Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: पुण्यातील वडाचीवाडीमध्ये दुचाकी घसरण्याचे सत्र सुरूच

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज सोमवार, दिनांक २५ ऑगस्ट २०२५, मुंबई, ठाण्यात तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी, नाशिक पुण्यासह उर्वरित राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

पुण्यातील वडाचीवाडीमध्ये दुचाकी घसरण्याचे सत्र सुरूच

पुण्यातील वडाचीवाडीमध्ये दुचाकी घसरण्याचे सत्र सुरूच

दुचाकी घसरून लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक जखमी

लागोपाठ सहा दुचाकी घसरून अपघात घडल्याची घटना आज वडाचीवाडी उंड्री रस्त्यावर घडली

यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र काही दुचाकी चालकांना गंभीर दुखापतीला सामोरे जावे लागले आहे

पावसाने उघडीप दिली मात्र दुचाकी घसरण्याची नवी समस्या

रस्त्यावर झालेल्या चिखलातून गाड्या घसरण्याची प्रमाण वाढले आहे

एका जेस्ट नागरिकाला पायाला गंभीर दुखापत झाली,तर शाळेत सोडवण्यात आलेल्या महिलेची गाडी घसरून पडल्याने तिला आणि लहान मुलाला दुखापत झाली

अपघातामध्ये लहान मुलाला तोंडाला दुखापत

हा रस्ता रुंदीला लहान आहे त्यातच येथे खडी वाहतूक करणारे डंपर लांब रंग लावून रास्तच अडवत असल्याचा आरोप

टोमेटोच्या दरात घसरण,आवक वाढली,दर घसरले

नाशिक जिल्ह्यातील चांदवड,मनमाड परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटो ची लागवड केली असून,टोमॅटोची काढणी जोरात सुरू झालीय,काही दिवसांपूर्वी 700 ते 800 रुपये क्रेट दर मिळत असताना अचानक आवक वाढल्याने दर कोसळले असून 20 किलोच्या क्रेट ला अवघा 450 ते 500 रुपये दर मिळू लागला आहे,मात्र किरकोळ बाजार टोमॅटो 30 ते 40 रुपये किलो ने विकला जात आहे,दर घासल्याने लागवडीसाठी झालेला खर्च,गाडी भाडे,काढणीचा मजुरी खर्च या मिळत असलेल्या भावात वसूल होत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

- गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

- दुपारी ३ वाजल्यापासून गंगापूर धरणातून १८८९ क्यूसेक वेगानं पाण्याचा विसर्ग

- धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम असल्यानं धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

- पावसाची संततधार कायम राहिल्यास टप्प्याटप्प्याने धरणातून करण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईदौऱ्यासाठी अंतरवाली सराटीत जोरदार तयारी

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईदौऱ्यासाठी अंतरवाली सराटीत जोरदार तयारी...

लेझीम पथकाची रंगीत तालीम, मनोज जरांगे देखील झाले सहभागी..

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असलेली गाडी अंतरवाली सराटीत दाखल...

27 ऑगस्टला सकाळी मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना होणार आहेत...

तोडफोड अन् दहशत माजवणाऱ्या मुलांची कोंढवा पोलिसांनी काढली धिंड

पुण्याच्या कोंढव्यात वाहनांची तोडफोड अन् दहशत करणाऱ्या मुलांची कोंढवा पोलिसांनी काढली धिंड

एका आरोपीसह तीन अल्पवयीन ताब्यात

कोंढव्यात मिटानगर भागात अल्पवयीन 20 ते 25 जणांच्या टोळक्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन रिक्षा दोन कारच्या काचा फोडून परिसरात थैमान घातल्याचा व्हिडिओ वायरल झाला होता.

या प्रकरणी चौघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन अल्पवयींन ताब्यात घेतले आहे.

राहुल पाटील यांचा काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस (AP )मध्ये प्रवेश

मागील निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक फेरबदल झालेत

माझे वडील पी.एन पाटील आणि माझ्या मातोश्री गेल्या, पवार साहेबांनी आणि पवार कुटुंबीयांनी धीर दिला, मात्र काहींना आमची आठवण देखील झालेली नाही

आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आमचे सगळे कार्यकर्ते आता राष्ट्रवादीचे शिलेदार असणार - राहुल पाटील

