सकाळपासून मतदारांची मतदान केंद्रावर गर्दी
न्यायालयीन प्रक्रियेमुळे लांबली होती प्रभाग 10 ची निवडणूक
दोन नगरसेवकपदांसाठी आज होतंय मतदान
प्रभागात सुमारे 4 हजार 200 मतदार
प्रभागात महायुती विरुद्ध उबाठा अशी थेट
महायुतीतील भाजपचे उमेदवार राजू तोडणकर आणि मानसी करमरकर हे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात
तर 'उबाठा" कडून राजाराम रहाटे आणि श्वेता कोरगावकर निवडणूक आखाड्यात
प्रभाग क्र. १० मधील अपक्ष उमेदवार सचिन शिंदे आणि संपदा रसाळ-राणा या दोघांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तसेच जिल्हा न्यायालयाकडूनही अवैध ठरवण्यात आले होते
अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यात नगरपरिषद निवडणुकीसाठी आज सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली असून मतदान करण्यासाठी मतदारांनी सकाळपासूनच गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळाले. या निवडणुकीत अजित पवार पक्षाच्या उमेदवाराने अचानक नगर घेतल्याने या निवडणुकीत दुरंगी लढत होणार आहे. यामध्ये भाजपच्या आमदार मोनिका राजळे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार शिवाजी गर्जे आणि माजी आमदार चंद्रशेखर घुले तसेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रताप ढाकणे आणि खासदार निलेश लंके यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नगराध्यक्ष पदासाठी तीन उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तर 20 नगरसेवकांच्या जागेसाठी 64 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
यवतमाळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी भाजप उमेदवार असलेल्या प्रियदर्शनी उईके यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजाविला. त्यांचे वडील आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि आई सोबत त्या मतदान केंद्रावर पोहोचल्या. तत्पूर्वी कुटुंबीयांनी त्यांचे औक्षवंन केले. आई-वडिलांचे आशीर्वाद घेऊन प्रियदर्शनी उईके यांनी मतदान केले. यवतमाळकर मतदारांनी लोकशाहीच्या या उत्सवात उत्साहाने सहभागी होऊन अधिकाधिक संख्येने मतदान करावे असे आवाहन मंत्री अशोक उईके यांनी यावेळी केले. तसेच जनता विकासाच्या मुद्द्यावर भाजपालाच मतदान करतील आणि भाजपाचे सर्वाधिक नगरसेवकासह नगराध्यक्ष देखील भाजपाचा विजयी होईल असा विश्वास मंत्री उईके यांनी व्यक्त केला.
मालेगाव महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षाचे समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली मनपाची निवडणूक पूर्ण ताकदनिशी लढवणार असून उद्या रविवारी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान संकेत अंपायर येथे विशाल सोनवणे यांच्या कार्यालयात उत्सुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडणार असून इच्छूकांनी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले असून,मुलखती स्वतः समीर भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
- महापालिका निवडणूक जाहीर होताच राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत
- तर दुसरीकडे आम आदमी पार्टीने उमेदवारही जाहीर केले आहेत
- महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री भूषण ठाकूरकर आणि नागपूर शहराध्यक्ष अजिंक्य कळंबे यांच्यातर्फे आम आदमी पार्टीच्या दहा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे
- महानगरपालिका निवडणूक लोकांच्या मूलभूत मुद्द्यांवर लढवत असल्याचे आम आदमी पार्टी तर्फे सांगण्यात आले आहे
आज मतदान होत आहे एक मतदान देश हितासाठी असते एक महाराष्ट्र साठी आणी एक गावाच्या विकासासाठी असते आज सर्वानी मतदानाला येत गावाच्या विकासासाठी मतदान कराव असं आवाहन आहे. भाजपचे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास आहे - रामदास तडस, माजी खासदार
सोलापूरच्या बोरामणी गवताळ संरक्षित वन प्रदेशात एक महत्त्वपूर्ण पुरातात्विक शोध लागला आहे.येथे सापडलेला १५-सर्किटचा वर्तुळाकार दगडी चक्रव्यूह हा आतापर्यंत भारतात सापडलेला सर्वात मोठा असा चक्रव्यूह आहे,असे पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी नमूद केले आहे.
