान झाले असून मोजक्या शेतकऱ्यांना सदर कंपनीने तुटपुंजी मदत दिलेली आहे परंतु जे खरे नुकसान झालेले शेतकरी अजूनही नुकसान भरपाई पासून वंचित आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करीत असल्याने नुकसान भरपाई त्वरित द्या अन्यथा काम चालू देणार नसल्याचा इशारा प्रहार संघटनेने दिला आहे.
अमरावती महानगरपालिकेत 20 फेब्रुवारी रोजी पहिली आमसभा होणार आहे, या सभेत विरोधी पक्ष नेता, पक्षनेता, गटनेता, विविध समित्या सह स्वीकृत नगरसेवक आणि स्थायी सदस्य नियुक्ती प्रक्रिया होणार आहे त्यामुळे याची आता उत्सुकता संपली असून 20 तारखेला होणाऱ्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे अमरावती महानगरपालिकेचे महापूर श्रीचंद तेजवानी यांच्या निर्णयाकडे आता लक्ष लागले आहे, अमरावती महानगरपालिकेत आठ स्वीकृत नगरसेवक तर 16 स्थायी सदस्य नियुक्त केले जाईल
पोलीस भरती प्रक्रियेत बोगसगिरी टाळण्यासाठी कडकोट तपासणी प्रणालीचा वापर केला जात आहे टू स्टेप वेरिफिकेशन केल्यानंतरच उमेदवाराला आयएफआयडी टॅग फ्रिक्वेन्सी आयडॅटीफिकेशन लावला जात आहे. त्यानंतर उमेदवाराला भरतीच्या मैदानात एन्ट्री दिली जाते तिथेही कॅमेरा समोर उभे राहून पुन्हा पडताळणी केली जात असून या ठिकाणी यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक तीन उपविभागीय पोलिस अधिकारी पहाटे चार वाजल्यापासून भरतीच्या ठिकाणी तळ ठोकून राहत आहेत.
नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत यश मिळवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आता गोकुळ आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूकही मित्रपक्षांसोबतच लढवणार असल्याचे संकेत मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. मात्र यानिमित्ताने सध्या सत्तेत मित्र असलेल्या आमदार सतेज पाटील यांना बाजूला ठेवण्याचे सूचक विधानही त्यांनी केले.
अंधेरी पश्चिम येथील वर्सोवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांची बांगलादेशी विरोधात धडक कारवाई
20 हून अधिक अवैध बांगलादेशी नागरिक ताब्यात
सर्वजण भारतात वैध कागदपत्रांशिवाय राहत असल्याची माहिती
अचूक गुप्त माहितीच्या आधारे एटीसी (ATC) पथकाची लक्षित मोहीम
पुरुष व महिलांना ताब्यात घेऊन ओळख आणि कागदपत्रांची सखोल चौकशी सुरू
भारतात प्रवेशासाठी कोणत्या नेटवर्कचा वापर झाला याचा तपास
गेल्या चार दिवसांत मुंबईत पकडलेल्या अवैध प्रवाशांचा आकडा 30 पार
8 फेब्रुवारी रोजी मालाड पठाणवाडी परिसरातून 4 बांगलादेशी घुसखोरांना अटक
ताब्यातील सर्वांची ओळख पडताळणी सुरू असून.पोलिसाकडून डिपोर्टेशन प्रक्रियेला सुरुवात
मुंबई पोलिसांचा इशारा – शहराच्या सुरक्षेशी तडजोड नाही, मोहीम सुरूच राहणार
रिव्हॉल्व्हर काढून स्वतःचे बरे वाईट करून घेण्याची धमकी देण्यावर गुन्हा दाखल
महेंद्र लोणकर असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव
शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे महापालिकेच्या कर विभागात स्वतःला संपवून टाकेल अशी दिली होती अधिकाऱ्यांना धमकी
अपघातानंतर संतप्त जमावाकडून डंपरवर दगडफेक करत तोडफोड : दगडफेक करत संतप्त नागरिकांनी डंपरच्या काचा फोडल्या...
अपघातानंतर मोठा जमाव जमल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण झाल्याने दंगा नियंत्रक पथकासह पोलिसांचा बंदोबस्त बोलवण्यात आला होता.
संत सेवालाल महाराज यांच्या २८७ व्या जयंतीनिमित्त वाशिमच्या पोहरादेवी आणि वसंतनगर परिसर रोषणाईने उजळून निघाला आहे. जयंती उत्सवानिमित्त गावातील मुख्य रस्ते, चौक आणि मंदिर परिसर आकर्षक विद्युत सजावटीने सजविण्यात आले असून संपूर्ण गाव झगमगाटात न्हाऊन निघाले आहे. रंगीत दिव्यांच्या कमानी, आकर्षक लाईट्स आणि सजावटीमुळे रात्रीच्या वेळी परिसरात नयनरम्य दृश्य पाहायला मिळतय.
भिवंडीतील कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास आर पाटील यांना आर्थिक गुन्हे शाखा ठाणे पोलिस आयुक्तालय येथे चौकशी साठी रात्री उशिरा आणण्यात आले होते. पहाटे पर्यंत त्यांना अटक दाखविण्यात आलेले नाहिये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.