समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडोर वर मेहकर जवळ मुंबईतील सराफा व्यापाऱ्याला चाकूच्या धाकावर लुटलं, मोठ्या प्रमाणात सोने व रोकड घेऊन चोरटे लंपास.
मुंबई येथील साराफा व्यापारी मेहकर हुन मुंबईकडे जात असताना मेहकर टोल प्लाझा नंतर ड्रायव्हरने फ्रेश होण्याचे कारण देऊन गाडी थांबवली व त्याचवेळी मागच्या बाजूने दुसऱ्या कारमधील चोरट्यांनी येऊन सराफा व्यापाऱ्यावर चाकू हल्ला करत गाडीतील मोठ्या प्रमाणात सोने व रोकड घेऊन चोरटे पसार झाले आहेत.
तात्काळ मेहकर पोलिसांना माहिती देण्यात आली असता मेहकर पोलिसांना अकोला जिल्ह्यातील पातुर जवळ लुटारूंची गाडी आढळली मात्र गाडीतून लुटारू पसार झाले आहेत.
सराफा व्यापाऱ्यावर मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरू.
बैलपोळ्या निमित्त आज जिल्हाभरात बैलांची मिरवणूक काढण्यात येत असते, याच प्रकारे लातूरच्या खरोळा गावात थाटामाटात सजावट करून तत्तापुरे यांचा लक्षा नावाचा बैल सजवून मिरवणुकीसाठी आणला होता, मात्र अचानक बैल उधळल्याने मिरवणुकीमध्ये जमलेल्या ग्रामस्थांची धावपळ उडाली. तर यात कुठलीही जीवित हानी झाली नाही, मात्र धूम ठोकून थेट लक्षात नावाचा बैल शेतात जाऊन लावणीला थांबला.
भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावरील मानकोली या ठिकाणी रात्री 8 वाजताच्या सुमारास टाटा निक्सन या चालत्या कार ने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे.पाहता पाहता कार पूर्ण आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे.
आधीच या मार्गावर सदैव वाहतूक कोंडी असल्याने वाहन चालक त्रस्त असताना या कार जळण्याचे त्यामध्ये भर पडली.या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.आग लागल्याचे लक्षात आल्याने कार मधील चालक व सहकारी वेळेतच बाहेर पडल्याने सुदैवाने जीवितहानी टळली आहे.
नाशिकच्या येवला तालूक्यातील सायगाव मध्ये आज ट्रॅक्टर पोळा आणि बैल पोळा असा आधुनिक पध्दतीचा बैल पोळ्याचा उत्सव साजरा करण्यात आला.सध्याच्या युगात बैलांचे महत्व कमी होऊन सर्वत्र ट्रॅक्टरच्या सहाय्याने अधुनिक पध्दतीने शेती होत असली तरी पोळ्याच्या दिवशी बैलांचा मान हा मोठा असतो.
मात्र ज्या शेतक-यांकडे बैल नाही अशा शेतक-यांनी ट्रॅक्टरला सजवत त्यांची सायगाव गावातून मिरवणूक काढत बैल पोळ्याचा सण अधिकच रंगतदार केला.बैल पोळ्यासाठी ट्रॅक्टर चालकांनी सकाळ पासूनच आपल्या ट्रँक्टरला धुवून,रंगवून फुल-फुग्यांची आरास करत त्यांची संध्याकाळी गावातून मिरवणूक काढत मारूती मंदिरा पर्यत नेत तेथे पोळ्याचा उत्सव साजरा केला.अशा प्रकारे अधुनिक पध्दतीने शेतक-यांनी हा बैल पोळ्याचा उत्स साजरा केला.
बुलढाणा जिल्ह्यात लंपी आजाराणे असंख्य जनावरे मृत पावली आहे या आजाराने जिल्ह्यात थैमान घातले असल्याने जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी एक आदेश काढून जिल्ह्यात बैल पोळा सणावर बंदी आणली होती.. मात्र या आदेशाला ठिकठिकाणी केराची टोपली दाखविली असून जिल्ह्यात सर्वत्र बैल पोळा भरविण्यात आला.. आता जिल्हा प्रशासन बैल पोळा भरविण्याऱ्यावर काय कारवाई करते याकडे जिल्हा वासियांचे लक्ष लागले आहे...
वर्धेत बैल पोळा कार्यक्रमात राज्याचे कृषी राज्य मंत्री आशिष जयस्वाल यांनी हजेरी लावली. यावेळी जयस्वाल यांनी राज्य सरकार ही शेतकऱ्यांसाठी सातत्याने काम करत असते. आताच मुख्यमंत्री यांनी जाहीर केल आहे की बळीराजा शेत पांदण रस्ते योजना महाराष्ट्रात करणार आहो.या योजनेच्या माध्यमातून 45 हजार किलोमीटर पांदण रस्ते बांधणार आहो. बैलजोडीला अडचण होणार नाहीय अश्या पद्धतीने हे शेत रस्ते बांधणार असून राज्य सरकार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याच सांगितलंय.
पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन
डॉ मल्लिनाथ कलशेट्टी लिखित मी विकासयात्री या पुस्तकाचे प्रकाशन
बालगंधर्व रंगमंदिर येथे पुस्तक प्रकाशन कार्यक्रम
उपमुख्यमंत्री अजित पवार पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला पोहचले
- वडनेर दुमाला परिसरात बिबट्या अखेर जेरबंद
- मात्र स्थानिक नागरिक वनविभागावर नाराज
- परिसरात आणखी बिबटे असल्यानं सर्वांचा बंदोबस्त करण्याची मागणी
- वडनेर दुमाला गावात साडे तीन वर्षीय मुलाला बिबट्याने केले होते ठार
- वडनेर दुमाला परिसरातील बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नागरिकांनी वन विभागाच्या कार्यालयावर काढला होता मोर्चा
- वडनेर दुमाला परिसरातील बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लावलेले पिंजरे काढू नये, नागरिकांची मागणी
जर रस्ते खराब असतील तर टोल वसूल करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील किणी टोल नाका येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली. कोल्हापूर ते पुणे रस्ता खराब असल्याने टोल वसुली बंद करण्याची मागणी करण्यात आली.
स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आज शेकडो गाड्या विना टोल देता सोडल्या आहेत. तर रस्ते खराब असल्याने वाहनधारकातून संताप व्यक्त केला जात आहे. स्वाभिमानीच्या मागणीमुळे वाहनधारकाने टोल विरोधी आंदोलन तीव्र करण्याची मागणी केली आहे.
पुणे ते कोल्हापूर प्रवास करणा-या प्रवासादरम्यान संपुर्ण टोल नाक्याची टोलवसुली तातडीने बंद करण्याची स्वाभिमानीची मागणी आहे. प्रशासनाने तातडीने टोल वसुली बंद न केल्यास स्वाभिमानी स्टाईलने टोल नाके बंद करणार असल्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने इशारा दिला आहे.
नांदेड जिल्ह्यात पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. शेतात वर्षभर राबणाऱ्या आपल्या सर्जा-राजाला आंघोळ घालून त्यांना सजवून गावातून मिरवणूक काढण्यात आली. मंदिरासमोर पूजा अर्चा करण्यात आली.पुरणपोळीचा नैवेद्य बैलांना भरून पोळा सण उत्साह साजरा करण्यात आला.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात बैल पोळ्याचा सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.पोळा सणानिमित्त मानाच्या बैलांना सजवून वाजत गाजत मंदिरात मंदिरात आणून पूजा करण्यात आली. यावेळी वर्षभर शेतात राब राबून कष्ट करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.सोबतच जिल्हाभरात इतर ठिकाणी देखील पोळा सणाचा मोठा उत्साह पाहायला असून शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा राज्याच्या डीजेच्या तालावर मिरवणुका काढल्या होत्या.
पुण्यात अजित पवार स्थानिक स्वराज्य संस्था पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कार्यकर्ते पदाधिकारी यांची बैठक घेत आहेत
पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक आढावा
पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी यांना बोलावले
कर्जमाफीसाठी नाशिकमधील शेतकरी आक्रमक.
पोळ्याचे औचित्य साधून चांदवडच्या राहूड येथे बैलांच्या पाठीवर घोषवाक्य लिहून प्रहार संघटनेने केले आगळे वेगळे आंदोलन
बारामती -
इंदापूर नगर परिषदेची केवळ एकाच अनधिकृत टपरीवर कारवाई
इतर अतिक्रमण आहे असं ठेवल्याने नागरिकांकडून कारभारावर नाराजी व्यक्त.
इंदापूर नगर परिषदेने न्यायालयासमोर असणाऱ्या अनधिकृत चहाच्या टपरीवर कारवाई केली आहे.
मात्र इतर ठिकाणची अतिक्रमण आहे अशी ठेवल्याने इंदापूर नगर परिषदेच्या कामकाजावर नागरिकांमधून नाराज व्यक्त केली जातेय.
त्यामुळे अतिक्रमण विरोधी करण्यात आलेली ही कारवाई पुढे सुरू राहणार की इंदापूरकरांचा गुदमरलेला श्वास असाच कायम राहणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
कोल्हापूर -
कोल्हापूर - रत्नागिरी महामार्ग वाहतुकीसाठी खुला
कोल्हापूर जिल्ह्यात गेली 5 दिवस मुसळधार पाऊस पडल्याने जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद झाले होते.
पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे कोल्हापूर - रत्नागिरी या प्रमुख मार्गावर पाणी आल्याने हा मार्ग देखील बंद करण्यात आला होता.
केर्लीनजीक वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला कोल्हापूर - रत्नागिरी महामार्ग आज वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला आहे.
त्यामुळे काल बसून खोळमलेली वाहतूक आज पुन्हा सुरू झाली.
लातूरच्या पळशी येथे मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा
शेकडो वर्षाची परंपरा. सर्जा-राजाची गावातून मिरवणूक.
वर्षभर शेतात काबाडकष्ट करणाऱ्या गोवंशाची आजच्या दिवशी हार तुरे, फटाके आणि वाजत गाजत मिरवणूक काढून पूजा करण्यात येत असते.
दरम्यान गावात मोठ्या उत्साहात ग्रामस्थांनी वाजत गाजत बैलांची मिरवणूक काढली आहे.
शेकडो वर्षापासूनची परंपरा आजही ग्रामस्थांनी जोपासली आहे.
