Nagpur News: कोरोना काळात वाढले बालविवाहाचं प्रमाण Saam TV
महाराष्ट्र

Nagpur News: कोरोना काळात वाढले बालविवाहाचं प्रमाण

कोरोनाच्या काळात नागपूर जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण वाढले आहे. या काळात जिल्ह्यातील साधारणतः १०० पेक्षा जास्त बालविवाह झाल्याची शक्यता वर्तवलीय जाते आहे

संजय डाफ

नागपूर - कोरोनाच्या काळात नागपूर जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण वाढले आहे. या काळात जिल्ह्यातील साधारणतः १०० पेक्षा जास्त बालविवाह झाल्याची शक्यता वर्तवलीय जाते आहे. ज्या बालविवाहाची गुप्त माहिती, महिला आणि बालकल्याण विभाग आणि पोलिसांना (Police) मिळाली, असे नागपूर जिल्ह्यातील १७ बालविवाह महिला व बालकल्याण विभागाने रोखले आहेत. (Many Child Marriages performed in Nagpur During Corona Period)

कोरोना (Corona) काळात अनेकांची आर्थिक परिस्थिती खालावली. हातावर पोट असणाऱ्यांची तर परिस्थिती आणखीनच बिकट होती. अशात काही पालकांनी आपल्या मुलींची वयात येण्यापूर्वीच लग्न लावून दिले. महिला व बाल कल्याण विभागाला ज्या प्रकरणांची माहिती मिळाली ते बालविवाह रोखण्यात आले. मात्र, ज्यांची माहिती मिळाली नाही असे साधारणपणे 100 बालविवाह झाले असल्याचा अंदाज आहे.

नागपूरच्या (Nagpur) एमआयडीसी भागात प्रेमप्रकरणातून गर्भधारणा झालेल्या एका 12 वर्षीय मुलीचं तिच्या पालकांनी प्रियकरासोबत लग्न (Marriage) लावून दिलं. मात्र, वय कमी असल्यानं तिच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. आता तज्ज्ञ डॅाक्टरांच्या देखरेखीत या १२ वर्षांच्या गरोधर मुलीचं समुपदेशन सुरु असून त्या १२ वर्षांच्या मुलीच्या गर्भपाताबाबात तज्ज्ञांचा विचार सुरु आहे. कायद्याने ठरवून दिलेल्या वयापूर्वीच काही पालक मुलींची लग्न लावून मोकळं होण्याचा प्रयत्न करतात. मात्र, याचं नुकसान त्या अल्पवयीन मुलींना सहन करावं लागतं.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोलापूर जिल्ह्यात इंधन टंचाई नाही

नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक, महामार्गावर रास्तारोको

kanda Batata Rassa Bhaji: आज भाजी कोणती बनवायची? १५ मिनिटांत करा बटाटा-कांद्याची रस्सा भाजी, सोपी आहे रेसिपी

नागपुरात रक्तरंजित थरार! गमती-जमतीनंतर चाकू भोसकला; किरकोळ वादातून तरुणाची हत्या, हल्ल्याचा CCTV व्हिडिओ आला समोर

१० दिवसांत ४ वेळा डिझेल महागले, एसटीचे तिकीटही वाढणार? प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT