मालाडमध्ये राहणाऱ्या १४ वर्षीय शाळकरी मुलाने आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मुलगा घरातच मृत अवस्थेत आढळून आला आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा होणार असून, पोलिसांकडून परवानगी मिळाली आहे. हैदराबाद गॅझेटबाबत भाषणात बोलणार असून, जरांगेंच्या दसरा मेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे.
भांडुपच्या तुलशेत पाडा परिसरातील पाटकर कंपाउंड मधील एका सार्वजनिक शौचालयात नुकतच जन्मलेला स्त्री जातीचा अर्भक सापडल्याने एकच खळबळ उडाली. महिलांच्या शौचालयामध्ये एका कमोड मध्ये या अर्भकाला टाकण्यात आलं होतं त्यानंतर परिसरातील महिला हे शौचालय वापरण्यासाठी गेल्या असता त्यांना हे अर्भक आढळून आलं त्यानंतर या महिलांनी स्थानिकांच्या मदतीने या अर्भकाला भांडुप रुग्णालयात नेण्यात आला आणि त्यानंतर वैद्यकीय उपचारांसाठी अर्भकाला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात सध्या या अर्भक ची प्रकृती स्थिर आहे.
दसऱ्याच्या सणाला झेंडू फुलांची सर्वत्र मोठी मागणी असते,मनमाड परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे झेंडू फुल उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला,मनमाड बाजार समितीत झेंडू फुलांची आज आवक दरवर्षी पेक्षा यंदा कमी प्रमानात झाली असून झेंडू ला कमीत कमी 3000 हजार ते जास्तीतजास्त 6000 रुपयांचा दर मिळाला,जळगाव,अहिल्यानगर,मुबंई येथील व्यापारी फुल खरेदीसाठी येथे आले होते,उद्या किरकोळ बाजारात मात्र फुलांचा दर मात्र 80 ते 100 रुपये राहण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जालना रोडवरील गाढे जळगाव येथे धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. यावेळी मेंढ्या रस्त्यावर आणून रस्ता रोको केला. जवळपास एक तास रास्ता रोको करण्यात आला. यावेळी छत्रपती संभाजीनगर ते जालना रोड बराच काळ ठप्प झालेला होता. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी जालनामध्ये सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देत हे आंदोलन करण्यात आले. धनगर समाजाला एसटी प्रवर्गमध्ये तातडीने आरक्षण द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
भाईंदर पश्चिमेकडील राईगाव तलाव येथील एका चाळीच्या खोलीत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर मंगळवारी रात्री पोलिसांनी धाड टाकली.
यात १८ जुगारांना ताब्यात घेतले असून या कारवाईतून सुमारे ४ लाख ७५ हजारांची रोकड व १८ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
झोन १ चे पोलिस उपायुक्त राहुल चव्हाण (आयपीएस) यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी विशेष पथक तयार करून ही कारवाई करण्यात आली आहे.
नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारी संदर्भात शहरातील भाजपच्या तिन्ही आमदारांनी उठवला आवाज
शिंदेंच्या शिवसेनेपाठोपाठ नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारीविरोधात भाजप आमदार देखील आक्रमक
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासोबत देवयानी फरांदे, राहुल ढिकले आणि सीमा हिरे या तिनही आमदारांची बैठक सुरू
- बैठकीला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार राहणार उपस्थित
- बैठकीत सरकारसोबत सकारात्मक तोडगा निघाला तर 10 तारखेला निघणाऱ्या मोर्चात सरकारच मत सकारात्मक असल्याचं जाहीर करणार
- 2 सप्टेंबरला सरकारने काढलेला जीआर हा अन्यायकारक आहे असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शतकीय विजयादशमी आणि शस्त्रपूजन सोहळा उद्या नागपूरच्या रेशीमबाग मैदानात
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ऐतिहासिक विजयादशमी सोहळ्याला संघ परिवारातील विविध संस्थांच्या प्रमुखांसह तब्बल पंधरा हजारांवर गणवेशधारी स्वयंसेवक उपस्थित राहणार आहे.
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे विजयादशमी उत्सवाचे प्रमुख पाहुणे राहणार
बीड जिल्ह्यामध्ये दोन दसरा मेळावे होत आहेत.
एक मंत्री पंकजा मुंडे यांचा तर दुसरा नारायणगडावर मनोज जरांगे राष्ट्रसंत भगवान बाबा यांची जन्मभूमी असलेल्या सावरगाव घाट येथील मंत्री पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याची तयारी पूर्ण झाली.
उद्या ठीक अकरा वाजता पंकजा मुंडे सावरगाव घाट येथे येणार आहेत.
राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मूर्ती वरती हेलिकॉप्टरने पंकजा मुंडे पुष्पवृष्टी करणार
एसटी महामंडळाकडून १० टक्के भाडेवाढ रद्द.
दिवाळीनंतर १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर पर्यंत करण्यात आली होती भाडे वाढ.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व शिवसैनिकांना पूरग्रस्तांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
या आवाहनाला प्रतिसाद देत सातारा जिल्ह्यातील वाई विधानसभा मतदारसंघ, जावली विधानसभा मतदारसंघ आणि सातारा शहर शिवसेना यांच्यावतीने जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीसाठी एक लाख अकरा हजार रुपयांचा धनादेश पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी विकास शिंदे उपजिल्हाप्रमुख,सातारा,नीलेश मोरे शहर प्रमुख सातारा यांच्या उपस्थिती मध्ये धनादेश देण्यात आला.
महाराष्ट्रावर अतिवृष्टीचे संकट
दसरा मेळाव्याआधी उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद
सरकारने संकटात राजकारण न आणता एकत्र यावं. - उद्धव ठाकरे
शेतकरी ओझ्याखाली दबले गेले आहेत. - उद्धव ठाकरे
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये नारायणगडावर दसरा मेळावा होत आहे.
मात्र मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांच्यावरती छत्रपती संभाजीनगरच्या खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील उपस्थित राहणार की नाही राहणार अशी चर्चा सुरू झाली होती.
मात्र जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी माहिती दिली आहे की, मनोज जरांगे पाटील स्वतः दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.
कोणीही संभ्रम बाळगू नये त्यांच्या वरती उपचार सुरू आहेत.
लवकरच त्यांची प्रकृती ठीक होईल आणि नगद नारायण महाराज चरणी देखील त्यांनी प्रार्थना केली आहे. की लवकरच प्रकृती र्ती ठीक होईल.
नंदुरबार जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे.
मात्र मध्य प्रदेश आणि जळगाव जिल्ह्यात होत असलेल्या पावस आणि हातनुर धरणातून होत असलेल्या पाण्याच्या विसर्ग मुळे तापी नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
प्रकाशा येथे तापी नदीवर असलेल्या बॅरेजची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रकाशा बेरजेचे 6 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले असून 71 हजार 601 क्युसेक पाण्याच्या विसर्ग केला जात आहे.
मोठ्या प्रमाणात पाण्याच्या विसर्ग केला जात असून प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या इशारा देण्यात आला आहे.
तुळजाभवानी मंदिरासमोर सुरक्षारक्षक आणि लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यात धक्काबुक्की
मातंग समाजाच्या आरक्षण मागणीसाठी लहुजी शक्ती सेनेची तुळजापुरात साकडं यात्रा
तुळजाभवानीला आरती करून आरक्षणाचे मागणीसाठी साकडं घालण्यासाठी लहुजी शक्ती सेनेचे कार्यकर्ते तुळजापुरात
मंदिर सुरक्षारक्षक आणि कार्यकर्त्यांमध्ये मंदिराच्या प्रवेशद्वारावर धक्काबुक्की
मंदिराच्या राजे शहाजी महाद्वारावर सोडण्याच्या कारणावरून बाचाबाची आणि धक्काबुक्कीने प्रचंड गोंधळ
दुर्गम-अतिदुगम भाग असलेला गडचिरोली जिल्हा हा माओवाददृष्टया संवेदनशील आहे.
येथील जनतेच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी आणि आपले अस्तित्व दाखविण्यासाठी माओवाद्यांकडून अतिदुर्गम भागांमध्ये माओवादी स्मारकांची निर्मिती केली जात होती.
मात्र गेल्या काळात गडचिरोली पोलीस दलाकडून राबविल्या जाणाया प्रभावी माओवादविरोधी अभियानांमुळे जिल्ह्रातील सामान्य नागरीकांच्या मनात माओवाद्यांची असलेली भिती कमी होताना दिसून येत आहे.
याच प्रकारे माओवाद्यांच्या भूतकाळातील हिंसाचाराचे प्रतीक असलेले पोस्टे कटेझरी हद्दीतील दोन ते तीन वर्ष जुने मौजा कटेझरी व मर्मा जंगल परिसरात माओवाद्यांनी उभारलेले स्मारक गडचिरोली पोलीस दलातील जवानांनी नष्ट केले आहे.
मालेगाव महापालिका हद्दीत खड्ड्यांचे साम्राज्य
व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मनपाविरोधात महापालिकेचा उपरोधिक वाढदिवस केला खड्ड्यात साजरा..