पुणे -
पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन
डॉ मल्लिनाथ कलशेट्टी लिखित मी विकासयात्री या पुस्तकाचे प्रकाशन
बालगंधर्व रंगमंदिर येथे पुस्तक प्रकाशन कार्यक्रम
उपमुख्यमंत्री अजित पवार पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला पोहचले
धाराशिव -
धाराशिव जिल्ह्यातील बैलपोळा सणावर मनोज जरांगे पाटलांची छाप
बैलाच्या पाठीवर मनोज जरांगे पाटलांच चित्र रेखाटले , बैलाच्या मिरवणुकीत मनोज जरांगे यांच्या समर्थनाची वाजली गाणी
एक मराठा लाख मराठा घोषणा बैलांच्या पाठीवर लिहिली
मुंबईत होणाऱ्या आंदोलनाला येण्याची बैलपोळा सणातून शेतकऱ्याकडून साद
दुपारपर्यंत निरभ्र वातावरण असताना अचानक मेघ दाटून येत भंडारा जिह्यातील ग्रामीण भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली. भंडाराच्या तुमसर येथे पावसानं अक्षरशः झोडपून काढलं. अचानक आलेल्या पावसामुळं दुचाकी चालकांची चांगलीचं तारांबळ उडाली. मागील काही दिवसांपासून कमी-अधिक पावसानं हजेरी लावली आहे. आता जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय.
29 ऑगस्टला मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे हे मुंबईला मोठ्या संख्येने धडकणार आहे, या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित केली आहे.
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पदाला जेवढा आम्ही मीडियाच्या माध्यमातून महत्व देतो तेवढं देण्याची गरज नाही असं वक्तव्य शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केला आहे. पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे या कार्यशाळेला शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी देखील हजेरी लावली आहे.
ससून रुग्णालयाच्या डीनला ठाकरे गटाचे कार्यकर्ते घालणार घेराव
ससून रुग्णालयातील समस्यांना वाचा फोडण्यासाठी ठाकरे गटाच रुग्णालयात आंदोलन
ससून रुग्णालयात गेला अनेक दिवसांपासून सोयीसुविधांचा अभाव असल्याचा शिवसेना ठाकरे गटाचा आरोप
ससूनच्या अधीक्षकांना घेराव घालत देण्यात येणार निवेदन
विधिमंडळ सार्वजनिक उत्सव समितीने दौंड एसआरपीएफ येथे भेट दिली.
सार्वजनिक उपक्रम समिती प्रमुख आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या सदस्यांनी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 येथे भेट देत पाहणी केली .
३०० खासदार रस्त्यावर उतरले, त्याठिकाणी आम्हाला अटक झाली - शरद पवार
मतदार याद्यांमध्ये घोळ होत असल्याची माहिती आयोगाला आधीच होती - जितेंद्र आव्हाड
मतदार यादीबाबत अभ्यास सुरू - शरद पवार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांना फोन केला होता. यासंदर्भात बोलताना शरद पवारांनी,'उपराष्ट्रपतीपदासाठी फडणवीसांनी फोन केला होता. सी.पी राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्यास त्यांनी विनंती केली', असं शरद पवार म्हणाले.
"खाकीला" कलंक! अवैध धंदे चालवण्यास प्रोत्साहन दिल्या प्रकरणी पुणे पोलिस दलातील कर्मचाऱ्याचे निलंबन
पुणे पोलिस दलातील कर्मचाऱ्याचे अमली पदार्थ विक्रेत्यांसोबत आर्थिक व्यवहार
अमली पदार्थ विक्रेत्याच्या मोबाईल मध्ये पोलिस कर्मचाऱ्याचे "कोड नेम"
अवैध धंदे चालक यांच्याकडून पोलिस कर्मचाऱ्याची वसुली
नवनाथ कांताराम शिंदे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे
ते सध्या पोलिस शिपाई म्हणून स्वारगेट पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत
भारत देशातील उपराष्ट्रपती पदासाठी 2025 निवडणूक होत आहे. त्यासाठी 9 ऑगस्ट रोजी दिल्लीत येऊन उमेदवारी अर्ज खरेदी केला होता. आज 21 ऑगस्ट उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. मी महाराष्ट्र लोक काँग्रेस संस्थापक अध्यक्ष उमेशभैय्या महादेव म्हेञे नी दिल्लीतील राज्यसभेतील दालनात निवडणूक निर्णय अधिकारी PC मोदी व गिरीमा जैन याच्याकडे उमेदवारी अर्ज व 15000 डिपॉझिट जमा करून अर्ज दाखल केला आहे. उपराष्ट्रपती निवडणूकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना सर्वात कमी वयाचा मी उमेश म्हेञे उमेदवार ठरलो आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यामागील कारण म्हणजे मी उमेश म्हेञे महाराष्ट्र राज्य पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. राजकारणी -राष्ट्रीय पक्षातील लोक पैसे वाल्याला उमेदवारी अर्ज दाखल करण्यास लावतात. मग मी शेतकऱ्याचा मुलगा -सामान्य कुटुंबातील नागरिक का फाॅर्म भरू नये संविधानाने मलाही अधिकार दिला आहे. त्यानुसार मी माझा उमेदवारी अर्ज महिनाभर पळून सर्व कागदपत्रे गोळा करून आज अर्ज दाखल करताना जोडून दिले आहेत जे खासदार दिल्लीत गेल्यावर संसद भवनातील पायर्यावर फोटो काढतात ती सर्व प्रकिया मी केली आहे.
