मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात सहभागी करण्याचा 2 सप्टेंबर 2025 चा शासन निर्णय रद्द करा, शिंदे समितीने शोधलेल्या 58 लाख कुणबी नोंदीची पडताळणी करण्याकरता शासनाने उच्चस्तरीय उपसमिती नेमण्यात यावी, ओबीसी विद्यार्थ्यांची 50 टक्के शिष्यवृत्ती 100 टक्के करण्यात यावी, जातीनिहाय जनगणना त्वरित करण्यात यावी, महायुतीला भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात यावा या मागणीसाठी अमरावती जिल्ह्यातील ओबीसी आरक्षण संघर्ष समितीचे चंद्रशेखर देशमुख आणि तुषार वाढोणकर हे दोन व्यक्ती अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहे, आज त्यांच्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे, राज्य सरकारने मागण्याची दखल घ्यावी अन्यथा अमरावती जिल्ह्यातील समस्त सकल ओबीसी बांधव सरकारविरुद्ध एल्गार करेल असा इशारा देण्यात आला आहे
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात दोन गटात तुंबळ राडा झाल्याची घटना काल रात्री घडली आहे.. मोहनीराजनगर भागात किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली.. दोन्ही गटांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अचानक झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.. सुरुवातीला पोलिसांची कुमक कमी असल्याने जमावाने पोलीस वाहनावर दगडफेक केल्याची माहिती समोर येत आहे.. जमावाने केलेल्या दगडफेकीत दोन पोलिसही जखमी झाले आहेत.. त्यानंतर काही वेळात पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आले.. पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करून परिसर शांत केला.. जमावाने या प्रकरणात संबंधित दोन्ही गटातील 63 जणांवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन्ही बाजूच्या 16 आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय.. या प्रकरणात शिवसेनेच्या माजी नगरसेवकासह राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांचे स्विय सहाय्यक यांच्यावर आणि मनसेच्या शहरप्रमुखावर देखील गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे..
मुंबईतील ताडदेव परिसरातील कोस्टल रोड टनेलमध्ये एका गाडीला आग लागल्याची घटना घडली. या घटनेनंतर तात्काळ दक्षिण व उत्तरमार्गे जाणारी वाहतूक तात्पुरती थांबवण्यात आली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाने प्रयत्न सुरू केले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे.
लातूर जिल्ह्यातील पाऊस कालपासून थांबला असला तरी जिल्ह्यातील प्रमुख नद्यांना आजही पूरस्थिती आहे. मांजरा नदीला पूर आल्याने शिरूर अनंतपाळ तालुक्यातील उजेड गावाला मोठा मटका बसलाय, शेतात असणारे नागरिक आणि शेतकरी पुराच्या पाण्यामुळे अडकून बसले आहेत, शेतकऱ्यांचे जनावरे देखील पाण्यातच आहेत. दरम्यान सगळी शेती पाण्यात गेली, जनावरांना चार दिवसापासून चारा नाही जगायचं कसं असं म्हणत शेतकरी आक्रोश करत आहे.. पूर येण्यापूर्वी स्वतः शेतकऱ्यांनी तहसीलदारांना कल्पना दिली होती मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप होतोय..
नांदेड-
विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे कालपासून उघडले
गोदावरी नदीपत्रात 2 लाख 77 हजार क्यूसेकने विसर्ग सुरू
गोदावरी नदीने ओलांडली धोक्याची पातळी, लाखो हेक्टर शेती पिकांना बसणार फटका
पुणे -
पुण्यात नामांकित खासगी विद्यापीठाची 2.5 कोटींना फसवणूक
PhD करणाऱ्या 34 वर्षीय तरुणाला सायबर पोलिसांनी केली अटक
परदेशातून पदव्युत्तर पदवी आणि पीएचडीचे शिक्षण घेतलेल्या आरोपीने अशी केली फसवणूक
सितैया किलारु अस फसवणूक केलेल्या आरोपीचे नाव
‘आयआयटी’ मुंबईतील प्राध्यापक असल्याचं भासवत आरोपीने 2.5 कोटी रुपयांना गंडवलं
पुण्यातील एका प्राध्यापकाचा विश्वास संपादन करत केली सायबर फसवणूक
सरकारने सगळ सोडून नुकसानग्रस्तांना युध्दपातळीवर मदत करावी - संभाजीराजे छत्रपती
जगायचं कस असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडलाय
शेतकऱ्यांच्या गायी जनावरे जाग्यावर दगावले,
नुकसानीची परिस्थिती मुख्यमंत्र्यांना पञाद्वारे सांगणार
- नाशिक ग्रामीण आणि येवला शहर पोलिसांची संयुक्त कारवाई
- अमीना नगर परिसरातून एमडी ड्रग, कुत्ता गोली आणि इतर नशेचा साठा जप्त...