गेल्या २ डिसेंबरला ७७ लोकनियुक्त नगराध्यक्षपदासह अन्य अपील नसलेल्या ठिकाणी ४५२ नगरसेवकांसाठी एक हजार ४८८, असे एक हजार ५६४ उमेदवारांसाठी निवडणूक झाली. मात्र, १२ प्रभागांतील काही उमेदवारांनी हरकती घेतल्याने उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी २० डिसेंबरला मतदान घेण्यास व २१ डिसेंबरला एकत्रित मतमोजणी करण्याचे आदेश दिले होते.आज अमळनेर १ 'अ', सावदा २ 'ब', ४ 'ब' आणि १० 'ब', यावल ८ 'ब', वरणगाव १० 'अ', १० 'क', पाचोरा ११ 'अ', १२ 'ब' आणि भुसावळ ४ 'ब', ५ 'ब', तसेच ११ 'ब', अशा सहा पालिकांतील १२ प्रभागांत मतदानाला सुरुवात झाली आहे. २ डिसेंबरला झालेले मतदान व शनिवारी होणाऱ्या मतदानाची मतमोजणी रविवारी नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार स्थगित करण्यात आलेल्या धाराशिव मधील तीन प्रभागातील 3 जागा व उमरगा येथील तीन प्रभागातील 3 जागांसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे.धाराशिव मधील नगरसेवक पदाच्या 2 अ, 7 ब 14 ब या तीन ठिकाणी तर दुसरीकडे उमरगा येथे 4, 5 आणि 11 प्रभागात मतदान प्रक्रिया पार पडत आहे.धाराशिव मध्ये या निवडणुकीसाठी भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील,खासदार ओमराजे निंबाळकर,खासदार ओमराजे निंबाळकर,आमदार कैलास पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.तर दुसरीकडे उमरगा येथे भाजप आणि उद्धव ठाकरे शिवसेनेमध्ये लढत असून त्या ठिकाणी ठाकरे शिवसेनेचे आमदार प्रवीण स्वामी तसेच भाजपाचे माजी मंत्री बसवराज पाटील जिल्हा परिषदेचे माजी सभापती अभय चालुक्य यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
सातारा जिल्ह्यातील फलटण आणि महाबळेश्वर नगरपालिका साठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे.फलटण नगरपालिका निवडणुकीच्या नगराध्यक्षपदासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये थेट लढत असल्याचे पाहायला मिळत आहे.फलटणमध्ये नगराध्यक्ष पदासाठी रामराजे गटाकडून शिवसेनेच्या चिन्हावर अनिकेतराजे नाईक निंबाळकर तर माजी खा. रणजीत नाईक निंबाळकर यांचे बंधू भाजपच्या चिन्हावर समशेर सिंह नाईक निंबाळकर या दोघांमध्ये थेट लढत होत असून आज या लढतीची मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे.
देऊळगावराजा नगरपरिषदेच्या निवडणूक मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून कडाक्याच्या थंडीत मतदारांनी मतदान करण्यासाठी रांगा लावल्या आहेत .. जिल्ह्यातील चार ठिकाणी आज मतदान प्रक्रिया पार पाडली जात असून त्यामध्ये देऊळगावराजा पूर्ण, खामगाव, शेगाव व जळगावजामोद येथे काही प्रभागामध्ये मतदान होत आहे..
भंडारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 आणि 15 मध्ये आज मतदान होतं आहे. या दोन जागांसाठी 8 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग 12 मध्ये 5 तर, प्रभाग 15 मध्ये 3 उमेदवार उभे आहेत. दोन प्रभागात 9 मतदान केंद्रावर 45 कर्मचारी नियुक्ती करण्यात आले आहे. तापमानाचा पारा 8 अंश डिग्री सेल्सिअस वर पोहोचला असताना कुडकुडत्या थंडीतही भंडाराकर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचला आहे.
यवतमाळ शहरात 248 मतदान केंद्रावर दोन लाख बत्तीस हजार 315 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. सकाळी साडेसात वाजता पासून मतदानासाठी बूथवर रांगा लागले असून मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे दरम्यान बुध केंद्रावरून मतदारांसोबत अधिक बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय राठोड
अकोला जिल्ह्यातीलं बाळापूर नगर परिषदसाठी आज मतदान होत आहे... आज सकाळी साडे 7 वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी साडे 5 या वेळेपर्यत मतदान पार पडणारेये. एकत्रित 40 हजार 572 मतदाराचा मतदानाचा आपला हक्क बजावणार आहेत. 25 जागांसाठी 85 उमेदवार रिंगणात आहे, तब्बलं 43 केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडते आहे. वंचित आणि स्थानिक नगर विकास पार्टीमध्ये येथे आघाडी आहे.. या लढतीत प्रामुख्याने पाहिलं तर एमआयएम, नगर विकास पार्टी आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये लढतीच चित्र आहे
फुलंब्री नगरपंचायतची सार्वत्रिक निवडणूक शनिवारी, म्हणजेच आज २० डिसेंबर रोजी पार पडत आहे. यापूर्वी ही मतदान प्रक्रिया २ डिसेंबर रोजी होणार होती. मात्र काही कारणांमुळे राज्य निवडणूक आयोगाने ही निवडणूक स्थगित करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. अखेर आज शनिवारी नियोजितप्रमाणे मतदान प्रक्रिया राबवली जात आहे. नगराध्यक्ष पदासाठी तीन तर सतरा जागेसाठी 54 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे.
जालन्यातील भोकरदन नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 1 अ आणि 9 ब साठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी साडेसात वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार असून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू असणार आहे. दोन्ही प्रभागासाठी सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून चार मतदान केंद्रांवर हि मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. भोकरदन नगर परिषदेच्या या दोन जागांसाठी तिरंगी लढत होत आहे..
कोपरगाव , देवळाली प्रवरा , नेवासा तसेच पाथर्डी नगरपालिकेसाठी मतदान...
मतदान प्रकियेला सुरूवात, मात्र थंडीचा कडाका असल्याने मतदानासाठी अत्यल्प गर्दी..