पुण्यातील विसर्जन मिरवणुकीचा अखेर मिटला
मानाचे गणपती सकाळी ९.३० वाजता विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार
गणेश विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळांकडून ढोल ताशा पथक कमी केली जाणार
पुण्यातील गणेश मंडळांच्या बैठकीतील माहिती
सर्व गणेश मंडळांच्या प्रतिनिधींची सहकार्याची भूमिका
आज बैल पोळा सणाच्या निमित्ताने रायगडच्या माणगावमधील बैलगाडी संघटने तर्फे बैलांचे जल्लोशात पुजन करण्यात आले. यावेळी बैलांना बैलांचे औक्षण, बैलांची नजर उतरवण्यात आली. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येत शेतकरी आणि बैलगाडी प्रेमी उपस्थित होते
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असून प्रारूप प्रभाग रचनेकडे इच्छुकांचं लक्ष लागलंय. मात्र नाशिकमध्ये नाशिक महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर होण्यापूर्वीच प्रभाग रचना फुटल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( AP ) शहराध्यक्षांनी थेट अजित पवारांना या चर्चेची माहिती दिलीय.
शिर्डीच्या साईबाबा मंदिरातही बैलपोळा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.. साईबाबांच्या समाधीवर मातीच्या बैलांची प्रतिकृती ठेऊन पूजन करण्यात आले.. साईबाबांच्या माध्यान्ह आरतीच्यावेळी बैलराजाला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला.. साईबाबांच्या हयातीपासून शिर्डीत बैलपोळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.. तीच परंपरा अनेक दशकापासून साईबाबा संस्थान पुढे चालवत आहे.. आज शिर्डीत आलेल्या भाविकांना साईबाबांच्या समाधीवर सर्जा राजाचेही दर्शन मिळतं आहे..
* पोलिस आयुक्तांनी घेतला सुरक्षा व्यवस्थेचा आढावा..
* मिरवणुकीत सुरक्षेसाठी 3 हजार पोलिस असणार तैनात..
* अलीकडेच महाल परिसरात घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे..
लेंडी प्रकल्प अभियंता तिडकेला अटक करा. गावकऱ्यांनी मागणी करत दिल्या घोषणा.
लेंडी प्रकल्प अभियंता विरोधात जोरदार घोषणाबाजी.
राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे थोड्याच वेळात करणार हसनाळ या गावची पाहणी आणि गावकऱ्यांशी साधणार संवाद.
लेंडी प्रकल्पातून पाणी सोडणार नाही अशी प्रकल्प अभियंत्याने दिली होती माहिती. गावकऱ्यांचा आरोप
पुण्यात राज ठाकरेंची महत्वाची बैठक
पुणे शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक
उद्या दुपारी तीन वाजता घेणार बैठक
गंज पेठेतील सावित्रीबाई फुले स्मारक येथे होणार बैठक
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी घेणार बैठक
अक्कलकुवा तालुक्यातील कुवा ते भराडीपादर पाटी रस्त्यादरम्यान दरड कोसळल्याची घटना....
उंच डोंगरावरून मातीचा मलबा कोसळल्याने घाट रस्ता बंद....
मातीच्या ढिगार्यावरून चार चाकी वाहन काढण्याची प्रवाशांवर वेळ....
घाटातील रस्त्यांवर दरड कोसळल्याने दुर्गम भागातील पाड्यांचा संपर्क तुटला.....
पुण्यातील सर्किट हाऊस वर बैठक सुरू
मानाचे गणपती यांचे प्रतिनिधी आणि इतर गणेश मंडळांच्या प्रतिनिधी यांच्यातील वाद आज शमणार?
बैठकीत मुरलीधर मोहोळ यांच्यासह आमदार हेमंत रासने यासह इतर मान्यवर उपस्थित
विसर्जन मिरवणुकीच्या वेळेबाबत "मानाचे विरुद्ध कामाचे" असा वाद गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सुरू आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा हा वाद सोडवण्यासाठी मोहोळ आणि रासने यांच्यावर दिली आहे जबाबदारी
पोळा आणि रविवार सलग आल्यामुळं वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार आज पासून तीन दिवस बंद राहणार असून, यात शुक्रवारी बैलपोळा शनिवारला पोळा कर आणि रविवार अशी तीन दिवस बाजार समिती बंद राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी नं आणण्याचं आवाहन बाजार समिती प्रशासनाकडून करण्यात आलय. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती ही विदर्भातील प्रमुख बाजार समिती असून इतर जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्रीसाठी आणला जातो मात्र पूर्व सूचना दिल्यामुळे शेतकऱ्यांची गैरसळ टाळणार आहे.
गंगाधर काळकुटे यांनी मराठा प्रा. लक्ष्मण हाके यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले आहे. हाके यांची जीभ कापणाऱ्याला १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. हाके यांनी मराठा आरक्षणावरून वादग्रस्त विधान केले होते, त्यामुळे त्यांच्या विरोधात हे वक्तव्य करण्यात आले आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रातील मराठा आणि ओबीसी समाजातील संघर्ष वाढताना दिसत आहे.