- लाखोंच्या घरात किंमत असलेला ड्रग्स साठा पोलिसांच्या ताब्यात
- चोरीछुपे विक्री होत असल्याने परिसरात खळबळ
- संशयित आरोपी फरार, पोलिसांचा शोध सुरू
कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडीच्या देवीला भाविकांची मोठी गर्दी
तीन दिवसांत दोन लाखांहून अधिक भाविकांनी घेतलं दर्शन
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातवा - आठव्या दिवशी दर्शनाला येणार
परभणी -
परभणीत गोदावरीचा पूर कायम
प्रशासनाकडून पुराने वेढलेल्या गावाला आरोग्य मदत
डॉक्टरांची टीम वैद्यकिय साहित्यासह बोटीने गावात
पुणे -
मुसळधार पावसामुळे DMER परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय
डायरेक्टोरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष विभागाकडून पत्र जाहीर
सोलापूर आणि मराठवाड्यातील पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने नियोजित परीक्षा पुढे ढकलली
आज आणि उद्या या परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते
नवीन परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होईल अशी माहिती विभागाकडून पत्राद्वारे देण्यात आली आहे
नाशिक -
- नाशिकच्या राजीवनगर परिसरात टवाळखोरांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न
- ४ ते ५ गाड्यांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न
- काल रात्रीच्या सुमारास घडली घटना, पाच ते सहा मद्यधुंद तरुणांनी गाड्यांची केली तोडफोड
- पोलीस घटनास्थळी दाखल होत काही जणांना घेतले ताब्यात
- सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू
- नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अमरावती -
पोल्ट्रीफार्म मालकाने शेकडो मृत कोंबड्या तलावात टाकल्या
अमरावती जिल्ह्यातील डीगरगव्हाण येथील घटना
डिगरगव्हाण तलावात मृत कोंबड्यांचा खच
दुर्गंधीने नागरिक हैराण झालेत
नागरिकामध्ये संतापाची लाट
पुणे -
पुरंदर विमानतळासाठी ९४ टक्के शेतकऱ्यांची संमती दिल्याने उद्यापासून मोजणीला सुरुवात
पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी सात गावांतील शेतकऱ्यांची संमती वाढत आहे
आतापर्यंत तब्बल ९४ टक्के शेतकऱ्यांनी जमीन देण्यास होकार दिल्याय
त्यामुळे उद्याच्या शुक्रवारपासून मोजणीची प्रक्रिया सुरू होऊन २० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केली जाईल.
कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, पारगाव, खानवडी, उदाची वाडी आणि वनपुरी या सात गावांमध्ये विमानतळासाठी सुमारे तीन हजार एकर जमीन घेण्यात येणार आहे यापैकी २,७०० एकरपेक्षा जास्त जमिनीला संमती मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे -
ओबीसी नेते लक्ष्मण हाके बारामती पोलिसांकडे हजर होणार
बारामती मध्ये ओ बी सी समाजाचा मोर्चा काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे हाके यांचे म्हणणे
परभणीमधून हाके त्यांच्या समर्थकांसह बारामतीमध्ये दाखल
हाके यांच्यासह १४ जणं पोलिसात हजर होणार
यवतमाळ -
यवतमाळ जिल्ह्यातील 3295 गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर
नवरात्रोत्सव सुरू असून या काळात कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासन अलर्ट झाले
पोलिसांनी जिल्ह्यातील 3295 गुन्हेगारांना रडारवर घेतली आहे
आतापर्यंत 1 हजार 840 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील 31 पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोलिसांकडून कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
पंढरपूर -
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराकडून पूरग्रस्तांसाठी मदत
फूड पॅकेट आणि प्रसादाचे बुंदी लाडू वाटप
विठ्ठल मंदिराकडून 1700 फूड पॅकेटस
पंढरपूर -
माढामधील लोकांचे संसार उभे करण्यासाठी मदतीचे आवाहन
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आमदार अभिजीत पाटील यांचा पुढाकार
माढा चे आमदार अभिजीत पाटील यांचा एक हात मदतीचा उपक्रम
पुणे -
साखर गाळप हंगाम धोरण सोमवारी ठरणार
१५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याची ‘विस्मा’ची मागणी
राज्यातील २०२५-२६ चा साखर गाळप हंगाम सुरू करण्याबाबतचे धोरण सोमवारी मुंबईत उच्चस्तरीय बैठकीत निश्चित होणार आहे.
या बैठकीत गाळप हंगामाची तारीख, ऊस बिले, वसुली व कारखानदारांच्या अडचणींवर चर्चा होणार आहे.
दरम्यान, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने १५ ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करण्याची मागणी केली आहे.
तसेच ऊस तोडणी मजुरांच्या सुविधा, गाळप परवाना नियम, वीज अनुदान आणि गूळ उत्पादकांवरील परवाना अटी शिथिल करण्याची मागणीही त्यांनी साखर आयुक्तांकडे केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.