बदलापूर शहरातील पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या मुख्य वीर सावरकर उड्डाणपुलावर आज सकाळच्या सुमारास प्रचंड वाहतूक कोंडी झालीय. एकाच वेळी दोन वाहनांचे टायर फुटल्यानं दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सकाळच्या अत्यंत गजबजलेल्या वेळी उड्डाणपुलावर एक टँकर आणि एक दुधाची गाडी जात होती या दोन्ही वाहनांचं टायर फुटल्यानं दोन्ही मोठी वाहनं पुलाच्या मध्यभागीच अडकून पडली. पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा हा एकमेव पूल असल्याने, दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे कोलमडलीय. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या असून, अनेक वाहनचालक गेल्या काही तासांपासून पुलावर अडकून पडले आहेत. यामुळे वाहन चालकांना तीव्र मनस्ताप सहन करावा लागत आहे.
कोयना धरणाच्या जलाशयातील पाणीपातळी कमालीची घटल्यामुळे धरणाचे विस्तीर्ण बॅकवॉटर सध्या ओसाड पडले आहे. मात्र, या जलसंकटासोबतच एक ऐतिहासिक ठेवा पुन्हा एकदा समोर आला आहे. पाणी ओसरल्यामुळे १९५२ पूर्वीच्या ऐतिहासिक जुन्या कसबा पेठ बामनोली गावाचे अवशेष आता उघडे पडले असून ते पाहण्यासाठी पर्यटक या परिसरात येऊ लागले आहेत. त्या ठिकाणचा पर्यटनाचा व्यवसाय हा बोटिंग असून पाणीपातळी कमी झाल्यामुळे हा सर्व व्यवसाय ठप्प झाला
अखंड महाराष्ट्राच कुलदैवत असणाऱ्या जेजुरीत येणाऱ्या भाविकांना आता भंडारा आमच्याकडूनच घ्या अशी सक्ती करता येणार नाही जर कोणी व्यापाराने भंडारा आमच्याकडूनच घ्या अशी सक्ती केली तर तो खंडणीचा प्रकार समजला जाईल असा इशारा जेजुरी पोलिसांनी दिलाय.
जेजुरी मध्ये "पार्किंग आणि भंडारा घेण्याच्या सक्तीवरून भाविक व स्थानिकांमध्ये वारंवार वाद होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि ग्रामस्थांची संयुक्त बैठक घेण्यात आली. यावेळी पोलीस अधिकारी दीपक वाकचौरे यांनी हा इशारा दिला आहे.
बदलापूर रेल्वे स्थानकात एका मोबाईल चोराला प्रवाशांनी बेदम चोप दिलाय. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. मात्र मोबाईल चोरी करणारी टोळी फरार झालीय. बदलापूर रेल्वे स्थानकातून दररोज हजारो प्रवासी मुंबईकडे ये जा करत असतात. गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरांच्या टोळीकडून प्रवाशांचे मोबाईल लांबवले जातात. मात्र काल एक मोबाईल चोर प्रवाशांच्या हाती लागला. त्यानंतर प्रवाशांनी त्याची चांगलीच धुलाई केली आणि चोरट्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं. पोलीस आता मोबाईल चोरांच्या टोळीचा शोध घेत आहेत.
कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याच्या संतापातून शेतकरी आज मंचर येथे पुणे-नाशिक महामार्गावर रास्तारोको आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात आमदार रोहित पवार सहभागी होणार असून, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सरकारच्या कांदा धोरणावर जोरदार टीका केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.