निगडी येथील बजाज ऑटोमोबाईल समोरील पेट्रोल HP पंपाजवळ काही वेळापूर्वी मास्क मॅन हातात धारदार चाकू घेऊन रस्ता क्रॉस करत असताना दिसत आहे. मास्क मॅन गुन्हेगाराने आपल्या चेहऱ्यावर मास्क घालून आपली ओळख लफविल्याने, तसेच हातात धारदार चाकू घेऊन वावरत असल्याने रस्त्या वरून ये जा करणाऱ्या नागरिकांच्या मनामध्ये मास्क मॅनची मोठी दहशत निर्माण झाली आहे. आता या हातात चाकू घेऊन पिंपरी चिंचवड शहरात वावरणाऱ्या मास्क मॅन च्या मुसक्या पिंपरी चिंचवड पोलीस कधी आवडणार..... याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे
राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीवर रामदास आठवले यांची त्यांच्या शैलीत टीका
राज ठाकरे यांची फक्त सभा घेण्यापूर्वी ताकद, त्यांना मत पडत नाहीत, त्यांना इव्हेंट मॅनेजमेंट फक्त जमत
राज ठाकरेंना मत पडणार नाहीत ही कळ्या दगडावरील रेघ
महायुती म्हणून आगामी निवडणुका लढाव्या आणि आरपीआयलाही सन्मान योजना जागा मिळाव्यात
मुंबई महानगरपालिकेत आरपीआयला 15 जागांची रामदास आठवले यांच्याकडून मागणी, योग्य वाटा मिळाला नाही तर आर पी आय स्वबळावर निवडणूक लढवणार
राज्यभरात आरपीआयची ताकद आहे त्या ठिकाणी सन्मान जनक वाटा मिळावा अशी मागणी
धाराशिव जिल्हा दौऱ्यावर असलेल्या रामदास आठवले यांच वक्तव्य
पुण्यात गेले चोवीस तासांमध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे.काल दिवसभर ढगाळ वातावरण आणि ऊन असा लपंडाव सुरू होता.
काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या. शहरामध्ये तीन दिवस झालेल्या पावसाने काही ठिकाणी वाहतूक कोंडी, काही ठिकाणी पूर परिस्थिती तर काही ठिकाणी रस्त्यावर पाणी आलेले पाहायला मिळाले.
मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने धरणे भरली आणि विसर्ग सुरू झाल्याने ओढ्या-नाल्यांना पूरस्थिती निर्माण झाली. मात्र,मागील २४ तासांत पावसाचा जोर ओसरला आणि दिवसभर उपनगरांसह शहराच्या मध्यवर्ती भागात सकाळी तुरळक ठिकाणी पावसाची अतिहलक्या सरी पडल्या.
पंढरपुरातील चंद्रभागा नदीला महापूर आला आहे महापुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाची रेस्क्यू टीम पंढरपूर मध्ये दाखल झाली आहे.
उजनी व वीर धरणातून भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. सध्या पंढरपुरात चंद्रभागा नदीमध्ये एक लाख 70 हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे.
नदीकाठच्या सकल भागामध्ये पुराचे पाणी शिरले आहे पाणी आल्याने जवळपास 300 हून अधिक कुटुंबांना व 700 ते 800 नागरिकांना सुरक्षित स्थळी घालवण्यात आले आहे.
पंढरपूर शहरातील पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाची टीम आता कार्यरत झाली आहे
- नाशिकला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण ९४ टक्के भरलं
- धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवसांत मुसळधार पाऊस झाल्यानं धरण १०० टक्के भरण्याच्या मार्गावर
- धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करूनही धरणात पूर्ण क्षमतेनं भरण्याच्या मार्गावर
- गंगापूर धरण समूहाचा पाणीसाठा देखील ९६ टक्क्यांवर
- तर जिल्ह्यातील २६ लहान मोठ्या धरणांमधील पाणीसाठा देखील ८८ टक्क्यांवर
- जिल्ह्यातील २६ पैकी ११ धरणं १०० टक्के भरली
पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्यासोबत पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्व मुख्य मंडळांची बैठक पडली पार
गणेशोत्सवात लाईट-लेझर शो टाळा ग्रामीण भागातील गणेश मंडळांना पोलीस अधीक्षकांच्या सूचना
गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी एका मंडळांनी किमान ४ CCTV बसवण्याच्या पोलीस अधीक्षकांनी दिल्या गणेश मंडळाना सूचना
गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा, यासाठी प्रत्येक गणेश मंडळाने किमान चार सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, ध्वनिप्रदूषण वाढविणारे कर्णकर्कश ध्वनिक्षेपक व लाईट-लेझर शो टाळावेत, अशा स्पष्ट सूचना पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी दिल्या
नितीन शामराव समुद्रे वय 38 वर्ष असं पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आरोपीच नाव आहे. नितीन शामराव समुद्रे हा छत्रपती संभाजी नगर येथील कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. मात्र त्याला कोरोना काळात आकस्मिक अभिवचन रजा देण्यात आली होती. त्यानंतर रजेवर आल्यानंतर तो परत कारागृहात हजरच झाला नाही. जवळपास तीन पोलिसांच्या हातावर तुरी देऊन नितीन शामराव समुद्रे हा फरार झाला होता. मात्र नितीन शामराव समुद्र हा वाकड ब्रिज जवळ येणार आहे अशी गोपनीय माहिती वाकड पोलिसांना मिळाली होतो, त्या अनुषंगाने पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत
वेल्हे तालुक्याचं नाव राजगड करण्यात आल्यानंतर राजगड मधील भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केल.
