Maharashtra Live News Update: Saam TV Marathi
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : ठाकरेंचे ६ खासदार फुटले, ऑपरेशन टायगर अपडेट, अनेक जिल्ह्यांना मान्सूनपूर्व पावसाचा इशारा, राजकीय घडामोडी, देशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

मान्सूनच्या विलंबामुळे मराठवाड्यात खरीप पेरण्या रखडल्या; शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

मराठवाड्यात मान्सूनच्या आगमनाकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. जूनचा तिसरा आठवडा सुरू झाला असला तरी अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. परिणामी खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या असून शेतकरी चिंतेत आहेत. सोयाबीन, कापूस, मका आणि तूर यांसारख्या पिकांच्या पेरणीसाठी आवश्यक ओलावा जमिनीत उपलब्ध नसल्याने अनेक शेतांमध्ये मशागतीची कामे पूर्ण होऊनही बियाणे पेरले गेलेले नाही.

तुम्ही ज्या आमदारकीचा आनंद घेताय ती आम्ही सोडून दिलेली पदं आहेत : सुजय विखे यांचा विवेक कोल्हेंवर निशाणा

आमदार व्हायचं असतं तर मागच्या दोन महिन्यात झालो असतो.. नवीन पोरांना सांगतो, पदाचा आनंद मर्यादित ठेवा.. तुम्ही ज्या पदाचा आनंद घेताय ती आम्ही सोडून दिलेली पदं आहेत.. आम्हाला सत्कारासाठी पदांची गरज नाही, अशा शब्दात सुजय विखे यांनी नाव न घेता भाजपचेच विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार विवेक यांच्यावर निशाणा साधलाय..

- आजपासून नाशिक शहरात पाणी कपात लागू

- संपूर्ण शहरात आज पाणीपुरवठा राहणार बंद तर उद्या कमी दाबाने होणार पाणीपुरवठा

- मान्सून लांबल्याने शहरात एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय

- 31 ऑगस्टपर्यंत पाणीसाठा पुरवण्याच प्रशासनासमोर आव्हान

- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर, मुकणे आणि दारणा धरणांतील पाणीसाठा घटल्याने महापालिकेचा पाणी कपातीचा निर्णय

- शहरातील विहिरी आटल्याने खासगी टँकरची मागणी वाढली

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी अमित शहांच्या दौऱ्या दरम्यान काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष एडवोकेट माणिक शिंदे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन केलं स्थानबद्ध

Maharashtra News Live Update: पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल

२००६ मध्ये राज्यभर गाजलेल्या पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल आज मुंबईतील न्यायालयात जाहीर होण्याची शक्यता आहे.तब्बल वीस वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्यातील अंतिम निर्णयाकडे धाराशिव सह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Maharashtra News Live Update: यवतमाळ जिल्ह्यात पाणीटंचाईचा धोका; मोठ्या धरणांत केवळ 30 टक्के पाणीसाठा

यवतमाळ जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद होताना दिसत आहे. जिल्ह्यातील अनेक लघु प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले असून मध्यम प्रकल्पांनीही तळ गाठला आहे तर मोठ्या धरणांमध्ये केवळ 30 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता 31 ऑगस्टपर्यंत धरणातील पाणी न सोडण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विद्यार्थी नागपूरचा अन् नीट परीक्षेचं केंद्र अबुधाबीत; पेपरफुटीनंतर NTAचा आणखी गजब कारभार

Maharashtra Waterfalls : महाराष्ट्रातील 'हे' ५ धबधबे खूप कमी लोकांना माहितेय, एकदा पाहिल्यावर प्रेमातच पडाल

IMD Alert : रखडलेला मॉन्सून 'या' दिवशी पुन्हा ॲक्टिव्ह; 'या' जिल्ह्यांना आज वादळी पावसाचा, तर मुंबई-ठाण्याला उष्णतेचा इशारा

Blood Pressure Control : ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी किती वेळ चालणं योग्य? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Health Care: रोज भात खाल्ल्याने वजन वाढते का? डॉक्टरांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT