नाशिकच्या मालेगाव मध्ये काल 3 तास आत्महत्येच नाट्य रंगल्याचे पहावयास मिळते,कौटुंबिक वादातून त्रस्त होत तो गिरणा नदी पात्रातील कोल्हापूर टाईप बंधाऱ्यावर मधोमध जाऊन बसला,आधीच नदीला पूर आलेला असल्याने पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले मात्र आपल्या जवळ कोणी आले तर आपण नदी पत्रात उडी मारू अशी धमकी तो देत होता,अखेर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या शिताफीने त्याला पकडत नदी पत्रातून तब्बल तीन तासाच्या नाट्या नंतर त्याला सुखरूप बाहेर काढले,रात्री उशिरा पर्यंत त्याची पोलीस चौकशी करत होते.
राज्यात एसआयआर मोहीम सुरू असल्याने राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध होणारी अंतिम मतदार यादी ४ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यास दिली स्थगिती
एसआयआर मोहिमेनंतर प्रसिद्ध होणारी विधानसभा मतदारसंघनिहाय यादी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तयार करण्यास राज्य निवडणूक आयोगास विनंती
जळगाव जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत समोर आलेली आत्महत्येची आकडेवारी सुन्न करणारी आहे. अवघ्या १८० दिवसांत ४४३ जणांनी आत्महत्या केलीय. यात तब्बल ३८३ (सुमारे ९० टक्के) पुरुष आहेत. जिल्ह्यात रोज सरासरी तिघांचा बळी जातो, त्यामागे व्यसनाधीनता व कर्जबाजारीपणा यांसारखी प्रमुख कारणे समोर आली आहेत.
मलकापूर औद्योगिक क्षेत्र परिसरात असलेल्या एक्वा डायनामिक ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या संचालकांना अहिल्यानगर येथील डायनामिक फायनान्स कन्सल्टन्सी,अहिल्यानगर च्या प्रतिनिधींनी...आम्ही तुम्हाला पंधरा कोटींचं कर्ज मिळवून देतो. असं सांगून 45 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार एक्वा डायनामिक ग्रीन एनर्जी कंपनीच्या संचालकांनी 24 एप्रिल 26 व 20 जुलै 26 रोजी केली आहे. मात्र अद्याप यावर कुठलीही कारवाई झाली नसल्याचं कंपनीचे संचालक सांगत आहेत.
- कामासाठी माझे डोके खात रहा, म्हणजे कामे होत राहतील"; आमदारांना मुख्यमंत्री फडणवीसांचा मिश्कील सल्ला.
- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे आणि मोहन मते निधीसाठी सतत पाठपुरावा करतात; मुख्यमंत्र्यांचे कौतुक.
- मनपाच्या ५७९ कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण; मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सोहळा.
जळगाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ साठी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमधील पात्र शेतकऱ्यांची यादी प्राप्त झाली आहे. जिल्ह्यातील एकूण ५३ हजार ८९६ पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
हिमायतनगर–भोकर राष्ट्रीय महामार्गावरील सोनारी फाटा येथे भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिली.या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.हिमायतनगरकडून भोकरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने सोनारी फाटा येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिली.
यवतमाळच्या पांढरकवडा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मोहदा येथील सराफा दुकानातून 97 लाखांचे दागिने चोरणाऱ्या टोळीतील यवतमाळ पोलिसांनी पुणे येथून दोघांना अटक केली असून चौघांचा मध्यप्रदेश,गुजरात आणि राजस्थानात या राज्यात शोध घेतल्या जात आहेत.विशाल कुंभार राहणार चाकण तर राजकुमार राठोड राहणार दौंड पुणे असे अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या ‘कॅटॅलिस्ट्स फॉर चेंज’ कार्यक्रमात माहिती
महिला सुरक्षा, सक्षमीकरण आणि समानता अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हास्तरावर १० कलमी राष्ट्रीय कृती आराखडा लागू करण्यात येणार
२४ ते २६ या तारखेदरम्यान या प्रशिक्षण शिबिरात देशातील २७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील वरिष्ट प्रशासकीय व पोलिस अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला
NEET परीक्षेतील गैरप्रकार आणि पेपर फुटीच्या वादावरून देशभरात विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन सुरू असतानाच, केंद्र सरकार सार्वजनिक परीक्षांमध्ये होणाऱ्या अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आज संसदेत सुधारित 'अँटी-पेपर लीक' विधेयक (Public Examinations Prevention of Unfair Means Amendment Bill) मांडणार आहे. या प्रस्तावित कायद्याअंतर्गत परीक्षांचे पेपर लीक करणे किंवा संघटित कॉपी संस्था चालवणाऱ्या दोषींना ५ ते १० वर्षांपर्यंतचा कारावास आणि ५० लाख रुपयांपासून ते १० कोटी रुपयांपर्यंतच्या मोठ्या दंडाची कठोर तरतूद करण्यात आली आहे. तसेच अशा प्रकरणांची जलद चौकशी करण्यासाठी विशेष कृती दल (STF) आणि विशेष जलद गती न्यायालये (Fast-Track Courts) स्थापन करून ३ महिन्यांत खटला पूर्ण करण्याचे उद्दिष्ट यात ठेवण्यात आले आहे, जेणेकरून स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता टिकून राहील आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचे संरक्षण होईल.
ठाण्यात आज पहाटे पासून पावसाने काही अंशी विश्रांती घेतली आहे. मागील 10 तासात 30 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच राहणार आहे
दक्षिण गडचिरोलीतील जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या आल्लापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून आता संताप व्यक्त होत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली.
- तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने दडी मारल्याने नागपुरात उकाडा वाढला.
- तापमान ३३ अंश सेल्सिअसवर पोहोचले असून ते सरासरीपेक्षा २.६ अंशांनी अधिक.
- वाढलेल्या तापमानामुळे नागरिकांना प्रचंड उकाडया त्रास सहन करावा लागत आहे.
- कामठी तालुक्यातील आडका शिवारातील ढोऱ्या-पोऱ्या नाल्यात घडली घटना.
- आषाढी एकादशीनिमित्त शाळेला सुटी असल्याने तो मित्रांसोबत फिरण्यासाठी आडका येथे गेला होता.
- पोहण्यासाठी नाल्यात उतरल्यावर तो खोल पाण्यात गेल्याने बुडाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.