महाड शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रामक

महाड शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले असून या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झाला असून खड्डयांमध्ये पोहत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी महाड नगर पालिकेचा निषेध केला. मे महिन्यात महाड नगर पालिकेने रस्त्यांवरील खड्डे बुजवले होते. केवळ तीन महिन्यात रस्त्यावर पुन्हा खड्डे पडले. महाड नगर पालिकेच्या या भोंगाळ कारभाराचा रस्त्यांवरील खड्डयांमध्ये पोहण्याच्या स्पर्धा आयोजित करून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. नगर पालिका प्रशासनाचा धिक्कार करीत पक्षाच्या जयजयकाराच्या घोषणा या वेळी देण्यात आल्या. यावेळी विजेत्या कार्यकर्त्याला कोंबडी बक्षिस देण्यात आली. ठेकेदारा बद्दल आमची तक्रार नाही, जनतेचा खड्डयात गेलेला पैसा अधिकाऱ्यांकडून वसून करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Satpuda: सातपुड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे निझरा नदीला पूर....

प्रवाशांनी भरलेली एक बोलेरो गाडी पुराच्या पाण्यात अडकली....

पुरात अडकलेल्या वाहनाला ग्रामस्थांच्या मदतीने काढले बाहेर....

तळोदा तालुक्यातील सावरपाडा आणि धनपूर या गावांना जोडणाऱ्या पुलाचे काम निधीअभावी गेल्या आठ महिन्यांपासून रखडले....

निधीअभावी अर्धवट राहिलेल्या पुलामुळे पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून पाण्यातून प्रवास....

प्रशासन नदीपात्रात न जाण्याची सूचना करत असले तरी, पूल अर्धवट असल्याने ग्रामस्थांना नाइलाजास्तव करावा लागतो धोकादायक प्रवास.....

Kandivli: कांदिवलीत पुनर्विकास सुरू असलेली कांती टेरेस इमारत कोसळली

आज सकाळच्या 9 च्या सुमारास कांदिवली पोलिस ठाणे हद्दीतील एस. व्ही. रोडवरील कांती टेरेस ही पुनर्विकासासाठी गेलेली इमारत कोसळल्याची घटना घडली.

सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची माहिती नाही. घटनेनंतर तात्काळ कांदिवली पोलिस आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (BMC) पथक घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवले आहे.

या इमारतीचे पुनर्विकासाचे काम सुरू असताना आज सकाळी हा अपघात घडला. परिसरात सुरक्षिततेसाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात येत आहे.

धाराशिवमधून १२ हजार गाड्या मुंबईकडे निघणार, ५० हजार मराठा बांधव आंदोलनात सहभागी होणार

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातुन मराठा समाज बांधव मुंबईला जाण्याच्या तयारीत असुन धाराशिव जिल्ह्यातील सारोळा गावात जोरदार तयारी करण्यात आली. आंदोलनासाठी खास ट्रॅक्टर तयार केली असून त्यामध्ये पंधरा दिवसाच्या स्वयंपाक सह सर्व नियोजन आहे. आज गावात जनजागृती करून उद्या आंतरवालीकडे मराठा कार्यकर्ते रवाना होणार आहेत. आता आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरायचं नाही असा निर्धार यावेळी त्यांनी केला.

 गोमातेच्या सुरक्षेवरुन सदाभाऊ खोत यांचा सरकारला इशारा

जर सरकारने आमच्या गाईच करायचं काय हे ठरवलं नाही तर सगळ्या गाई घेवून राज्यात पोलीस स्टेशन समोर आम्ही आंदोलन करू

सगळ्या शेतकरी नेत्यांना घेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घ्यावी

गो रक्षक आता मुंबईतून यायला लागले मुंबईत कुठ गोठ आहेत

सदाभाऊ खोत यांचा गो रक्षकांना इशारा

Ganeshotsav: गणरायाच्या आगमन आणि विसर्जनाच्या दिवशी पुणे जिल्ह्यात "ड्राय डे" घोषित

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

गणपती आगमन आणि विसर्जन दिवशी संपूर्ण पुणे जिल्ह्यात दारूबंदी

२७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या काळात पुणे शहरातील खडक, विश्रामबाग आणि फरासखाना पोलीस ठाण्यातील अंतर्गत येणाऱ्या सर्व दारू विक्रेत्यांना सक्त ताकीद

या कालावधीत तिन्ही पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणारी दारूचे दुकानं बंद ठेवण्याचे आदेश

पुणे जिल्ह्यात पाचव्या आणि सातव्या दिवसाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात

आदेशाचे पालन न करणाऱ्या विरोधात प्रशासनाकडून कठोर कारवाईचा इशारा

पनगेश्वर साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच रेणा प्रकल्पात जलसमाधी आंदोलन

लातूरच्या रेणापूर तालुक्यातील पनगेश्वर शुगर लिमिटेड पानगाव या साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी रेणा माध्यम प्रकल्पात जलसमाधी आंदोलन केल आहे. कर्मचाऱ्यांच्या हक्काची हक्काची थकीत पगार ग्रॅव्हिटी पीएफची रक्कम तसेच जुन्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर घेण्यासाठी आंदोलक आक्रमक झाले होते. यावेळी प्रशासनाने मध्यस्थी करत आंदोलकांना जलसमाधीपासून थांबवण्याचा देखील प्रयत्न केला आहे.