माजी आमदार संग्राम दादा थोपटे यांच्या प्रयत्नांना यश वेल्हे तालुक्याचे राजगड नामांतरण झाल्यामुळे आज जिल्हाध्यक्ष शेखर ओढणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ढोल ताशाच्या गजरामध्ये व फटाके वाजवून, पेढे वाटून, आनंद उत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे नियोजन भाजपा राजगड तालुका अध्यक्ष राजू प्रभाकर रेणुसे यांनी केले.
- गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी घटवला
- सद्यस्थितीत गंगापूर धरणातून अवघे 520 क्यूसेकने गोदावरी नदी पात्रात सोडण्यात येतय पाणी
- धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्याने नाशिक मध्ये गोदावरीची पूर परिस्थिती ओसरण्यास सुरुवात
पुणे- सोलापूर महामार्गावर अचानक डुक्कर आडवे गेल्याने पोलीस उपनिरीक्षकाचे (psi) चारचाकी गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी थेट दुभाजक तोडून समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. या अपघातात पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील अल्फा पेट्रोल पंपासमोर आज पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
महेश अंबादास गळगटे (वय- 36, रा. राममंदिर लेन, आष्टी, जि. बीड)असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.त्यांच्यावर लोणी काळभोर येथील एका बड्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी दौंड तालुक्यातील सहजपुर गावच्या उमेश म्हेत्रे या तरुणाने उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नवी दिल्ली मधील राज्यसभेतील दालनात निवडणूक निर्णय अधिकारी पी. सी.मोदी व गिरीमा जैन याच्याकडे उमेदवारी अर्ज आणि 15000 रुपयांचे डिपॉझिट जमा करून अर्ज दाखल केला. त्यांच्या या कृतीने सर्वजण आश्चर्यचकित झाले असून थेट भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे
बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची वाहतूक केली जाणार असल्याची गोपनीय माहिती मेहकर पोलिसांना मिळाली होती, त्यावरून मेहकर पोलिसांनी सापळा रचून एका आयशर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये 65 लाखाचा गुटखा आढळून आला आहे, पोलिसांनी गुटख्यासह वाहन असा एकूण 77 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत एका आरोपीला अटक केली आहे. यामध्ये अजून आरोपी वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे, या कारवाईमुळे गुटखा माफीयांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
भंडारा येथील मणप्पुरम गोल्ड लोन बँकेच्या मॅनेजरनं फसवणूक केल्याचा आरोप करीत भंडाऱ्यातील अमित जोशी यांनी भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातचं पॉयझन घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामुळं भंडाऱ्यात मोठी खळबळ उडाली. या घटनेनं पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलिसांनी त्याला तातडीनं जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारांकरिता दाखल केलं. सध्या त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माहिती दिली.
वाशिम जिल्ह्यात १५ ते १८ ऑगस्ट कालावधीत झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर जनावरांचे मृत्यू, शेतीपिकांचे नुकसान व घरांची पडझड झाली आहे. यात एकूण ३५ जनावरे आणि ३ हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. घरांच्या पडझडीत वाशिम तालुक्यात ९७, रिसोड तालुक्यात १८४, मालेगाव तालुक्यात ७२ आणि मंगरूळपिर तालुक्यात ५१ अशा एकूण ४०४ घरांची पडझड झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. या धक्क्यातून सावरण्यासाठी शासनाकडून कधी मदत मिळेल. याकडे नुकसानग्रस्तांचे लक्ष लागले आहे.
बेपत्ता होमगार्ड महिलेचा खून; मैत्रिणीच्या कबुली जबाबानंतर बीडमध्ये खळबळ. बीड मधील गुंडाराज कधी थांबणार? चक्क होमगार्ड महिलेचीच हत्या मृतदेह बॉक्समध्ये बांधून फेकून दिला. बीड शहरात धक्कादायक खुनाची घटना उघडकीस आली आहे. शिवाजी नगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या बेपत्ता तक्रारीनंतर एका होमगार्ड महिलेचा मृतदेह गुरुवारी (दि. 21 ऑगस्ट) सकाळी आढळला. या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे.
मृत महिलेचे नाव आयोध्या राहुल व्हरकटे (वय 27, रा. बीड) असे आहे. आयोध्या ही होमगार्ड म्हणून कार्यरत होती. ती काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
बंदाेबस्त आणि वाहतुकीचे नियाेजन करण्यास पुणे पोलिसांना मदत होणार आहे. पुण्यातील गणेश उत्सव दरम्यान माेठया प्रमाणात भाविक जमत असल्याने शहरातील विविध रस्त्यांवरील वाहतुकीचे नियाेजन करणे, पर्यायी मार्ग नागरिकांना उपलब्ध करुन देणे व पाेलीस बंदाेबस्ताचे अचूक नियाेजन करणे यासाठी ए आय ची मदत घेणार आहे. पारंपारिक बंदाेबस्तसाेबत स्मार्ट ए आय कॅमेरे आणि विशेष साॅफ्टवेअरचा वापर करुन शहरात विविध ठिकाणी गणेशाेत्सव दरम्यान भाविकांची अचूक माहिती गाेळा केली जाणार आहे.
वाहतूक नियाेजन, सुरक्षा व बंदाेबस्त नेमणूक यास मदत हाेणार आहे. यंदा पुणे पोलिसांनी देहू व आळंदी येथून आषाढी दरम्यान निघणाऱ्या पालखीचे नियोजन करताना या तंत्रज्ञानाचा वापर केला होता.
