मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोर्चा काढला असून ते मुंबईला निघाले आहेत. मनोज जरांगे हे आंदोलनावर ठाम आहेत. सध्या ते जुन्नरमध्ये असून किल्ले शिवनेरीच्या पायथ्यावर नतमस्तक होऊन ते मुंबईकडे रवाना होणार आहे. मुंबईला निघण्यापूर्वी त्यांनी मराठा बांधवांशी संवाद साधला आणि पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेतून त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. 'अजूनही तुमच्या हातातून वेळ गेली नाही. गोरगरिबांची मनं जिंकण्यांची मुख्यमंत्र्यांकडे योग्य संधी आहे. तुम्ही आमचे वैरी नाहीत, शत्रू नाहीत. फक्त आठमूठे भूमिका सोडून द्या.', असे म्हणत मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या दिशेने निघण्यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांना आवाहन केले की, 'आंदोलनासाठी एक दिवसाची वेळ देणं ही चेष्टा आहे. आमचा हट्ट नाही. पण मागण्या मान्य करा. समाजाच्या वेदना मुख्यमंत्र्यांनी समजून घ्याव्यात. निर्णय कोर्टाचा नाही, तर तुमच्याच हातात आहे. फडणवीस आंदोलकांना थांबवणार नाहीत, त्यांचा सन्मान करतील. अजूनही तुमच्या हातातून वेळ गेली नाही. गोरगरिबांची मनं जिंकण्यांची फडणवीसांकडे योग्य संधी आहे. तुम्ही आमचे वैरी नाहीत, शत्रू नाहीत. फक्त आठमूठे भूमिका सोडून द्या.'
तसंच, 'आम्ही आरक्षणासाठी भांडत आहोत. ते पण लोकशाही मार्गाने. आजपासून मराठ्यांविषयी भूमिका बदला. सत्ता दिली मराठ्यांनी आणि उलटले मराठ्यांवरच. मराठा समाजाला जाणून बजून टार्गेट केले जात आहे. आरक्षण दिल्यानंतर मराठा समजा सन्मान करेल. आताच अंमलबजावणी करा. मराठा समजााला आणि मला मुर्ख बनवत आहेत. जाणून बुजून अपमान करत आहेत. तुम्ही गोळ्या घातल्या तरी मनोज जरांगे झेलणार. पण मागे हटणार नाही. ', असा इशारा मनोज जरांगे यांनी फडणवीसांना दिला.
जरांगेंनी यावेळी मराठा आंदोलनकांना आवाहन केले की, 'जे काय नियम आहेत ते मराठा पाळणार. एक दिवस देता आंदोलनासाठी तर एका दिवसात अंमलबजावणी करा. मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊन पुढे काय होईल हे लक्षा त घ्या. महायुतीला मराठ्यांशिवाय यश मिळवणं कठीण होते. आझाद मैदानावर मी आमरण उपोषण करणार आहे. २९ ऑगस्टला सकाळी आमरण उपोषण सुरू करणार आहे. मराठ्यांनी संयम ठेवायचा. गडबड गोंधळ करू नका. कोणतीही चूक करू नका. मराठ्याच्या सर्व पोरांनी शांततेत घ्यावे. लढताना फक्त संयमाने आणि शांततेने लढा. आंदोलनात खंड पडून देऊ नका.' तसंच, 'फडणवीससाहेब तुम्ही आम्हाला अट घालू नये. ५००० लोकांची आणि एक दिवसाच्या आंदोलनाची अट घालू नये. ज्यांची आंदोलनासाठी येण्याची इच्छा आहे त्यांना येऊ द्या. अटी घालू नका. सर्व अटी-शर्थी काढाव्यात.', असे आवाहन जरांगेनी फडणवीसांना केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.