Dharavi: धारावी अंडरग्राउंड मेट्रो स्थानकात कोब्रा

धारावी अंडरग्राउंड मेट्रो स्थानकात रविवारी सकाळी कोब्रा जातीचे पिल्लू आढळल्याने प्रवासी व कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक सर्पमित्र कौशिक केणी आणि ऋशीत सावंत यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पिल्लाला सुरक्षितरीत्या पकडत जंगल परिसरात सोडले.

पावसाळ्यात साप बाहेर येण्याच्या घटना वाढतात. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता त्वरित सर्पमित्रांचा किंवा अग्निशमन दलाचा संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Solapur: सोलापुरात मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक

- वराह जयंती निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाकडून उपरोधक आंदोलन

- सोलापुरातील चार हुतात्मा पुतळ्यासमोर शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन

- मंत्री नितेश राणे यांच्या प्रतिमेवर वराहाचे प्रतिकात्मक चित्र लावून व्यक्त करण्यात आला निषेध

- मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या जोरदार घोषणा

मराठा आरक्षणाचा गुलाल उधळूनच परतणार- मनोज जरांगे पाटील

आम्हाला वाहतूक कोंडी करायला जायचे नाही. मुंबईमधील कोणताही एक रस्ता आम्हाला द्या. आम्हाला न्यायासाठी द्यायला जायचेय. कुणाला त्रास व्हायचा म्हणून आम्ही जात नाही. आम्ही चाकण मार्गे जात आहोत. कल्याण मार्गे जात नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.

पालकमंत्री संजय राठोड कडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी

यवतमाळच्या उमरखेड, महागाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टर जमीन खरडून गेली, तीन हजार घरे पुरामुळे बाधित झाली यामुळे शेतीसह नागरिकांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी नुकसानग्रस्त भागाला भेटी देऊन शेतकऱ्यांसह नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.महागांव नंतर उमरखेड तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर मंत्री संजय राठोड उपविभागीय कार्यलयात आढावा बैठक घेणार आहे.

धाराशिव जिल्ह्यातुन १२ हजार गाड्या मुंबईकडे निघणार

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातुन मराठा समाज बांधव मुंबईला जाण्याच्या तयारीत असुन धाराशिव जिल्ह्यातील सारोळा गावात जोरदार तयारी करण्यात आली. आंदोलनासाठी खास ट्रॅक्टर तयार केली असून त्यामध्ये पंधरा दिवसाच्या स्वयंपाक सह सर्व नियोजन आहे. आज गावात जनजागृती करून उद्या आंतरवालीकडे मराठा कार्यकर्ते रवाना होणार आहेत.

परळीत मनोज जरांगे पाटील यांच्या बॅनरवर झळकले दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचा फोटो...

A मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे 29 ऑगस्ट रोजी मुंबई येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन होणार आहे.परळी तालुक्यातील हजारोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईच्या दिशेने निर्माण होणार आहे. त्यातच परळी येथे चलो मुंबई असे आशयाचे मोठे होर्डिंग लावले गेले आहे. आणि याच होर्डिंग वर मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचा फोटो देखील लावण्यात आलेला आहे. मराठा समन्वयक अमित घाडगे पाटील यांनी परळीत राणी लक्ष्मीबाई चौकात लावलेले हे होर्डिंग चर्चेचा विषय ठरत आहे.

Nagpur: नागपुरात काँग्रेस पक्षाकडून महापालिकेत अनोखे आंदोलन

नागपुरात काँग्रेस पक्षाकडून महापालिकेत अनोखे आंदोलन करण्यात येत आहे.. शहरातील विविध रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात हे आंदोलन सुरू असून या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांच्या फोटो आणि जीपीएस लोकेशनसह हे आंदोलन सुरू केले आहे... मनपाचा खड्डे मुक्त नागपूरचा दावा खोटा ठरवण्यासाठी एका प्रकारे काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुरावेच या आंदोलनात आणले आहे...

