निम्मा पावसाळा संपत आला तरी धाराशिव जिल्ह्यात अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.अपेक्षित पाऊस न झाल्याने जलसाठे वाढण्याऐवजी घटत असून जिल्ह्यातील पाणीटंचाईची परिस्थिती पुन्हा एकदा गंभीर होऊ लागली आहे. जिल्ह्यातील एकूण 226 प्रकल्पांपैकी 13 प्रकल्प कोरडे पडले असून 127 प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली खाली गेला आहे.सध्या एकूण प्रकल्पांमध्ये केवळ 9 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.टंचाईग्रस्त गावांसाठी 135 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे
पर्यटननगरी लोणावळ्यावर वरुणराजाची सलग चौथ्या दिवशीही दमदार बॅटिंग सुरूच असून घाटमाथा अक्षरशः धुक्याची चादर आणि धबधब्यांनी नटला आहे. लोणावळा नगरपरिषदेच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत १२३ मिमी पावसाची नोंद झाली असून, यंदाचा एकूण पाऊस ३६५४ मिमीवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच कालावधीत ३४८० मिमी पाऊस झाला होता. यंदा पावसाने मागील वर्षाच्या तुलनेत आघाडी घेतली असून, घाटमाथ्यावर निसर्गाचे मनमोहक रूप खुलले असून पर्यटनस्थळी चार चाकी गाडीत जाताना पावसाचा अनुभव वेगळा पर्यटक घेत आहे...
पौर्णिमा तसेच सलग सुट्ट्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांचा गर्दीत वाढ होणार असल्याने तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीने 29 जुलै पर्यंत तुळजाभवानी मंदिराचे महाद्वार भाविकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या कालावधीत भाविकांना बिडकर पायऱ्या मार्गे मंदिरात सोडण्यात येणार आहे.याशिवाय भाविकांना सुलभ दर्शनासाठी 29 जुलै या कालावधीत मंदिर पहाटे एक वाजता उघडण्यात येणार आहे.मंदिर संस्थांच्या व्यवस्थापक तहसीलदार माया माने यांनी याबाबत जाहीर प्रकटन काढत ही माहिती दिली आहे. भाविकांची गर्दी ध्यानात घेऊन भाविकांना सुलभ दर्शनासाठी 29 जुलै पर्यंत मंदिर पहाटे १ वाजता चरणतीर्थ पूजेनंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे.सकाळी ६ वाजता अभिषेक पूजेला प्रारंभ होणार आहे या कालावधीत रात्री १०.३० वाजताच्या सुमारास प्रक्षाळ पूजेनंतर मंदिर बंद करण्यात येणार आहे.
दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलनात विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्यात आला होता या हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रास्तारोको करण्यात आले या प्रकरणात वंचितचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर निरज वाघमारे यांच्यासह 14 कार्यकर्त्यांवर यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
विदर्भ राज्य निर्मितीच्या मागणीसाठी पुन्हा एकदा विदर्भवादी नेत्यांनी वज्रमूठ आवळली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे आज विदर्भ राज्य निर्माण संकल्प मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी, विदर्भवादी नेते वामनराव चटप, शिवाजीराजे भोसले यांनी आपल्या भाषणातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. विदर्भ वेगळा होणार नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही म्हणणाऱ्या फडणवीसांनी लक्षात घ्याव,असं म्हणत लेकीच्या लग्नाच्या वेळी गिफ्ट म्हणून फडणवीस यांनी विदर्भ राज्याची निर्मिती करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. अन्यथा, नागपुरात देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी या दोन नेत्यांच्या घरासमोर मोर्चा निघेल, असा इशाराही त्यांनी दिला.
मराठा आरक्षणाचे बरेच प्रश्न मार्गी लागलेले आहेत.. त्यामुळे आता त्याची तीव्रता फारशी नाही, सातारा आणि कोल्हापूर गॅजेट बाबत सरकार गंभीर आहे.. असं मत राजाच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.. हैदराबाद गॅजेटचा प्रश्न शंभर टक्के निकाली लागला आहे.. शिष्यवृत्तीचा प्रश्न देखील मार्गी लागला आहे.. जी-जी चर्चा मनोज जरांगे पाटील यांच्याशी झाली होती. ते सर्व आदेश राज्य सरकारने काढले आहेत.. सातारा आणि कोल्हापूर गॅझेटचा प्रश्न प्रलंबित आहे. त्याबाबत कायदे तज्ज्ञांचा मार्गदर्शन घेण्यात येत आहे..
लोणावळ्यात पावसाचा जोर अधिक वाढला असून. मावळ तालुक्यात सर्वात जास्त पर्जन्यमान पर्यटन नगरीत होत असल्याची नोंद करण्यात आली. या पावसामुळे येथील निसर्ग सौंदर्य खुललं असून नैसर्गिक धबधबे प्रवाहित झाले आहेत. सध्या लोणावळा शहरातील सहारा ब्रिज पॉईन्टवर जागोजागी नेसर्गिक धबधबे प्रवाहित झाल्याचं चित्रं दिसून असून पर्यटकांना खुणावत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.