नाशिक -
- नाशिकच्या सिडको परिसरात योगा क्लासच्या २.५ बाय २.५ बॅनरवर कारवाई करत गुन्हा दाखल
- नाशिक सिडको विभागीय कार्यालयाचा अजब कारभार
- ठाकरे गटाचे उप महानगरप्रमुख बाळा दराडे यांनी अधिकाऱ्यांचा सत्कार करत घातला साष्टांग नमस्कार
- उपरोधक पद्धतीने केला अधिकाऱ्याचा सत्कार करत केले गांधीगिरी स्टाईलने आंदोलन
धाराशिव -
खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील दसरा मेळाव्याला येणार नाहीत
पूरग्रस्तांना मदतांनाच मदत करा असे उद्धव ठाकरेंनी सांगितले
धाराशिवला पूराचा मोठा फटका बसला
हजारो हेक्टरवरील शेतीचे मोठे नुकसान झाले
नाशिक -
- मुंबईतील दसऱ्या मेळाव्यासाठी नाशिकहून ठाकरेंच्या शिवसेनेचे हजारो शिवसैनिक मुंबईला जाणार
- नाशिक शहर आणि जिल्ह्यातून शेकडो वाहनांच्या माध्यमातून मोठं शक्तीप्रदर्शन करत शिवसैनिक मुंबईला जाणार
- मुंबईतील दसरा मेळाव्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेची जोरदार तयारी
- विचारांचं सोनं लुटण्यासाठी मुंबईला जाणार, ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची प्रतिक्रिया
गोंदिया -
निर्माणाधीन इमारतीची भिंत कोसळून 1 मजूर ठार
दुसरा मजूर गंभीर जखमी
गोंदिया शहरातील मुख्य बाजार परिसरातील घटना
अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 29,327 हेक्टर क्षेत्रावर नुकसान.
अकोला जिल्ह्यात 16 व 29 सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे 111 गावे बाधित झाल्याचा अहवाल.
29 हजार 327 हेक्टर क्षेत्रात नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल समोर.
कापूस, सोयाबीन आणि तूर पिकाचे मोठ नुकसान.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांनी पाठवला शासनाकडं अहवाल.
पुणे -
प्रांजल खेवलकर येरवडा कारागृहातून बाहेर
पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर खेवलकर कारागृहातून बाहेर
पुणे पोलिसांकडे प्राप्त झालेल्या अहवालात खेवलकर यांनी ड्रग्स चे सेवन केले नसल्याचं उल्लेख, सूत्रांची माहिती
एफ एस एल रिपोर्ट मध्ये खेवलकर यांनी फक्त मद्द प्राशन केल्याची माहिती
पुण्यातील खराडी पार्टी प्रकरणात ड्रग्स कोणी आणले हा प्रश्न
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली
तब्येत बरी नसल्याने हॉस्पिटल मध्ये दाखल, व्हायरल तापाने त्रस्त
उद्या नारायण गड दसरा मेळाव्याला जाण्यावर ठाम, अंबुलन्स ला जाणार मात्र दसरा मेळावा परंपरा पाळणार
जालन्यातील घनसावंगीत मेंढ्यासह धनगर समाज रस्त्यावर उतरला.जालन्यात धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला असून जिल्ह्यातील विविध ठिकाणी धनगर समाजाने रास्ता रोको आंदोलन केलंय. धनगर समाजाला एसटी प्रवर्गाच्या अंमलबजावणीसाठी घनसावंगीतील बोडखा टी पॉईंटवर धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आलाय यावेळी दोन तास रस्त्यावर मेंढ्या बसवत हा रास्ता रोको करण्यात आलाय यावेळी वाहनाच्या रांगाच रांगा लागल्या होत्या..
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी जालन्यात दिपक बोऱ्हाडे यांच आमरण उपोषण सुरू आहे. त्यांच्या आमरण उपोषणाचा आजचा पंधरावा दिवस असून त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून राज्यभरामध्ये धनगर समाजाकडून ठीकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय. दरम्यान सरकारने लवकरात लवकर आमच्या मागण्यांवर निर्णय घ्यावा अन्यथा उद्यापासून उपोषण अधिक तीव्र करणार असा इशारा धनगर आंदोलक दिपक बोऱ्हाडे यांनी दिला आहे.
* उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शहरात लागले बॅनर
* शिवसेना कार्यकर्त्यांकडून शहरात बॅनरबाजी
* दसरा मेळाव्याला दोन्ही बंधू एका व्यासपीठावर येणार का याची उत्सुकता
इटकळ गावात शेकडो धनगर बांध व रस्त्यावर
जालना येथील दीपक बोराहडे करत असलेल्या उपोषण कडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
आरक्षण ची तात्काळ अंमलबजावणी करा मागणी
धाराशिव जिल्ह्यातील तीन महामार्गावर सुरू आहे आंदोलन
शेकडो मेंढ्या राज्यमार्गावर आणून उभ्या करत रास्ता सुरू
हिंगोली जिल्ह्यात धनगर समाज सरकारच्या विरोधात आक्रमक
औंढा जिंतूर मार्गावर मोठी वाहतूक कोंडी
मेंढ्या रस्त्यावर बसवल्याने वाहतूक कोंडी
पोलिसांनी मेंढ्या हाकालण्यास सुरुवात केली
दिवाळीपूर्वी नांदेड मधून या संघर्ष यात्रेला सुरुवात होणार
नांदेड, सिंदखेड राजा, चौंडी, गोपीनाथ गड या ऊर्जा स्थळांना या यात्रेच्या माध्यमातून भेटी देणार
लक्ष्मण हाके करणार यात्रेचे नेतृत्व
ओ बी सी समाजाला एकत्र आणत आणि ओ बी सी जोडो अभियान या यात्रेचे मूळ उद्दिष्ट
- सोन्याचे दर १ लाख २१ हजार रूपये प्रति तोळा रुपयांवर
- दर वाढून देखील मागील वर्षाच्या तुलनेत २० ते ३० टक्के अधिक सोन्याची बुकिंग
- सोन्याच्या दर वाढीमुळे जास्त वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांऐवजी कमी वजनाच्या दागिने खरेदीचा बाजारात ट्रेंड
- ग्राहकांच्या मागणीनुसार कमी वजनाचे सोन्याचे आकर्षक डिझाईन्सचे दागिन्यांची ग्राहकांना भुरळ
- गुंतवणूक म्हणून देखील सोने खरेदीकडे नाशिककरांचा कल
- सराफा बाजारात सोने खरेदीसाठी ग्राहकांची होतेय गर्दी
राज्यातील शेतकरी अतिवृष्टी मुळे उध्वस्त झाला अश्या परिस्थितीत सरकारने हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत करावी, सरसकट कर्जमाफी व ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी जळगावजामोद येथे उबाठा छता वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांच्या नेतृत्वात भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला...
या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले....
पैठण ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील बिडकीन येथे धनगर समाजाचे वतीने चक्काजाम आंदोलन
दिपक बोऱ्हाडे यांच्या वतीने सुरु असलेल्या आरक्षण उपोषणाला पाठिंबा, शासनाने दखल घेतली पाहिजे याकरिता आज बिडकीन येथील पैठण ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धनगर एस.टी.आरक्षण अंमलबजावणी करिता चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. सरकारच्या वतीने वारंवार धनगर समाजाला डावलले जात आहे.
संघाच्या शताब्दी कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नवीन टपाल तिकीट आणि नाणं जारी करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, विजयादशमीला शताब्दी हा योगायोग नाही. विजयादशमी म्हणजे असत्यावर सत्याचा विजय.
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी जालन्यात धनगर समाज आक्रमक झालाय.जालना - मंठा रोडवरील रामनगर येथे धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी जालन्यात धनगर आंदोलक दिपक बोऱ्हाडे यांच आमरण उपोषण सुरू असून त्यांच्या आमरण उपोषणाचा आजचा पंधरावा दिवस आहे. दिपक बोऱ्हाडे यांनी केलेल्या आवाहनानंतर जालना जिल्ह्यात ठीकठिकाणी धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येतय.जालन्यातील रामनगर येथे देखील धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येत असून या रास्ता रोको आंदोलनाला मराठा समाजाने पाठिंबा दिला आहे.
पुण्यातील कोथरूड भागात गोळीबार प्रकरणी पोलिस कारवाई करत असतानाच आता आणखी एक प्रताप याच भागातून समोर आला आहे. पुण्यातील कोथरूड परिसरात असणाऱ्या एका इमारतीत २ गुंड थेट पिस्तूल आणि हत्यार घेऊन शिरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे कुठलाही धाक न बाळगता या गुंडांनी चक्क सी सी टिव्ही मध्ये पिस्तूल आणि हत्यार दाखवत दहशत माजवली आहे. नेमकं कुठल्या उद्देशाने हे दोन गुंड या सोसायटी मध्ये शिरले होते याचा तपास सुरू आहे. हा सगळा प्रकार मंगळवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे. या गुंडांवर तात्काळ कारवाई व्हावी यासाठी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांची पोलिसांकडे मागणी करण्यात आली आहे...