नाशिकमधील सार्वजनिक गणेश मंडळांचा गणेशोत्सवावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत

- गणेशोत्सव अवघ्या २ दिवसांवर आला तरी अद्याप शहरातील सार्वजनिक गणेश मंडळे महापालिकेच्या परवानगीच्या प्रतीक्षेत

- शहरात जवळपास १८०० सार्वजनिक गणेश मंडळे मात्र परवानगी अवघ्या १५ गणेश मंडळांना

- महापालिका प्रशासनाकडून परवानगी मिळत नसल्याने सार्वजनिक गणेश मंडळ आक्रमक

- परवानगीसाठी गणेश मंडळांनी शुल्क भरण्याच्या महापालिकेच्या सूचना

नायगाव मध्ये इनोव्हा गाडी आणि स्कुटीची धडक. अपघातात पत्रकार रामप्रसाद चन्नावार यांचा मृत्यू

नांदेडच्या नायगाव येथे इनोव्हा गाडी व दुचाकीत अपघात झाला आहे. या अपघातात नायगाव येथील पत्रकार रामप्रसाद चन्नावार याचा मृत्यू झाला आहे. या अपघातात चन्नावार यांच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. नागरिकांनी तात्काळ त्यांना नायगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविले मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले आहे.

Maharashtra Live News Update: जमीन घोटाळ्यात शिरसाट यांचा हात, रोहित पवारांचा गंभीर आरोप

सिडकोने बिवलकर कुटुंबाची जागा हडप केली. जमीन घोटाळ्यात मंत्री संजय शिरसाट यांचा हात असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

Maharashtra Live News Update: बदलापुरात गणेशोत्सवासाठी मोफत बस सेवा

मोठ्या संख्येने कोकणवासी नागरिक नोकरी कामधंद्या निमित्तानं बदलापूर शहरात राहतात. या कोकणवासियांना गणेशोत्सवासाठी बदलापूर शिवसेना शहर शाखा आणि वामन म्हात्रे फाऊंडेशनच्या वतीने मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्यात आलीय. कोकणवासीयांना घेऊन 12 बसेस कोकणाच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी भगवा झेंडा दाखवल्यानंतर या बसेस निघाल्या, या बसेस मधून 750 कोकणवासीय हे कोकणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी निघाले आहेत. या नागरिकांना शिवसेना शहर शाखेकडूनकडून मोफत पूजा साहित्य तसच अल्पपोहारही देण्यात आला. या सर्व बसेस रायगड, रत्नागिरी, खेड, चिपळूण, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, अशा शहरांसोबतच पश्चिम महाराष्ट्रातील शहरातही जाणार आहेत.

रत्नागिरी- गणपतीसाठी येणाऱ्या कोकणवासीयांना यावर्षी देखील खड्ड्यांचा विघ्न

रत्नागिरी ते संगमेश्वर भागात रस्त्याची दयनीय अवस्था

निवळी घाट परिसरात बावनदी जवळ मोठ्या प्रमाणात खड्ड्यांच साम्राज्य

कोकणवासीय तब्बल 12 तासाचा प्रवास करून येत आहेत कोकणात

खराब रस्त्यांमुळे कोकणवासीय होत आहेत हैराण

गेले 17 वर्षे मुंबई गोवा महामार्गाचे रखडलय चौपदरीकरणाचे काम

खराब रस्त्यांपासून यावर्षी देखील कोकणवासीयांची सुटका नाही

महामार्गावरील खड्डे बुजवल्याचा प्रशासनाचा दावा

अमित साटम मुंबईचे अध्यक्ष होणार, थोड्याच वेळात अधिकृत घोषणा

भरधाव इनोव्हा कार अपघातग्रस्त ट्रक वर धडकून भीषण अपघात.

राष्ट्रीय महामार्ग क्र 6 वर खामगाव जवळ वळण मार्गावर सकाळी अपघात.

कार धुळे येथून नागपूर कडे जाताना सकाळी झाला अपघात.

अपघातात कार मधील दोघे गंभीर जखमी. जखमींवर खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू.

पुणे मुंबई महामार्गावर अपघात

पिंपरी चिंचवड शहरातील जुन्या पुणे मुंबई महामार्गावर एका मोठ्या टँकर ला अपघात झाला आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या टँकर चालकाचं त्याच्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. चिंचवड कडून पुण्याच्या दिशेने जाताना सेंट मदर टेरेसा उडान पुलाखाली हा अपघात झाला आहे. अपघात झालेला टँकर हा अग्रवाल ग्रुपचा आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.

दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि अजित पवार हे जरांगेना आतून मदत करत आहे. अनेक आमदार हे पैसे पुरवत आहे, शरद पवार आणि पवार हे एकत्रच आहे असाही आरोप केला. गेवराईत आज जाणार पुतळा काय जाळता, मी स्वतः येतो मला जाळा
लक्षण हाके

डंपर ट्रक खाली चिरडल्या गेलेल्या चिमुकल्या प्रत्युषा संतोष बोराटे च्या कुटुंबीयांचा क्रीषाला बिल्डरच्या कार्यालया समोर आंदोलन

12 ऑगस्टला जॉय विले सोसायटी समोर क्रिशाला बिल्डरच्या साइटवर जाणाऱ्या एका डंपर ट्रक खाली चिरडून अकरा वर्षाच्या चिमुकल्या प्रत्युषा हिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणात हिंजवडी पोलिसांनी डंपर ट्रक चालक फरहान मन्नू शेख याला अटक केली आहे. मात्र या प्रकरणात क्रिशाला बिल्डरवरही गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी प्रत्युषाच्या वडिलांनी काल क्रिशाला बिल्डर च्या कार्यालयासमोर हातात फलक घेऊन आंदोलन केला आहे. मात्र यावेळी हिंजवडी पोलिसांकडून प्रत्युषाचे वडील संतोष बोराटे यांना अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. हिजवडी परिसरामध्ये बेदरकारपणे चालविण्यात येणाऱ्या डंपर ट्रक मुळे अनेक निष्पपांचे जीव जात आहेत. या अपघातांना डंपर ट्रक चालक आणि बांधकाम व्यावसायिक जबाबदार आहेत त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांनी आणि परिवहन विभागांनी कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी प्रत्युषाच्या कुटुंबीयांनी केली आहे.

कल्याण - शीळ रोडवर मोठा दिशा दर्शक फलक अचानक कोसळला...

कल्याण शीळ रोडवर गेले काही दिवस प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे, यातच मध्यरात्री अचानक मोठा दिशादर्शक फलक अचानक रस्त्यावर कोसळला आणि काही काळ दोन्ही साईडची वाहतुक ठप्प झाली होती. पोलीस, फायब्रिगेड यांनी पडलेला फलक बाजूला काढला.. दरम्यान या घटनेत एक बाइक स्वार जखमी होता होता वाचला.. सुदैवाने कोणतीही हानी नाही

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या बाब्या ऊर्फ शेख नफिजचा धारदार शस्त्राने खून

बुलढाणा तालुक्यातील सैलानी येथे काल मध्यरात्री जुन्या वैमनस्यातून बुलढाणा येथील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या बाब्या उर्फ शेख नफिज शेख हफिज याचा धारदार शस्त्राने वार करत तसेच लाकडी दांड्याने मारहाण करून खून केल्याची घटना घडलीय.. सैलानी येथील बरीबाबा दर्गा असलेल्या रस्त्यावर हल्लेखोरांनी बाब्या वर प्राणघातक हल्ला चढवला.. अलेक्स इनोक जोसेफ ऊर्फ रोनी , शेख सलमान शेख अशपाक , आणि सैयद वाजीद सैय्यद राजू ऊर्फ वाजीद टोपी , सर्व राहणार सैलानी, या तिघांनी मिळून धारदार शस्त्र तसेच लाकडी दांड्याने बाबूवर हल्ला केला... दरम्यान गंभीर जखमी झालेल्या बाबूचा घटनास्थळीच मृत्यू झाला.. घटनेची माहिती मिळताच रायपूर पोलिसानी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.. मात्र आरोपी घटना स्थळावरील फरार झाले होते.. पोलिसांनी तात्काळ पथक तयार आरोपींचे मागे लावले , आणि तांत्रिक बाबींचा वापर करून आरोपींना जाफराबाद येथून अटक केलीय .. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केलाय .. आरोपींनी खुनाची कबुली सुद्धा दिलीय .. मात्र या घटनेने सैलानी परिसरात एकच खळबळ उडालीय ...

नाशिकमध्ये सातत्याने बदलणाऱ्या वातावरणामुळे शहरात तापाच्या रुग्णांची संख्या वाढली

नाशिक मध्ये सुरू असलेल्या पावसामुळे सतत वातावरणात होणाऱ्या बदलाने नाशिककरांच्या आरोग्यावर त्याचा मोठा परिणाम होत आहे. गेल्या महिन्याभरात नाशिकमध्ये 4 हजार 408 तापाच्या रुग्णांची नोंद झाली असून यात 64 डेंगूच्या रुग्णांची देखील भर पडली आहे. नाशिक महानगरपालिकेच्या सहाही विभागात 150 पथक नेमून डेंग्यू नियंत्रणाबाबत नाशिक आरोग्य विभाग सतर्क झाले आहेत. आरोग्य विभागाच्या पथकांनी केलेल्या तपासणी 1हजार 431डास अळी आढळून आल्या आहेत.

