Manoj Jarange Patil Hunger Strike Day 3 Saam TV Marathi
महाराष्ट्र

Manoj Jarange : उपोषणाचा तिसरा दिवस अन् अचानक वाढली शुगर! जरांगे पाटलांचा सरकारवर मोठा आरोप; काय म्हणाले डॉक्टर?

Manoj Jarange Patil Hunger Strike Day 3: मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीत उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या शुगर लेव्हलमध्ये बदल झाल्याने त्यांनी सरकारवर संशय व्यक्त केला. मात्र डॉक्टरांनी उपोषणादरम्यान शुगर स्थिर किंवा किंचित वाढणे शक्य असल्याचे स्पष्ट केले.

Namdeo Kumbhar

Manoj Jarange Patil hunger strike : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी (जालना) येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. अन्न-पाण्याचा त्याग केल्यामुळे त्यांची प्रकृती हळूहळू खालावत चालली आहे. दरम्यान, वैद्यकीय तपासणीनंतर त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण (शुगर) कमी होण्याऐवजी वाढल्याचे समोर आल्याने जरांगे पाटील यांनी डॉक्टरांच्या अहवालावर आणि सरकारवर गंभीर संशय व्यक्त केला आहे. "मी काही खाल्ले असल्यास जिथे सांगाल तिथे जीव देतो," असा संतप्त सवाल त्यांनी केला. या संशयावर अखेर तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनीही तातडीने स्पष्टीकरण दिले आहे.

माझी शुगर वाढतेय कशी? – जरांगे पाटलांचा गंभीर आरोप

वैद्यकीय तपासणीदरम्यान आपल्या रक्तातील साखरेची (Sugar) पातळी वाढल्याचे निष्पन्न झाल्यानंतर जरांगे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला. पहिल्या दिवशी शुगर ९४ होती, काल ती ६६ वर आली, मात्र आज ती ७२ आणि नंतर थेट ८० झाली. यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, उपोषणात माझी शुगर कमी व्हायच्या ऐवजी वाढत कशी आहे? यात सरकारचा काही डाव तर नाही ना? तुम्हाला वाटत असेल मी काही खातो, तर स्वतः मशीन आणून माझ्या पोटात घोटभर तरी पाणी आहे का ते चेक करा. मी काही खाल्ले असल्याचे सिद्ध झाले, तर तुम्ही जिथे सांगाल तिथे मी माझा जीव देईन.

डॉक्टरांचे स्पष्टीकरण:

मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केलेल्या या संशयानंतर त्यांची तपासणी करणारे डॉ. अमोल खवणे यांनी माध्यमांशी बोलताना परिस्थिती स्पष्ट केली. डॉ. खवणे म्हणाले की, जरांगे पाटलांची शुगर वाढलेली नसून ती मर्यादेतच (Limit) आहे. जेव्हा माणूस अन्न त्याग करतो, तेव्हा शरीरातील यकृत (Liver) आणि इतर अवयव साठवून ठेवलेल्या घटकांचे रूपांतर साखरेत (Glucose) करतात, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी काही वेळ स्थिर किंवा किंचित वाढलेली दिसू शकते. यात कोणतीही शंका घेण्यासारखे कारण नाही.

चलो मुंबई'चे आवाहन

प्रकृती खालावत असतानाच जरांगे पाटील यांनी उपोषणस्थळावरून मराठा बांधवांशी संवाद साधला. त्यांनी संपूर्ण मराठा समाजाला 'चलो मुंबई'चा नारा देत मुंबईच्या दिशेने निघण्याचे आवाहन केले. "सर्वांनी आजपासूनच मुंबईला जाण्यास सुरुवात करावी आणि तिथे असलेल्या आपल्या पाहुण्यांकडे किंवा ओळखीच्या लोकांकडे राहावे," असे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले आहे. जरांगे पाटलांच्या या भूमिकेमुळे आणि वैद्यकीय अहवालावरून निर्माण झालेल्या वादामुळे जालन्यासह संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय आणि सामाजिक वातावरण अधिक तापले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Aadhaar Email Update : आधार कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! 'ही' सेवा 31 डिसेंबरपर्यंत फ्री, आताच करून घ्या नाहीतर...

Bollywood Actor : चालणं-बोलणंही झालेलं कठीण; ब्रेन स्ट्रोकनंतर बॉलिवूड अभिनेत्याचं बदललं संपूर्ण आयुष्य, रोज घ्यावी लागतात ८ औषधे

Dragon Fruit Benefits: ड्रॅगन फ्रुट खाल्ल्यानंतर शरीरात होतात 5 जबरदस्त बदल जे तुम्हाला माहिती असायला पाहिजेत, जाणून घ्या

Onion Rate Today : कांद्याने सर्वसामान्यांना रडवलं! प्रति किलो इतक्या रुपयांवर पोहोचला; आजचे दर काय? वाचा

SCROLL FOR NEXT