जिल्ह्याचे तापमान 11 डिग्री सेल्सिययवर...
नेवासा आणि कोपरगाव नगरपालिकेत आजी माजी आमदारांची प्रतिष्ठापणाला....
कोपरगाव मध्ये महायुतीतले पक्ष एकमेकांसमोर तर महाविकास आघाडीचाही पॅनल...
हिंगोली जिल्ह्यातील वसमत नगर परिषदेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे वसमत नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकूण 59855 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत यामध्ये तीस हजार पुरुष तर एकोणतीस हजार आठशे 53 महिला मतदारांचा सहभाग आहे दरम्यान 15 प्रभागासाठी 30 नगरसेवक पदाच्या जागेवर 125 नगरसेवक पदाचे उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत तर नगराध्यक्ष पदासाठी 7 महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत दरम्यान शहरातील संवेदनशील मतदान केंद्रावर निवडणूक विभाग व पोलिसांच्या वतीने चोख
अशी सुरक्षा ठेवण्यात आली असून मतदारांनी निर्भीडपणे आपल्या मतदानाचा हक्क बजवा असे आवाहन निवडणूक अधिकाऱ्यांनी केले आहे
नगराध्यक्ष व 28 सदस्यांसाठी मतदान.नगराध्यक्ष पदासाठी 7 तर सदस्य पदासाठी 173 उमेदवार रिंगणात..
काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे, ठाकरे गटाचे आमदार गजानन लवटे, शिवसेनेचे माजी आमदार अभिजीत अडसूळ यांची प्रतिष्ठा पणाला...
आमदार गजानन लवटे यांचे पुत्र यश लवटे देखील निवडणुकीच्या रिंगणात.
शहरात एकूण 52 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था.
प्रत्येक केंद्रावर केंद्रप्रमुख, मतदान कर्मचारी व महिला कर्मचारी नियुक्त.
संवेदनशील केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात.
शहरभर कडेकोट सुरक्षा, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस सज्ज.
मतदारांसाठी आवश्यक साहित्य व सुविधा उपलब्ध.
शांततापूर्ण मतदानासाठी प्रशासनाची पूर्ण तयारी.
अंबरनाथ नगरपालिकेसाठी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर आज अंबरनाथ शहरातील प्रभाग क्रमांक 28 मध्ये दोन जणांना पैशाची पॉकिट वाटत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडलं, त्यानंतर या दोन जणांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी भरारी पथकाच्या ताब्यात दिलं , सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू आहे. भाजपच्या उमेदवाराकडून हे पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
राज्यातील उर्वरित नगर परिषद आणि नगर पंचायतीसाठी आज मतदान होत आहे. पुणे, सोलापूर, कोल्हापूरसह राज्यात मतदान होत आहे. तर २१ तारखेला मतदानमोजणी होणार आहे.
मावळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका लक्षणीयरीत्या वाढला असून आज किमान तापमान थेट १२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले आहे. पहाटेपासूनच वातावरणात गारठा जाणवत असून सकाळ व रात्रीच्या वेळी थंडीचा तीव्र अनुभव नागरिक घेत आहेत. अचानक वाढलेल्या थंडीमुळे मावळ परिसरात जनजीवनावर परिणाम झाला आहे.
थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी शेकोटींचा आधार घेतला असून चौकाचौकात, गल्ल्यांमध्ये आणि वस्ती परिसरात पहाटे व रात्री शेकोटी पेटलेली दिसून येत आहे. विशेषतः वृद्ध नागरिक, लहान मुले, रस्त्यालगत व्यवसाय करणारे विक्रेते तसेच पहाटे कामावर निघणारे कामगार शेकोटीभोवती उभे राहून शरीराला उब देताना दिसत आहेत.
फलटण नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाची उमेदवार अनिकेत राजे नाईक निंबाळकर आणि सर्व नगरसेवकांच्या प्रचारासाठी आज अभिनेता गोविंदा यांची रॅली फलटण शहरात काढण्यात आली. या रॅलीला फलटणकरांनी मोठा प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळालं. यावेळी माध्यमांशी बोलताना गोविंदा यांनी मराठीतून संवाद साधत सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या तसंच मी या दिलेल्या शुभेच्छांना कोणताही दोष लागू नये असं सुद्धा गोविंदा म्हणाले. अनिकेत राजे यांच्या कामातून लोकांचे विचार पूर्णपणे बदलून जातील असं काम त्यांनी कराव अस सुद्धा ते म्हणाले... वाईट बोलणारी लोक नेहमीच दिसत असतात त्यामुळे मी विरोधकांनी केलेल्या टिकेकडे पाहत नाही. चित्रपट स्थापना, रुद्र स्थापना याला महाराष्ट्राची भूमी पुढे आणते. या महाराष्ट्राच्या भूमीला मी सतत नमन करत असतो. बाळासाहेबांच्या कृपेने आम्ही पुढे आलेलो आहोत आमच्यावर त्यांची ही कृपा सदैव राहील असे मत सुद्धा अभिनेता गोविंदा यांनी व्यक्त केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.