अगदी रहदारीचा भाग, भर चौकात "मानवी सांगाडा" आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली अन् धावपळ उडाली! हा सगळा प्रकार गुरुवारी संध्याकाळी पुण्यातील येरवडा भागातील शास्त्रीनगर चौकात घडली. पुणे अहिल्यानगर रस्त्यावर असलेल्या या चौकात मध्यभागी मानवी हाडाचा सांगाडा पडला असल्याचे काही नागरिकांनी पाहिले. हाडांचा सांगाडा डोके, धड आणि कमरेपर्यंत होता. रस्त्याच्या मध्यभागी असलेला सांगाडा मोठ्या रहदारी मुळे लक्षात न आल्यामुळे काही चार चाकी वाहने त्याच्यावरून गेली. काही नागरिकांनी ही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवली. माहिती मिळताच पोलिसांनी जागेवर जाऊन तो मानवी सांगाडा ताब्यात घेतला आणि त्यानंतर सगळ्या गोष्टीचा उलगडा झाला. पोलिसांनी हा सांगाडा व्यवस्थित तपासला असता तो प्लास्टर ऑफ पॅरिसचा आणि तारेचा वापर करून बनवलेला असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांचा जीव भांड्यात पडला.
पावसाची रिमझिम आणि सायंकाळी कार्यालयातून बाहेर पडलेल्या चाकरमान्यांसाठी गुरुवारचा प्रवास खडतर ठरला. पुणे शहरातील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांना तास न् तास अडकून पडावे लागले. या कोंडीमुळे नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागला. पावसामुळे शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, त्यामुळेदेखील वाहतूक विस्कळित झाली. गणेशखिंड रस्ता, शिवाजीनगर, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, बाजीराव रस्ता, फर्ग्युसन रस्ता, छत्रपती शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, लोकमान्य टिळक रस्ता, प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता तसेच पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शहराच्या मध्य भागातही पेठांमधील अंतर्गत रस्त्यांवर कोंडी झाली होती. रात्री ९ वाजेपर्यंत रस्त्यावरची कोंडी कायम राहिल्याने नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागला.
नाशिकच्या मुंबईनाका परिसरात मुख्य रस्त्यावरील एका नव्या व्यावसायिक संकुलात 'आरंभ स्पा' नावाने थाटण्यात आलेल्या मसाज पार्लरमध्ये काही युवतींकडून देहविक्रय करून घेतला जात होता. पोलिस आयुक्तालयातील मध्यवर्ती गुन्हे शाखेकडून गुरुवारी रात्री या स्पावर छापा टाकण्यात आला. तेथून पाच पीडित युवतींची सुटका करत त्यांना संशयित आरोपी खुशबू सुराणा हिला ताब्यात घेत अटक केली आहे. दिल्ली, कानपूर, बिहार, मिझोराम या राज्यांमधून युवतींना याठिकाणी आणण्यात आल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. तसेच यापूर्वीही खुशबू सुराणा महिलेविरुद्ध अशाप्रकारे अनैतिक देहविक्रय व्यवसाय चालविणे, अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी पोस्को कायद्यांतर्गत गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आलीये. आता पुन्हा मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृद्धी योजनेअंतर्गत तांड्यांना स्वातंत्र्य ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातून 36 तांडे पात्र ठरले आहेत.त्यातील 35 प्रस्ताव हे विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर करण्यात आले असून त्यातील 11 प्रस्ताव हे विभागीय स्तरावरून ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी शासन स्तरावर सादर करण्यात आले आहे तर 24 प्रस्तावित त्रुटीत असल्याने ते विभागीय आयुक्त कार्यालय यांच्याकडे परत पाठविण्यात आले आहे.
कामशेत च्या जवळील नायगाव येथे पहाटे तीनच्या सुमारास आग लागून नवीन शॉपिंग सेंटर मधील तीन दुकाने जळून खाक झाली आहे. टोनी द धाबा समोर असलेल्या नवीन शॉपिंग सेंटर मध्ये श्री गजानन इलेक्ट्रिकल, एकवीरा मटन खानावळ, आणि त्याच्या शेजारील आणखी एक अशी तीन दुकाने या आगीत जळून खाक झालेली आहे. या आगीत कोणतीही जीवित झाली नाही, मात्र दुकान मालकाचे मात्र लाखोंचे नुकसान झाले आहे. एका नागरिकाला दुकानातून धूर येत असून शटर लाल झाल्याचे दिसले, त्याने त्वरित दुकान मालकाला फोन करून या संबंधित घटनेची माहिती दिली. घटनास्थळी वडगाव मावळ व तळेगाव एमआयडीसी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या. त्यांनी एका तासात ही आग आटोक्यात आणली....
भीमा आणि निरा खोर्यात सुरु असलेल्या पावसामुळे पंढरपुरातील चंद्रभागेला पूर आला आहे. चंद्रभागेने धोक्याची पातळी ओलांडली आहे. दरम्यान गोपाळपूर येथील पूल पाण्याखाली गेल्याने रात्री पंढरपूर ते विजय पूर महामार्ग बंद झाला आहे.