तुळजापुर मधील पिता पुञाची १६ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक,बनावट लिंक पाठवुन घातला गंडा

धाराशिव च्या तुळजापूर मधील पिता पुञाची अज्ञात आरोपींनी अधिक पैशाच्या आमिषाने फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय. कालिदास लिंबाजी गवळी व मुलगा कृष्णा याला आरोपींनी अधिक पैशाचे आमिष दाखवले.एक बनावट लिंक तयार करुन ती व्हॉट्सअॅपने पाठवली या लिंक द्वारे पिता पुञाची १६ लाख ८५ हजार ४९८ रुपयांची अॉनलाईन फसवणूक करण्यात आली आरोपींनी वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधुन फिर्यादीचा विश्वास संपादन करत बनावट योजनेत गुंतवले व आर्थिक फसवणूक केली या प्रकरणी सायबर पोलिसात तक्रार दिली असुन पोलिस अधिक तपास करत आहेत.

विघ्नहर्ता गणपतीच्या आगमनाला पावसाचा अंदाज

- नागपूर सहित विदर्भातील काही भागात बुधवारी पावसाचा अंदाज

- मंगळवार ते बुधवार दरम्यान नागपूर सह विदर्भात पावसाचा अंदाज

- मंगळवारी नागपूर,भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट

- तर बुधवारी या पाच जिल्ह्यांसह अमरावती, वर्धा अशा सात जिल्ह्यांना येलो अलर्ट

- तर गुरुवारी संपूर्ण विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय...

हद्द वाढीनंतर नगरपालिका क्षेत्रात आलेल्या गावांना सुविधा मिळेना

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असल्याने अनेक राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते गट,गण आणि वॉर्डचे नियोजन करत असताना धाराशिव जिल्ह्यातील केकस्थळवाडी या गावानं नगरपरिषद क्षेत्र आम्हाला नको अशी भूमिका घेतलीय.2008 साली झालेल्या हद्दवाडीत केकस्थळवाडी, राघोचीवाडी आणि जाधववाडी या ग्रुप ग्रामपंचायत मधील गावांचा समावेश धाराशिव नगरपरिषद क्षेत्रात समावेश करण्यात आला मात्र 17 वर्षात या गावांना कोणत्याही सुविधा मिळाल्या नाहीत,खराब रस्ते,अस्वच्छ गटार,बंद पडलेली जिल्हा परिषदेची शाळा,अपुरी लाईट व्यवस्था यामुळे 300 लोक वस्तीच्या केकस्थळवाडी गावातील सर्व ग्रामस्थांनी आम्हाला नगरपरिषद क्षेत्रात नको अशी भूमिका घेतलीय.

भूमी अभिलेख विभागाची कडक कारवाई; रजेवरील अधिकाऱ्यांचे निलंबन

आवडीच्या ठिकाणी बदली न मिळाल्याने दीर्घ काळ रजेवर राहणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध भूमी अभिलेख विभागाने कारवाई सुरू केली आहे.

नाशिकच्या उपसंचालक पदावरील महिला अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले असून, आणखी १० अधिकाऱ्यांविरोधात प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आले आहेत.

यामध्ये दोन जिल्हा अधीक्षक आणि सात ते आठ उपअधीक्षकांचा समावेश आहे. बदलीनंतर विदर्भ, मराठवाड्यात रुजू होण्यास टाळाटाळ होत असल्याने स्थानिक कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे दीर्घकाळ रजेवर राहणाऱ्यांविरोधात थेट निलंबनाची कारवाई होणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

धर्मादाय रुग्णालयांत २४ तास ‘आयपीएफ’ योजनेची माहिती उपलब्ध

गरजू रुग्णांना गरीब रुग्ण (आयपीएफ) योजनेचा लाभ सहज मिळावा, यासाठी सह धर्मादाय आयुक्त कार्यालयाने महत्त्वाचा आदेश काढला आहे.

त्यानुसार राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांनी २४ तास योजनेची माहिती देणाऱ्या समन्वयक किंवा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागणार आहे. सध्या समाजसेवक ठरावीक वेळेतच उपलब्ध असल्याने अनेक रुग्णांना विशेषतः रात्री अडचण येते.