हिंगोलीच्या वेलतुरा गावात पोलिसांनी आता दगडफेक करणाऱ्या दोन्ही गटातील 12 ते 13 जणांना अटक केली आहे, काल रात्री दुर्गादेवीच्या विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक झाली होती आणि त्यानंतर दोन्ही समाजातील तरुणांनी एकमेकांना लाट्या काठ्यांनी मारहाण केल्याची घटना घडली होती, दरम्यान मिरवणुकीत दुर्गादेवी व्यतिरिक्त कोणतेही गाणे लावू नका असे म्हणत काही तरुणांनी डीजे आणि बँड पथकाला मारहाण करत तोडफोड केल्याचा आरोप मिरवणुकीच्या आयोजकांनी केला तर गावात आमच्या नेत्यांचे पोस्टर फाडल्याने हा वाद सुरू झाल्याचं दुसऱ्या गटातील लोकांचे म्हणणे आहे या घटनेत आतापर्यंत 20 ते 25 जण जखमी झाले आहे त्यापैकी दोन जणांची पकृती गंभीर असल्याने त्यांना संभाजीनगरच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे, विशेष म्हणजे वाद होण्यापूर्वी दोन्ही समाजातील नागरिकांनी एकमेकांना दुर्गादेवीच्या महाप्रसादामध्ये जेवण करण्यासाठी निमंत्रित केले होते मात्र संध्याकाळी मिरवणूक सुरू होताच डिजेवर गाणे लावण्याच्या कारणावरून हा वाद उद्भवला आणि प्रचंड दगडफेक झाली आहे सध्या वेलतुरा गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचे दंगा नियंत्रण पथक व वरिष्ठ पोलीस अधिकारी संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत
रस्त्यावरती टायर पेटवत केला सरकारचा निषेध..
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी धनगर समाज आता आक्रमक झालाय..
जालन्यामध्ये धनगर आंदोलक दिपक बोऱ्हाडे यांच या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू असून आज त्यांच्या आमरण उपोषणाचा पंधरावा दिवस आहे..
दिपक बोऱ्हाडे यांनी राज्यभरामध्ये चक्काजाम आंदोलन करण्याचा आवाहन धनगर समाजाला केलं होतं...
यानंतर जालना जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी धनगर समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे...
आरबीआयने आपले पतधोरण जाहीर केले आहे. आरबीआयकडून रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. ५.५ टक्के इतकाच रेपो रेट ठेवण्यत आला आहे. त्यामुळे घरकर्ज, कार कर्जावर कोणताही फरक पडणार नाही.
दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांची जीवनवाहिनी अर्थात लोकलची बदलापूरकरच्या प्रवाशांनी सजावट करत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी बदलापूर रेल्वे स्थानकात महिला प्रवाशांनी भोंडल्याचा फेर धरत आणि फुगड्या खेळत आनंद घेतला.
लातूर जिल्ह्यात पूरग्रस्तांना नाम फाउंडेशन या सामाजिक संस्थेकडून मदत करण्यात आली आहे, पुरामध्ये अनेकांचे संसार पाण्यात गेले होते, दरम्यान याच पूरग्रस्तांना सामाजिक बांधिलकी म्हणून नाम फाउंडेशन कडून जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात पूरग्रस्तांना अन्नधान्य किट वाटप करण्यात आली आहे..
विजयादशमीच्या निमित्ताने आनंदाचे आणि उत्साहाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या झेंडूच्या फुलांची खरेदी करण्यासाठी पुण्यातील मार्केटयार्ड च्या फुलबाजारात मोठी गर्दी पाहायला मिळतेय. केशरी आणि पिवळे झेंडूच्या फुलांची किंमत ७० ते १०० रुपये प्रति किलो पर्यंत गेली आहे. राज्यातील झालेल्या पावसाचा फटका या फुलांवर बसला असून आवक कमी झाली आहे परिणामी काही प्रमाणात दर वाढले आहेत असं व्यापारी सांगतात. असं असताना सुद्धा झेंडूची खरेदी करण्यासाठी मार्केट यार्ड मध्ये पहाटेपासून मोठी गर्दी पाहायला मिळते आहे.
विधानसभा निवडणूक काळात गाडीवर दगडफेक झाली होती. गाडीवर दगडफेक करण्यात आली होती, त्यात काच फुठून जखम झाली होती. यात फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये एक मोठा दगड मारण्यात आला एक लहान दगड मारण्यात आला. आणि त्याचा काच फुटून जखम झाली असे फॉरेन्सिक अहवाल होता. यावर भाजपचे माजी मंत्री परिनय फुके यांनी फॉरेन्सिक रिपोर्टची वाट न पाहता, खोटी घटना असल्याचं बोलायला सुरुवात केली.अनिल देशमुख,
लोणी आणि कोपरगाव येथील विविध कार्यक्रमांना हजेरी...
प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीत प्रकल्पाचे शहा यांच्या हस्ते लोकार्पण...
यासह शहा यांच्या हस्ते लोणी येथे सहकार चळवळीचे जनक पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील आणि माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण...