धाराशिव मधील नगरोत्थान महाअभियान अंतर्गत धाराशिव नगरपालिकेला मंजूर झालेल्या 140 कोटी रुपयांतुन होणाऱ्या 59 डीपी रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी 23 फेब्रुवारी 2024 रोजी प्राप्त झाली असुन नियमानुसार सात दिवसांत निविदा प्रक्रिया सुरू करणे अपेक्षित होते तरीही आता 18 महिने उलटूनही यामध्ये काहीच होत नाही.यासाठी धाराशिवचे ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी नगरविकासचे प्रधान सचिव के. एच. गोविंदराज यांची भेट घेऊन ही कामे लवकर सुरु करावीत अशी मागणी केलीय
वाशिम जिल्ह्यात गत चार दिवसांत झालेल्या संततधार पावसामुळे प्रकल्पांमधील जलसाठ्यात कमालिची वाढ झाली आहे. वाशिम जिल्ह्यातील एकूण 167 लघु आणि मध्यम प्रकल्पांपैकी तब्बल 105 प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. यामध्ये पाटबंधारे विभागाचे 37 तर मृद व जलसंधारण विभागाच्या 68 प्रकल्पांचा समावेश आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि अनेक ठिकाणी शेती सिंचनाचा प्रश्न मिटला आहे.
मुसळधार पाऊस तसेच अतिवृष्टीने यवतमाळ जिल्ह्याचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटला असून पूस प्रकल्पासह गोकी, वाघाडी, बोरगाव, नवरगाव, सायखेडा प्रकल्प 100% भरले आहेत लघु प्रकल्पही भरल्याने वर्षभराचा पाणी प्रश्न संपुष्टात आला आहे. आशात गोकी प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहत असल्याने ये-जा करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेताहेत.
गणेशोत्सव आता आवघ्या चार पाच दिवसांवर येऊन ठेपला असून येता दोनच दिवसात मुंबईकर चाकरमान्यांचा गणेशोत्सवासाठीचा कोकणचा प्रवास सुरु होईल. गेल्या पंधरा वर्षाच्या मानाने या वर्षी मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेत फरक पडला आहे. पळस्पे ते कशेडी दरम्यान रायगड जिल्हा हद्दीत येणाऱ्या महामार्गाचे काम 80 टक्के पूर्ण झाले असलेतरी नागोठणे, खांब, कोलाड आणि लोणेरे परिसरात महामार्गाचे काम आजही अपूर्ण आहे. या भागात महामार्गावर मोठमोठ खड्डे पडले आहेत. त्यामुळे या वर्षी देखील गणेश भक्त चाकरमान्यांना खड्डयांतुन प्रवास करण्याची वेळ येणार आहे.
राज्यात गुन्हेगारांवर वचक निर्माणकरण्यासाठी पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची धिंड काढल्या जातंय. अकोल्यातल्या मूर्तिजापुरात देखील गाव गुंडांची धिंड काढण्यात आलीय.. या अट्टल गुन्हेगारांनी अक्षरशः कान पकडून नागरिकांना माफी मागितलीये. कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या या 5 गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी हा 'रोड शो' होता. सनि दुबे, वैभव कोकाटे, यश केसले, आकाश उईके आणि आदित्य कोकाटे असे या गाव गुंडाची नावे आहे. या गुन्हेगारांना अकोला पोलिसांनी चांगला धडा शिकवला. आणि यापुढे 'जे कायद्यात राहतील ते फायद्यात राहतील' असा इशारा पोलिसांनी दिलाय.
अकोल्यात रुग्णवाहिका संघटना आणि वाहतूक पोलिसांमध्ये वाद पेटलाय. कारण ठरलंय वाहतूक पोलिसांनी रुग्णवाहिका चालकाला दिलेला दंड. सार्वजनिक ठिकाणी रुग्णवाहिका उभी केल्याच्या कारणावरून 500 रुपये दंड चालकाला दिलाय. तर याच विरोधात 'आक्रमण रुग्णवाहिका संघटना' ही आक्रमक झालीय. रुग्णवाहिकाला चालन देणाऱ्या वाहतूक पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांच्यावर कारवाईची मागणी केलीय. तसेच या संदर्भात पोलिस अधीक्षकांना निवेदन देखील देण्यात आले. कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रुग्णवाहिका संघटनेने निवेदनाद्वारे दिलाय
राज्यभरात पारंपरिक बैलपोळा साजरा होत असताना, त्याच्या पूर्वसंध्येला आज अमरावती जिल्ह्यात खांद शेखणीचा विधी मोठ्या उत्साहात पार पडला. वर्षभर शेतकरी शेतीची मशागत करण्यासाठी बैलांच्या खांद्यावर वखरणी, डवरणी व जुवाचा भार पडत असतो. त्या मेहनती खांद्यांना आज लोणी व हळद लावून शेक दिला जातो, ज्याला खांद शेखणी असे म्हटले जाते.
या विधीमुळे बैलांच्या खांद्यांना आराम मिळतो तसेच त्यांच्या कष्टाचे स्मरण करून त्यांचा सन्मान केला जातो. ग्रामीण भागात सर्वत्र हा सोहळा पारंपरिक रितीने साजरा झाला.याचसोबत उद्या बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना पुरणपोळीच्या जेवणाचे आमंत्रण देण्याची प्रथा आहे. त्यामुळे आजच्या खांद शेखणीनंतर शेतकऱ्यांच्या घराघरांत बैलपोळ्याच्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.