जळगाव जिल्ह्यात ३० आणि ३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून, प्राथमिक अहवालानुसार सुमारे ५० हजार १९९ हेक्टर क्षेत्रावरील विविध पिकांची हानी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीचा फटका १५ तालुक्यांतील ५७८ गावांमधील ७८ हजार ५३२ शेतकऱ्यांना बसल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
अमरावती शहरातील राजापेठ पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत अकोली रोडवरील साई हेरिटेज परिसरातून २२ वर्षीय संशयिताला ताब्यात घेतले आहे. आरोपीच्या ताब्यातून सुमारे २७७ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन), एक फोर्ड इकोस्पोर्ट कार आणि दोन मोबाईल असा एकूण ५३ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राजापेठ पोलीस करत असून अमली पदार्थांच्या तस्करीविरोधातील ही महत्त्वाची कारवाई मानली जात आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे 9 ऑगस्ट रोजी रायगडच्या एक दिवसीय दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा माणगाव येथून प्रारंभ होणार असून ते या दौऱ्यादरम्यान मुंबई गोवा महामार्गाची पहाणी करणार असल्याची माहिती संदिप देशपांडे यांनी दिली आह आहे. माणगाव बायपासचे रखडलेले काम, नवीन रस्त्याला पडलेले खड्डे आणि धोकादायक पुलांची पहाणी राज ठाकरे या दौऱ्यादरम्यान करतील. या बरोबर माणगाव, पेण आणि पनवेल येथे पक्ष कार्यालयाचे उद्घाटन देखील राज ठाकरे यांच्या हस्ते केले जाणार आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा पश्चिम भागामध्ये कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळी मध्ये वाढ होत आहे.त्यामुळे धरण व्यवस्थापनाने धरणांमधून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू केला आहे. त्यामुळेच नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होताना पाहायला मिळत आहे. साताऱ्यातील संगम माहुली परिसरात असणाऱ्या कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगमाच्या परिसरात आता पाण्याची पातळी लक्षणे वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच ठिकाणी असलेल्या साताऱ्याच्या छत्रपती थोरले शाहू महाराज यांची समाधी आता पाण्याखाली गेलेली आहे.कन्हेर आणि उरमोडी या दोन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे कृष्णा आणि वेण्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे त्यामुळेच संगम माहुली परिसरामध्ये नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्यात वाढ झालेली आहे. साताऱ्यातील संगम माहुली येथील परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांनी
तब्बल ३३ दिवसांच्या खंडानंतर स्टार एअरची सोलापूर-मुंबई विमानसेवा आज, रविवार, २ऑगस्टपासून पुन्हा सुरू होत आहे.कांही तांत्रिक कारणास्तव २९ जूनपासून ही सेवा स्थगित करण्यात आली होती.त्यामुळे व्यापारी,उद्योजक,नोकरदार,वैद्यकीय उपचारासाठी मुंबईला जाणारे रुग्ण आणि सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती.अखेर सेवा पूर्ववत झाल्याने सोलापूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून पायाभूत सुविधांच्या उन्नतीकरणासाठी आणि अभियांत्रिकी कामांसाठी नऊ तासांचा विशेष मेगा ब्लॉक
अनेक उपनगर आणि एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच काही लांब पल्ल्याच्या गाड्या पुणे स्टेशनऐवजी खडकी, हडपसर आणि शिवाजीनगर स्थानकांवरून सुरू होतील किंवा तेथेच प्रवास समाप्त करतील
माळशेज घाट मार्ग पुर्णपणे वाहतुकीसाठी बंद झाल्यानंतर पर्यायी मार्गांवर रात्रभर भीषण वाहतूक कोंडी झाली. रात्रभर भर पाऊसात तासन्तास वाहनांमध्ये अडकलेल्या पर्यटक आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
कल्याण–आहिल्यानगर महामार्गावरील माळशेज घाट मार्ग बंद झाल्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. मात्र अरुंद आणि एकेरी रस्त्यामुळे रात्रभर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पर्यटक, महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक तासन्तास वाहनांमध्ये अडकून पडले. रात्रीच्या वेळी मदत आणि वाहतूक नियोजनाचा अभाव असल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. आपत्कालीन क्रमांकावर संपर्क करूनही तातडीची मदत मिळाली नसल्याची नाराजी अनेक प्रवाशांनी व्यक्त केली. रविवारच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी शक्यतो माळशेज घाट मार्गावरील प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
कल्याण आहिल्यानगर माळशेज घाट मार्ग बंद पर्यायी मार्ग वाहतूककोंडी
कल्याण ➜ मुरबाड ➜ म्हसा ➜ पिंपळगाव जोगा धरण (मागील मार्ग) ➜ खिरेश्वर ➜ सांगणोरे ➜ पिंपळगाव जोगा ➜ राजगड हॉटेल ➜ आहिल्यानगर
अंबरनाथमध्ये शिवसेना (शिंदे गट)तील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाल्याचे दिसून आले आहे. पक्षाकडून आयोजित कार्यक्रमात शिवसेना (शिंदे गट)चे अंबरनाथ शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आमदार काय करतात संध्याकाळी फार्म हाऊस वर जाऊन बसणं या शब्दात वाळेकर यांनी जोरदार टीका केली.
अहिल्यानगर शहरातील माळीवाडा बस स्टँड जवळून एका हात गाडीवरून बाबासाहेब आव्हाड या युवकाने तीन चिक्कीचे पॅकेट घेतले त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जिवंत अळ्या आढळून आल्याने संताप व्यक्त केला आहे. संबंधित हातगाडी वाल्याला विचारले असता त्यांनी हा माल माळीवाडा येथील एका किराणा स्टोअर मधून घेतल्याचे सांगितले. जिल्ह्यात अनेक दुकानांमध्ये आळ्या बुरशी तसेच मुदत संपलेल्या मालाची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याची शक्यता असून याकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तरी असा खराब माल विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात दोन दिवसापूर्वी मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील 14 हजार हेक्टरवरील कापूस तर 8 हजार हेक्टरवरील सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले असून अतिवृष्टीमुळे एकूण 26 हजार हेक्टर वरील पीक उध्वस्त उद्ध्वस्त झाली आहे. 286 हेक्टर शेतजमीन खरडून गेल्याचे पुढे आले आहे मात्र हा आकडा आणखी वाढण्याची स्थिती आहे कृषी विभागाची यंत्रणा अजून नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर पोचलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.