त्यामुळे तत्काळ मार्गदर्शन व उपचार मिळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

नियमानुसार धर्मादाय रुग्णालयांनी १० टक्के खाटा निर्धन व १० टक्के खाटा गरीब रुग्णांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे.

एम्बरग्रीससह तिघे ताब्यात, स्पर्म व्हेल माशाच्या उलटी प्रकरणी, पुण्यात वनविभागाची कारवाई

स्पर्म व्हेल हा संरक्षित व लुप्तप्राय प्राणी असून, वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार एम्बरग्रीसचा व्यापार बेकायदेशीर आहे. त्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. प्राथमिक सुनावणीनंतर तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना तीन दिवसांची वनकोठडी ठोठावली होती. त्यानंतर २४ ऑगस्ट रोजी पुन्हा न्यायालयात हजर केल्यानंतर आणखी तीन दिवसांची वनकोठडी देण्यात आली. प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने आणखी कोण सामील आहेत, याचा तपास वनविभागाकडून सुरू आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघा तरुणांना पकडून बाणेर पोलिसांनी केला 3 किलो गांजा जप्त

बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलसमोर अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघा परप्रांतीय तरुणांना अटक करुन बाणेर पोलिसांनी ३ किलो ४०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे.रवि विजय वर्मा (वय १९, रा. शिव काूलनी, पिंपळे सौदागर, मुळ रा. भरतकुप जि. चित्रकुट, उत्तर प्रदेश), कौशेलेंद्र नथुप्रसाद वर्मा (वय २३, रा. शिव कॉलनी, पिंपळे सौदागर, मुळ रा. बरथवाल, भरतकुप, जि. चित्रकुट, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.याबाबत पोलीस अंमलदार दत्ता संभाजी काळे यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही कारवाई २२ ऑगस्ट रोजी रात्री सव्वा वाजता बाणेरमधील ज्युपिटर हॉस्पिटलच्या समोर करण्यात आली.

राज्यातील काही जिल्ह्यातच 29 ऑगस्टपर्यंत पाऊस सुरू राहणार

कोकण, मध्य महाराष्ट्र अन् विदर्भातच हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

मराठवाडा आणि उत्तर महष्ट्रात तुलनेत पाऊस खूप कमी झाला आहे.

गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यात तुफान पाऊस सुरू आहे.

त्याचा परिणाम म्हणून राज्यातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस सुरू झाला आहे.

बहुतांश भागात हलका ते मध्यम पावसाने हजेरी लावली. यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना समावेश आहे. असाच पाऊस 29 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे

भंडाऱ्याच्या तुमसरात विशाल दहीहंडी महोत्सवात थिरकले आमदार राजु कारेमोरे

भंडाऱ्याचा तुमसर येथे तुमसरचे आमदार राजु कारेमोरे यांचा दहीहंडी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. तुमसर -मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांनीही हजेरी लावली. दरम्यान, नागरिकांसह डीजेच्या तालावर थिरकत आमदार यांनी आनंद लुटला. नागरिकांचा डीजेचा तालावर थिरकताना बघून आमदारांना मोह आवरला नाही. आमदारांचा डान्स करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसतोय.

क्षणभर विश्रांती घेतल्यानंतर नवी मुंबई शहरामध्ये पावसाला सुरुवात.   रिमझिम नवी मुंबई शहरात पाऊस खारघर बेलापूर वाशी नेरूळ या ठिकाणी सुरुवात

जुगार अड्ड्यावर टाकलेल्या पोलिसांच्या छाप्यात 7 जणांना अटक

पोळ्याच्या सणात ग्रामीण भागात जुगार मोठ्या प्रमाणात खेळल्या जातो. लाखनी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या केसलवाडा वाघ या गावात एका ठिकाणी जुगार खेळल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी केलेल्या या कारवाई 7 जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून 6 मोबाईल, 4 दुचाकी, रोख रक्कम असा एकूण 3 लाखांचा मुद्देमाल लाखनी पोलिसांनी जप्त केला.

