yuvraj sambhaji chhatrapati and sharad pawar saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शरद पवार म्हणाले, तिसरी आघाडीमुळे मी घाबरलो… संभाजीराजेंनी महात्मा गांधींचं वाक्य म्हणत थेट प्रत्युत्तर दिलं...

Chhatrapati Sambhaji Raje On Sharad Pawar: 'इतर कोणी टिंगल केली असती तर खपवून घेतले नसते.', अशा शब्दात छत्रपती संभाजीराजे यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.

Priya More

राज्यातील तिसऱ्या आघाडीबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टिंगल उडवली होती. 'तिसरी आघाडी ऐकून मी घाबरलो. आहो मला झोप लागत नाही.', असं म्हणत शरद पवार यांनी खिल्ली उडवली होती. शरद पवार यांच्या या वक्तव्यावर आता छत्रपती संभाजीराजे यांनी महात्मा गांधींचे प्रसिद्ध वाक्य सांगत प्रत्युत्तर दिलं आहे. 'इतर कोणी टिंगल केली असती तर खपवून घेतले नसते.', अशा शब्दात छत्रपती संभाजीराजे यांनी शरद पवारांना उत्तरं दिलं.

छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले की, 'पवारसाहेब जेष्ठ आहेत. त्यांना टिंगल करण्याचा अधिकार आहे. इतर कोणी केली असती तर खपवून घेतली नसती. माझ्यासाठी पवार यांनी टिंगल करणं नवीन नाही. अगोदर ही त्यांनी टिंगल केली होती. महात्मा गांधी यांच्या विचाराने आम्ही चाललो आहेत. आधी दुर्लक्ष करतील, मग टिंगल करतील, मग ते तुमच्याशी लढतील नंतर तुम्ही जिंकता.', हे महात्मा गांधी यांचे प्रसिद्ध वाक्य सांगत छत्रपती संभाजीराजेंनी शरद पवारांना उत्तर दिलं.

मराठा आरक्षणासंदर्भातील शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना संभाजीराजेंनी सांगितेल की, 'शरद पवारसाहेब वेळोवळी आरक्षणबाबत सांगत असतात. मला महिती आहे जे १० टक्के आरक्षण वाढवून दिलं आहे त्यात सर्वांच्या सह्या आहेत. पण मराठा समाजाला मान्य नाही. ७५ टक्के हवं तर पवारसाहेबांनी द्यायला हवं होतं. राजकीय इच्छाशक्ती हवी, जातीय जनगणना व्हायला हवी.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

SCROLL FOR NEXT