Weather Update Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Weather Update : रात्री गारठा, दिवसा उकाडा! पुढील ५ दिवसा तापमानाचा अंदाज काय?

Maharashtra Weather Today: पुढील पाच दिवस राज्याच्या तापमानात चढ उतार होण्याची शक्यता आहे. पहाटे थंडी आणि दिवसा कडक ऊन असे राज्यात सध्या वातावारण आहे.

Namdeo Kumbhar

Mumbai, Maharashtra Weather Update Today: महाराष्ट्रात पुन्हा एकदा गारठा वाढण्यास सुरूवात झाली आहे. पहाटेच्या वेळी थंडीत गारवा असल्याचे दिसतेय. उत्तर महाराष्ट्राचा पारा १० अंशाच्या खाली घसरलाय. पण दुसरीकडे राज्यात काही ठिकाणी थंडी कमी अधिक प्रमाणात असल्याचे जाणवतेय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस राज्याच्या तापमानात चढ उतार होण्याची शक्यता आहे. पहाटे थंडी आणि दिवसा कडक ऊन असे राज्यात सध्या वातावारण आहे, पुढील पाच दिवस राज्यात असेच वातावरण राहण्याची शक्यता आहे.

सध्या महाराष्ट्रात आकाश मुख्यतः निरभ्र राहून, किमान तापमानातील घट टिकून राहण्याची शक्यता आहे. शुक्रवारपासून राज्यात पुन्हा थंडी परतण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस किमान तापमानात चढउतार होऊ शकतो, त्यामुळे राज्यात थंडी कमी-अधिक जाणवू शकते. राज्यात उत्तर महाराष्ट्रामध्ये सध्या सर्वाधिक थंडी आहे. नाशिक, निफाड अन् धुळ्यातील तापमानाचा पारा घसरलाय.

Mumbai, Maharashtra Weather Update Today

वायव्य उत्तर प्रदेशापासून राजस्थान पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. वायव्य भारतात १३० नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत वाहत आहेत. पश्चिमी चक्रावातांच्या तीव्रतेनुसार थंडी सातत्याने कमी-अधिक होत आहे. रविवारी (ता. १९) पंजाबच्या अमृतसर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी थंडीचे प्रमाण कमी अधिक होत आहे, दुसरीकडे धुक्याची दुलई पाहायला मिळत आहे. ढगाळ हवामानामुळे थंडी गायब झाल्याने राज्याचा किमान तापमानाचा पारा १५ अंशांच्या वर सरकला आहे. किमान तापमानात वाढ झाली असतानाच उन्हाचा चटका वाढून उकाड्यातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे.राज्यात मुख्यतः निरभ्र आकाश राहण्याचा तसेच कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. उत्तर महाराष्ट्रात तापमान १० अंशाच्या खाली घसरलेय.

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या तापमानात पुढील तीन ते चार दिवस कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. कमान आणि किमान तापमान जसं आहे, तसेच राहण्याची शक्यता आहे. विदर्भातही पुढील पाच दिवस तापमान जास्त बदलणार नाही, दोन ते तीन डिग्री तापमानात चढ उतार पाहायला मिळू शकतो. राज्यात पुढील पाच दिवस कोरडे तापमान राहण्याची शक्यता आहे, त्यामध्ये थंडी कमी जास्त होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray Family Reunites : अभूतपूर्व ऐतिहासिक क्षण! राज- उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र | पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

Ladki Bahin Yojana : 'पोर्टल बंद, नव्या नोंदणी होणार नाहीत'; उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचं भविष्यच सांगितलं

SCROLL FOR NEXT