लोणी बाजारातळ येथे आयोजित सभेस अमित शहा करणार मार्गदर्शन...
या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पर्यावरण तथा पशुसंवर्धन विकास मंत्री पंकजा मुंडे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह अन्य मंत्री तसेच महायुतीचे लोकप्रतिनिधी राहणार उपस्थित...
सततच्या पावसाने जवळपास सर्वच पिकांचे नुकसान होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही परवडत नाही शेगाव तालुक्यातील लासुरा येथील शेतकरी आनंद जवंजाळ यांनी आपल्या दोन एकर शेतात उडीद पिकाचे उत्पन्न घेण्याचं ठरवलं होतं पीकही चांगल आलं होतं. मात्र हातात तोंडाशी आलेल्या उडीद पिकाला सततच्या पावसाने मोठा फटका बसला व त्यामुळे उत्पादन खर्च परवडत नसल्याने आनंद जवंजाळ यांनी दोन एकर शेतातील उडीद पिकाच्या सुडीला स्वतःच आग लावून पेटवून दिलं.
लातूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने शेती पिकांबरोबर, फळबागांना देखील मोठा फटका बसलाय, विशेषता नदीकाठची फळबाग पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे . लातूरच्या कासारखेडा शिवारात मांजरी नदीला आलेल्या पुरामुळे दोन एकर भाग पाण्यात होती, मात्र पूर ओसरला आणि आता जागेवरच पेरून साडीला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांच प्रचंड मोठ नुकसान झालं आहे.
भाजपच्या ताब्यात असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेकडून माजी आमदार राजन तेली यांना धक्का मिळाला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची फसवणूक केल्या प्रकरणी राजन तेली यांच्यासह आठ जणांची दिल्ली येथील बँक सुरक्षा व फसवणूक विभागाकडून चौकशी होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेकडून 2021 22 मध्ये राजन तेली यांनी कर्ज घेतलं होतं या कर्जाचा त्यांनी चुकीच्या पद्धतीने वापर केला अशा पद्धतीचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. राजन तेली यांच्यासह त्यांचा मुलगा प्रथमेश तेली, सर्वेस तेली तसेच रुजीता तेली यांच्यासह एकूण आठ जणांवर हा ठपका ठेवण्यात आला आहे. याबाबत जिल्हा बँकेने २२ सप्टेंबर 2025 रोजी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे राजन तेली यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राजन तेली हे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष तसेच माजी आमदार राहिले आहेत. नारायण राणे यांचे ते कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेत प्रवेश करून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र त्या ठिकाणी ते पराभूत झाले होते. तेव्हापासून राजन तेली यांच्या अडचणी वाढल्या असून पराभूत झाल्यानंतर गेले काही महिने ते राजकारणापासून अज्ञात वासात गेले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापदी पदासाठी आरक्षण जाहिर
मंडणगड संगमेश्वर लांजा पंचायत समिती सभापतीसाठी सर्वसाधारण महिला आरक्षण
रत्नागिरी चिपळूण गुहागर आणि खेड पंचायत समिती सभापती पदासाठी सर्वसाधारण (ओपन) गटासाठी आरक्षण
दापोली पंचायत समिती सभापती साठी नागरिकांचा मागास प्रवर्ग, तर राजापूर पंचायत समिती सभापती साठी नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री साठी आरक्षण
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात निघाली आरक्षण सोडत
रत्नागिरी जिल्ह्यात ९ पंचायत समित्या, सभापती पदाच्या आरक्षण सोडती नंतर सर्व राजकीय पक्षांची मोर्चे बांधणी
पासपोर्ट बनविण्यासाठी मदत करणाऱ्यांची तपासली जातेय कुंडली
घायवळ याने स्वतःच्या आडनावात फेरफार करून पारपत्र मिळविल्याचा संशय पोलिसांना आहे
"घायवळ" ऐवजी "गायवळ" असे नाव त्याने पारपत्रासाठी वापरले आहे
त्याला पारपत्र बनविण्यासाठी मदत करणाऱ्या प्रत्येकाची कुंडली पुणे पोलिसांकडून तपासली जात आहे
दरम्यान दुचाकीची बनावट वाहन क्रमांकाची पाटी वापरल्याप्रकरणी घायवळवर कोथरूड पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला
गोळीबार प्रकरणात स्वित्झर्लंडला फरार झालेला गुंड नीलेश घायवळसह त्याच्या कुटुंबीयांची १० बँक खाती गोठवण्यात आली आहेत
राज्यात शंभर टक्के पीक पाहणी होणार, एक ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या महिन्याभरात पीक पाहणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
राज्य आपत्कालीन परिस्थितीतून जात असल्याने 100 टक्के पीक पाहणी अत्यंत महत्त्वाची असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकरी हिताची काळजी घेऊन पाहणी करावी,असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश
खरीप हंगाम 2025 साठी ही पीक पाणी महत्त्वाची.
