Maharashtra News Live Update Saam TV Marathi
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज थेट राजभवनावर आंदोलन

Marathi Breaking Live Headlines Updates : नीट पेपरफुटीवरून संसदेत विरोधक आक्रमक होण्याची शक्यता, जंतर मंतरवर CJP चं आंदोलन, महाराष्ट्रात पावसाचा अंदाज, आषाढी वारी अपडेट, राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

नांदेड जिल्ह्यात अनेक जिल्हा परिषदेच्या शाळेच्या खोल्या झाल्या जीर्ण

नांदेड जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषदेच्या शाळेच्या खोल्या जीर्ण झालेले आहेत.सध्या पावसाळा सुरू असल्याने शाळेच्या. खोल्यांचा स्लॅब कोसळण्याच्या घटना घडत आहेत. नांदेडच्या किनवट तालुक्यातील डोंगरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या खोलीचा स्लॅब कोसळला आहे.सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.ही शाळा अतिशय जीर्ण झाली आहे. वर्गखोल्या संपूर्ण गळत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावं लागत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने जीर्ण झालेली शाळा पडून नवीन इमारत बांधून द्यावी अशी मागणी गावाकऱ्यांनी केली आहे.

nashik-surgana-गळक्या एसटीमधून प्रवास,बसमध्ये छत्री धरून प्रवास करण्याची वेळ

नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील आदिवासी भागात धावणाऱ्या एसटी बसची दुरवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. पावसाळ्यात बसच्या छतामधून मोठ्या प्रमाणात पाणी गळत असल्याने प्रवाशांना चक्क बसमध्ये छत्री धरून प्रवास करावा लागत आहे.बसमधील ही धक्कादायक परिस्थिती समोर आली

पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट दिलेला असून पुढील 3 तासांत जिल्ह्यांमधील काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे.  

पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या गाड्या उशिराने

- पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या गाड्या उशिराने . उपनगरीय लोकल सेवा मात्र सुरळीत . गुजरात हुन मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या हमसफर एक्सप्रेसच्या इंजिन मध्ये बिघाड झाल्याने मुंबईकडे येणारी फ्लाईंग राणी एक्सप्रेस देखील अडकून पडली . घोलवड जवळ इंजिनमध्ये बिघाड झाल्याने लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर परिणाम . गुजरातच्या वापी उदवाडा भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या आधीच उशिराने . उदवाडा जवळ एकाच ट्रॅकवरून वाहतूक सुरू असल्याची माहिती .

नागपुरात वेगवेगळ्या भागात सामाजिक कार्यक्रम

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नागपुरात वेगवेगळ्या भागात सामाजिक कार्यक्रम

- देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त लक्ष्मी नृसिह महायज्ञाचं आयोजन, *महायज्ञात ५६ समाजाची जोडपी. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॅा. बबनराव तायवाडे हे सुद्धा पुजेत सहभागी * सामाजिक एकोप्याचे दिला संदेश

साडी दिली नाही म्हणून पत्नीने केली पतीची हत्या?

साडी दिली नाही म्हणून पत्नीने केली पतीची हत्या?

बदलापूरच्या शिरगावातील धक्कादायक घटना

आधी पतीच्या डोक्यात कुकर मारला नंतर गळा घोटला

भर पावसात अजितदादांना अनोखी मानवंदना!

मार्केट यार्डमध्ये ३० फुटी प्रतिमेवर क्रेनमधून दुग्धाभिषेक

पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात मध्यरात्री १२ वाजता दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांची भव्य ३० फूट उंच प्रतिमा उभारण्यात आली.

मुसळधार पावसातही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक उपाध्यक्ष करण गायकवाड यांनी क्रेनवर चढून अजितदादांच्या ३० फुटी प्रतिमेवर दुग्धाभिषेक करत विनम्र अभिवादन केले.

चासकमान धरण ९४ टक्के भरले आज भीमा नदीत पाण्याचा विसर्ग

सह्याद्रीच्या कुशीत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील चासकमान धरण ९४ टक्के भरले आहे. त्यामुळे आज दुपारपासून भीमा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आरोपी दत्तगिरी महाराजांना अटक; कारागृहात रवानगी

अमरावतीच्या चांदूर रेल्वे येथील आनंद मठातील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तगिरी गुरु जयरामजी महाराज यांना चांदूर रेल्वे पोलिसांनी अटक केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवसांपासून फरार असलेल्या आरोपीचा शोध पोलीस घेत होते. अखेर त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर आरोपीला अमरावती येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी (एमसीआर) सुनावली. त्यानंतर त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली.दरम्यान, आरोपीला अटक झाल्यानंतर तपासासाठी पोलीस कोठडी (पीसीआर) मागितली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये आरोपीकडून इतर महिलांचेही शोषण झाले आहे का, तसेच त्यासंदर्भातील पुरावे, माहिती आणि इतर बाबींची सखोल चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडी उपयुक्त ठरू शकली असती असे मत व्यक्त होत आहे.

पश्चिम विदर्भात बोगस बियाणे प्रकरणात तब्बल ७५ एफआयआर

पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ, अकोला आणि बुलढाणा या चार जिल्ह्यातील सोयाबीनची उगवण न होणाऱ्या बोगस बियाणांची व्याप्ती वाढली आहे, आतापर्यंत १३ विविध बियाणे कंपनी विरुद्ध पश्चिम विदर्भात ७५ एफआयआर विविध पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाल्या आहेत.. बियाणे कंपनीविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले असून चार जिल्ह्यात तब्बल 12 हजार तक्रारी कृषी विभागाकडे आल्या आहेत.शेतकऱ्यांनी विविध कंपन्यांचे सोयाबीन बियाणे खरेदी करून पेरणी केली होती.

भंडारा जिल्ह्यात वैनगंगेच्या पाणी पातळीत वाढ

भंडारा जिल्ह्यात आज पहाटेपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. परिणामी भंडारा ते गोंदिया जिल्ह्यातील तिरोडाला जोडणाऱ्या खमारी येथील पुलावरून पुराचं पाणी वाहत असल्यानं या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम पडला आहे. सोबतचं वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं भंडारा ते कारधा जुना पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

Maharashtra News Live Update: पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज थेट राजभवनावर आंदोलन

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या मागणीसाठी काँग्रेस मैदानात

राहुल गांधी यांना ताब्यात घेतल्याचा निषेधार्थ काँग्रेस करणार केंद्र सरकार विरोधात आंदोलन

सकाळी १० वाजता राजभवन येथे आंदोलन

पुण्यात वेश्या व्यवसायातून ९ मुलींची सुटका

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला २० जुलै रोजी आंबेगाव बुद्रुक येथील साई किरण लॉज आणि गॅलेक्सी लॉज येथे महिलांकडून देहव्यापार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या मदतीने खातरजमा करून त्या दोन्ही ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत देहव्यापारासाठी आणलेल्या ९ पीडित महिलांची सुटका करण्यात आली.

सीजेपी आंदोलनाच्या समर्थनार्थ बुलढाण्यात लागले ‘इन्कलाब जिंदाबाद’चे नारे...

नीट पेपर फुटी प्रकरणावरून सुरू झालेल्या सीजेपी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ बुलढाण्यातही इन्कलाब जिंदाबाद चे नारे लागलेत.. शहरातील जयस्तंभ चौकात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते ॲड. प्रवीण सुरडकर यांनी डोक्याला काळ्याफिती बांधून केंद्र सरकारचा जोरदार निषेध नोंदवला आहे..

नवी मुंबई DP प्लॅनवरून प्रशासकांवर टीका; नगरविकास विभागाच्या कारभारावर उठवले प्रश्नचिन्ह

नवी मुंबई महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात (DP) आरक्षणात फेरबदल करून बिल्डरांचा फायदा साधल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. डीपी प्लॅन तयार करताना सार्वजनिक सोयी-सुविधांचे भूखंड राखण्याऐवजी बिल्डरांच्या हिताला प्राधान्य दिले गेले, असा हल्लाबोल करत नगरविकास विभाग आणि पालिका प्रशासकांचा कार्यकाळ नवी मुंबईसाठी 'शाप' ठरल्याची घणाघाती टीका करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! अजित पवारांच्या जयंतीला शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर होणार

Heart Attack : हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर देतं 'हे' संकेत, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

पावसाळ्यात थंड पाण्याने केस धुतल्याने शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या

भीषण दुर्घटना! बांधकाम सुरू असताना बोगदा कोसळला; भूगर्भशास्त्रज्ञांसह २० जणांचा मृत्यू, ५ जण ढिगाऱ्याखाली

Liver disease: त्वचेवर दिसतायत का हे 5 बदल? लिव्हर निकामी होण्यापूर्वी शरीर देतंय गंभीर इशारे, वेळीच जाणून घ्या

SCROLL FOR NEXT