Maratha Aarakshan Saam TV
महाराष्ट्र

Maratha Aarakshan: ऐन दिवाळीत मराठा आरक्षणाचा चौथा बळी; चिठ्ठी लिहित तरुणाने संपवलं जीवन

Maratha Aarakshan: नांदेड शहराच्या छत्रपती चौक परिसरात झेंडा चौक येथे त्याने शनिवारी दुपारी विष घेतले. विष घेतल्याने तो तेथेच बेशुद्ध पडला होता.

Ruchika Jadhav

संजय सूर्यवंशी

Maratha Aarakshan News:

मराठा आरक्षण मिळावे यासाठी मागील काही दिवसांपासून संपूर्ण राज्यभरात त्याचे तीव्र पडसाद उमटत होते. परंतु सरकारने दोन महिन्यांचा अवधी मागून घेतल्याने आरक्षणाचा लढा काहीअंशी थंडावला. मात्र अद्याप तरुणांच्या मनात राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळे संतापाचे वातावरण आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यातच पुन्हा एकदा नांदेड जिल्ह्यातील मरळक येथील एका तरुणाने विष पिऊन आत्महत्या केलीये. आत्महत्ये आधी तरुणाने राज्य सरकारच्या निषेधार्थ एक चिठ्ठी लिहून ठेवलील्याची माहिती मिळाली आहे. ऐन दिवाळीत तरुणाच्या आत्महत्येने गावात दु:खाचं वातावरण पसरलं आहे.

नांदेड तालुक्यातील मरळक येथील दाजीबा रामदास कदम (वय २३) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. तो चौथा बळी ठरला आहे. नांदेड शहराच्या छत्रपती चौक परिसरात झेंडा चौक येथे त्याने शनिवारी दुपारी विष घेतले. विष घेतल्याने तो तेथेच बेशुद्ध पडला होता.

त्याच्या नातेवाईकांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला नांदेडच्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी शर्थिचे प्रयत्न केले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा रविवार दिनांक १३ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला.

मुजोर प्रशासनाला असे कीती बळी हवेत? असा संतप्त सवाल कार्यकर्त्यांनी केला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा राज्य सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Running Benefits: सकाळी धावण्याचे शरीरावर काय परिणाम होतो?

Psychological Fact : नजर लागण्यामागे दडलं आहे एक सायकॉलॉजिकल सत्य, आत्ताच जाणून घ्या

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Jio Recharge Plan: फक्त ८९५ रुपयांत मिळणार ३३६ दिवसांची सेवा, जिओने दिला ग्राहकांसाठी मोठा लाभ

Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ

SCROLL FOR NEXT