पंढरपूरच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने मागील वर्षी गाळपास आलेल्या उसाला सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक तीन हजार तीन रुपये इतका ऊस दर दिला आहे. आणखी पाचशे रुपये शेतकऱ्यांना लवकरच दिले जातील असे आश्वासन कारखान्याचे अध्यक्ष व आमदार अभिजीत पाटील यांनी दिली.
विठ्ठल साखर कारखान्याची 50 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेमध्ये आमदार अभिजीत पाटील यांनी माहिती दिली. यावेळी कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदिपन समारंभ ही संपन्न झाला. यावर्षी किमान 20 लाख टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गाळप हंगाम एक नोव्हेंबर पासून सुरू होणार असून प्रतिदिनी 14000 टन ऊस गाळप केले जाणार आहे असेही आमदार अभिजीत पाटील यांनी सभेत सांगितले.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना देण्यात आलेली वाय प्लस सुरक्षा व्यवस्थेवरून नवा वाद सुरू झाला आहे. मराठा आणि ओबीसी समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणाऱ्या लक्ष्मण हाके यांना सरकारने दिलेली वाय प्लस सुरक्षा तत्काळ काढून घ्यावी अन्यथा राज्यभर आंदोलन केले जाईल असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी दिला आहे.
लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर राज्य सरकारने ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना वाय प्लस सुरक्षा व्यवस्था दिली आहे. त्यावरून आता मराठा क्रांती मोर्चा ने आक्षेप घेत त्यांची सुरक्षा व्यवस्था काढून घ्यावी अशी मागणी केली आहे.
लक्ष्मण हाके हे वाचाळ वीर आहेत समाजामध्ये तेढ निर्माण करून जातीयवाद निर्माण करत आहेत अशा लोकांना सरकार सुरक्षा सुरक्षा देऊन समाजाविरोधात बोलण्याची लायसन देणार असेल तर मराठा क्रांती मोर्चा ती खपवून घेणार नाही याबाबत लवकरच राज्यव्यापी बैठक घेऊन तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही श्री डोंगरे यांनी दिला आहे.
- नाशिक शहरात आजपासून शस्त्र आणि जमावबंदी आदेश जारी
- आजपासून १५ ऑक्टोबरपर्यंत १५ दिवस शस्त्र आणि जमावबंदी आदेश लागू
- सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी निर्णय
- या कालावधीत सभा, मिरवणुका काढण्यास पोलिसांची रीतसर परवानगी आवश्यक
- शस्त्र आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा
महानगरपालिकेच्या अग्निशामन विभागाच्या नूतन इमारतीचं बांधकाम सुरू होते
साडेनऊ वाजण्याच्या सुमारास इमारतीचा स्लॅब कोसळला
स्लॅबखाली काही जण अडकल्याची भीती
घटनास्थळी मदतकार्य सुरू, इमारतीचा स्लॅब नवीनच सुरू असल्याने घडली दुर्घटना
घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार, माजी आमदार ऋतुराज पाटील दाखल
राज्यात झालेल्या अतिवृष्टीने एकूण २६ जिल्हे बाधित झाले असून यात यवतमाळ, अमरावती, वाशिम, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, सोलापूर, पुणे, अहिल्यानगर, सातारा, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, बीड, जालना, छ. संभाजीनगर, जळगाव, रायगड, रत्नागिरी, सांगली, नाशिक, ठाणे, पालघर, नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश आहे तर एकूण बाधित तालुके 178 असून सर्वाधिक बाधित जिल्हे अहिल्यानगर, बीड, सोलापूर, जालना, नाशिक परभणी, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ आहे.या अतिवृष्टीमुळे प्राथमिक अंदाजानुसार 32 लाख 34 हजार 238 हेक्टर एवढं नुकसान झालं असून तर सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, भुईमुग, ऊस, कांदा, भात, नाचणी, आजीपाला, फळपिके ही पिके बाधित झाले आहे.