पनवेलमध्ये पर्यावरणपूरक कागदापासून गणपतीच्या मूर्ती

यंदाच्या गणेशोत्सवात पनवेलकरांना एक वेगळीच झलक पाहायला मिळणार आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस आणि रंगीत रसायनांच्या ऐवजी पर्यावरणपूरक कागदी पेपर पासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्तींना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

तळोजा मधील नितलस गावातील स्थानिक तरुण प्रत्येक मोरेश्वर पवार या कलाकारानी पर्यावरण पूरक संकल्पनेला प्रत्यक्षात आणले असून, जुन्या कागदाचे पुनर्वापर करून गणरायाच्या आकर्षक मूर्ती घडवल्या आहेत. या मूर्तींची खासियत म्हणजे त्यांचे विसर्जन केल्यावर पाण्यात कोणतेही प्रदूषण होत नाही, उलट पाण्यात सहज विरघळून पर्यावरणाचे रक्षण करते.

तुळजापुरात संत सेना महाराज सभागृहाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

:तुळजापुरात नाभिक समाजाचे आराध्य संत शिरोमणी श्री संत सेना महाराज नाभिक समाज सभागृहाचे भूमिपूजन तुळजापूर मधील कुंभार गल्ली कारपार्किंग शेजारील नियोजित जागेवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. नाभिक समाजाच्या या सेवाकार्यास निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचे मत आमदार पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केल.सकल नाभिक समाजाचा तुळजापूर येथील मागील 40 वर्षापासुन प्रलंबित जागेचा प्रश्न आमदार राणाजगजितसिंह पाटील माध्यमातून यंदा मार्गी लागला असून या जागेवर संत सेना महाराज सभागृह निर्माण कार्यास शुभारंभ नाभिक बांधवांच्या उपस्थितीत करण्यात आला.

कळंबोलीतून सिंधुदुर्गकडे गणेशभक्तांची विशेष बससेवा...

कोकणातील घरगुती गणेशोत्सवासाठी कळंबोलीतून सिंधुदुर्गच्या दिशेने गणेशभक्तांचा लोंढा रवाना झाला. तळकोकणातील विविध तालुक्यातून नोकरीनिमित्त कळंबोलीत स्थायिक झालेल्या सुमारे १५० कुटुंबांच्या विनंतीवरून सिंधुदुर्ग शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक संस्थेच्या माध्यमातून भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते यात्रेकरूंकरिता खास बससेवा उपलब्ध करून देण्यात आली.

बस रवाना करताना “गणपती बाप्पा मोरया”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यात्रेकरूंना शुभेच्छा देण्यासाठी भाजप शहराध्यक्ष रविंद्र पाटील आणि पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका प्रमिलाताई पाटील उपस्थित होत्या.

वरंध घाट मार्ग वाहतुकीसाठी खुला

रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. पावसाळ्या दरम्यान वारंवार घडणाऱ्या दरड दुर्घटनेच्या घटनांच्या पार्श्वभुमीवर रायगड आणि पुणे जिल्हा प्रशासनाने वरंध घाट वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या बंदीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता तर आगामी गणेशोत्सव व सणासुदीच्या काळात या रस्त्यावरील वाहतूक सुरु करण्याची मागणी वारंवार स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांकडून केली जात होती. या मागणीच्या अनुषंघाने रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी परिपत्रक काढून वरंध घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुला केला असून अतिवृष्टीचे काळात घाटातुन वाहतुक बंद ठेवण्याच्या निर्देश देखील केल्या आहेत.

ज्वेलर्समध्ये चोरी करणारी निघाली वयोवृद्ध महिला

यवतमाळच्या दारव्हा शहरातील शिवकृपा ज्वेलर्स दुकानातून चार जोडे सोन्याचे कानातील लटकन लंपास करणाऱ्या महिलेला एलसीबीने अकोला येथून अटक केली.दरम्यान ही घटनेना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून एलसीबीने बारकाईने तपासाचा छडा लावून महिलेला अटक केले.मुमताज परवीन अब्दूल शकील असे चोरी करणाऱ्या महिलेचे नाव आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Health : सलूनमध्ये दाढी करणे खरोखरच सुरक्षित आहे का? लिव्हर संबंधीत धक्कादायक सत्य

Sanjay Shirsat: भर कार्यक्रमात संजय शिरसाट म्हणाले... तर माझी पैशाची बॅग उघडीच आहे|VIDEO

Pune: पुण्यात फ्रेशर पार्टींची क्रेझ, पबमध्ये अंडर २१ मुलांचा तुफान राडा; VIDEO व्हायरल

Nandurbar : मुसळधार पावसाने सातपुड्यातील निझरा नदीला पूर; प्रवाशांनी भरलेली गाडी पुराच्या पाण्यात अडकली

MLA Sadabhau Khot Attack : गोरक्षकांकडून आमदार सदाभाऊ खोत यांना धक्काबुक्की| Video

SCROLL FOR NEXT