कृषी विभागाच्या माहितीनुसार सर्वाधिक अहिल्यानगर जिल्ह्यात ५ लाख ७८ हजार ७९८ हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे,बीड जिल्ह्यात ५लाख ७१ हजार १०० हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे तर जालन्यात ३ लाख ७५ हजार ९७३ हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे.तसेच सोलापूर जिल्ह्यात ३लाख ८६ हजार ९३१ हेक्टर क्षेत्र,यवतमाळ जिल्ह्यात १३७५६८ हेक्टर क्षेत्र,नाशिक जिल्ह्यात २७९२२० हेक्टर क्षेत्र,संभाजीनगर येथे १६६२२६ हेक्टर क्षेत्र,परभणी जिल्ह्यात २१०३१४ हेक्टर क्षेत्र,धाराशिव जिल्ह्यात १८१२०० हेक्टर क्षेत्र असे एकूण २७ जिल्हे बाधित झाले असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीच्या पाण्यामुळे सोयाबीन,कापूस,तूर,उडीद, मूग या पिकासह झेंडू शेतीचं सुद्धा होत्याचं नव्हतं केलय...झेंडू फुलांना दसरा आणि दिवाळीला मोठ्या शहरात प्रचंड मागणी असते. मात्र या वर्षी झेंडूच्या शेतीमधून शेतकऱ्यांच्या हाती काही लागणार नाही. अतिवृष्टीच्या पाण्यामुळे झेंडूची झाडं पूर्णपणे आडवी झाली आहेत. तर अतिपावसामुळे फुल सुद्धा सडली आहेत. त्यामळे ऐन दसऱ्याच्या मुहूर्तावर झेंडू फुले निघणार नसल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
आम्ही पारंपारिक पीकाला फाटा देऊन झेंडू ची शेती केली मात्र सततच्या पावसानं आमच्या झेंडू च्या शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे.या झेंडू शेतीवर केलेला उत्पादन खर्च ही वसूल होणार नाही.या साठी राज्य सरकारनं आमच्या झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी.
नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला (एनएमआयए) नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) कडून 'एरोड्रोम' परवाना मंजूर झाला आहे. हा परवाना विमानतळ कार्यान्वित करण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. विमान वाहतूक प्राधिकरणाच्या सर्व सुरक्षा आणि नियामक अटी पूर्ण केल्यानंतर हा परवाना देण्यात आला आहे.
बोरिवली स्टेशनवर झालेल्या तब्बल ४.५ लाख रुपयांच्या फिल्मी स्टाईल दरोड्याचा बोरिवली जीआरपीने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय सूत्रांचा वापर करून सहा आरोपींना अटक करण्यात आली असून जीआरपी ने त्यांच्याकडून.२.८५ लाख रुपये जप्त केले आहेत.अहमद शेख (३२), मंगलराज राय (२८), तानाजी माने (३०), राजू शेख (२६), कृष्णा कानजोडकर (४०) आणि सुरेश कुलकर्णी (५६)अशी अटक केलेल्या आरोपींची नावे अशी आहेत. हे सर्व आरोपी मुंबई आणि ठाणे परिसरातील असून, त्यांच्यावर चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
उल्हासनगर कॅप नंबर पाच परिसरातील महादेव सेल्स या दुकानाच्या गोडाऊनला रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास भीषण आग लागली , या आगीत गोडाऊन मधील चादरी, टॉवेल आणि कपडे जळून खाक झाले , अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या , अखेर अग्निशमन दलाच्या जवांनाच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं, गोडाऊन मध्ये मोठ्या प्रमाणात कपडे असल्याने आगीचा मोठा भडका उडाला होता, गोडाऊनच्या पहिल्या मजल्यावरील सर्व साहित्य जळून खाक झालं , मात्र आगीवर वेळीच नियंत्रण मिळाल्याने आजूबाजूच्या दुकानांना झळ पोहचली नाही, मात्र ही आग कशामुळे लागली हे मात्र समजू शकता नाही
पावसाळ्याच्या तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर आज ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी सुरू झाला. मात्र वाढलेल्या तिकिटांचा मुद्दा घेत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आंदोलनाची भूमिका घेतल्याने आजचा प्रारंभ वादग्रस्त ठरला. खासदार धानोरकर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार त्या आज पहाटेच मोहर्ली प्रवेशद्वारावर कार्यकर्त्यांसह दाखल झाल्या असून, एकही पर्यटक जिप्सी प्रकल्पात जाण्यास त्यांनी विरोध सुरू केलाय. त्यामुळे आताची पहिली सफारी खोळंबली आहे. पर्यटक गेटवर सफरीसाठी थांबून आहेत. जोपर्यंत दर मागे घेतले जात नाहीत आणि समाधानकारक तोडगा निघत नाही, तोवर एकही जिप्सी आतमध्ये जाऊ देणार नाही, अशी भूमिका खासदार धानोरकर यांनी घेतल्याने पहिल्याच दिवशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. सध्या अधिकारी आणि खासदार यांच्यात चर्चा सुरू आहे. दरम्यान, खासदार आंदोलनासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्याने ताडोबा व्यवस्थापनाने आधीच प्रवेशाचा मुहूर्त साधत पूजा आटोपून घेतली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.