Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसाला पुन्हा मुंबईत आणणार - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज रविवार, दिनांक १४ डिसेंबर २०२५, हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस, राज्यात थंडीचा कडाका वाढला, जिल्हा परिषद-महापालिका निवडणुका अपडेट्स, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसाला पुन्हा मुंबईत आणणार - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संतोष देशमुखांना न्याय देणार

मुंबईत कमी दरात गिरणी कामगारांच्या वारसांना घरे देणार

पुढील वर्षात मुंबई खड्डेमुक्त करणार

मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसाला पुन्हा मुंबईत आणणार - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Ahilyanagar: लहान मुलाचा जीव घेणारा बिबट्या जेरबंद

अखेर नरभक्षक बिबट्या जेरबंद...

लहान मुलाचा जिव घेणारा बिबट्या जेरबंद...

वनविभागाकडून कालपासून सुरू होती शोधमोहीम...

संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग गावात नरभक्षक बिबट्याची शोधमोहीम होती सुरू...

सिद्धेश कडलग या चारवर्षीय चिमुकल्याचा जिव घेणारा बिबट्या जेरबंद...

आढळा नदिकाठच्या गवतात लपलेल्या बिबट्याला बेशुद्ध करत केले जेरबंद...

वनविभागाला आले मोठे यश...

चार टिम करत होत्या बिबट्याचा तपास...

रायगडच्या पेणमध्ये स्ट्राँगरूममध्ये उंदरांचा वावर आढळून आला

रायगडच्या पेणमध्ये नगर पालिका निवडणुकीच्या मतदान मशिन सुरक्षित ठेवण्यात आलेल्या स्ट्राँगरूममध्ये शनिवारी रात्री उंदरांचा वावर आढळून आला. यानंतर पेणमध्ये खळबळ उडाली. स्ट्राँग रूममधील उंदरांच्या या वावरामुळे प्रशासनाचा हळगर्जीपणा समोर येत असल्याचा आरोप केला जात आहे.

Nanded : महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांमुळेच नांदेडच्या बिलोली तालुक्यात वाळूची तस्करी

नांदेडच्या देगलूर आणि बिलोली या तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांना वाळू मिळत नाहीय, परिणामी बिलोली येथील उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या संगनमताने अवैध वाळू तस्करी जोमात सुरू असल्याचा आरोप देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापुरकर यांनी विधानसभा सभागृहात केला आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांमुळेच वाळू तस्करी जोमा सुरू असल्याचे अंतापुरकर म्हणाले.

Pandharpur : शरद पवार गटाचे नेते भारत पाटील यांच्या अंगावर आॅईल फेकले

शरद पवार गटाचे नेते भारत पाटील यांच्या अंगावर आॅईल फेकले..

छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याने मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केली आॅईल फेक

Nandurbar : सारंगखेडा अश्वांचे सौंदर्य स्पर्धा सुरू

सारंखेडाच्या अश्व बाजारात सुरू असलेल्या सौंदर्य स्पर्धा आकर्षणाच्या केंद्रबिंदू ठरत आहेत ज्या पद्धतीने हिरो आणि हिरोईनीची जश्या सौंदर्य स्पर्धा होतात तश्याच त्या घोड्यांच्याही होत असतात.

Pune : ओबीसी नेते ऍड मंगेश ससाणेयांच्या गाडीवर बीड माजलगाव मध्ये हल्ला

माजलगावमध्ये ओबीसी नेते ऍड मंगेश ससाणे यांच्या गाडीवर हल्ला.

पवन करवर यांच्यावर झालेल्या हल्ल्या संदर्भात आरोपीना अटक होत नाही

म्हणून माजलगाव पोलीस स्टेशनला जाब विचारल्याच्या रागातून हल्ला

Latur : लातूरच्या वानवडा शिवारात चार चाकी गाडीला भीषण आग

लातूरच्या औसा तालुक्यातील वानवडा शिवारात मध्यरात्री चार चाकी स्कोडा कंपनीची गाडी जळून खाक झाली आहे , गाडीतील चालक वय अंदाजे 35 वर्ष याचा यामध्ये होरपळून मृत्यू झालाय, दरम्यान गाडीतील चालक संपूर्ण जळाल्याने पोलिसांकडून ओळख पटवण्याचे काम सुरू आहे, तर हा घातपात असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. घटनास्थळाचा पंचनामा करत, औसा पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवली आहेत.

जळगावमध्ये अपघात, २ जणांचा मृत्यू

जळगावच्या जामनेर तालुक्यात गारखेडा येथे प्रवासी वाहतूक रिक्षा व रस्त्याचे काम करणाऱ्या सिमेंट मिक्सर वाहनाचा अपघात झाला. या भीषण अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण गंभीर जखमी झाले आहेत.

लवकरच अंबरनाथकरांची पाण्याची समस्या सुटणार

अंबरनाथ पश्चिमेकडील नालिंबी येथे सुरू असलेल्या जल शुध्दीकरण प्रकल्पाच्या काम सध्या प्रगतीपथावर असून . शहरातील वाढती पाण्याची गरज लक्षात घेता या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे.कल्याण लोकसभाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागला असून येत्या एक ते दीड वर्षांत तो पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहे. आमदार बालाजी किणीकर यांनी कामांची पाहणी करून अधिकाऱ्यां कडून माहिती घेऊन सूचना दिल्या,प्रकल्प सुरू झाल्यानंतर अंबरनाथकरांना मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. अस मत शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा वाळेकर यांनी व्यक्त केलं.

पाठीवरील बॅगेत दगड भरून दंतचिकित्सकाची आत्महत्या

जयसिंगपूर येथे राहणाऱ्या अवधूत मुळे या दंतचिकित्सकाने कोल्हापुरातील राजाराम तलावात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करत असताना अवधूत मुळे याने पाठीवरील बॅगेत दगड, विटा भरल्या मित्र परिवारातील अनेकांना शेवटचा संदेश पाठवला.. राजाराम तलावाच्या काठावर दुचाकी उभी करून 'सुसाईड नोट' लिहिली आणि पाण्यात उडी घेत त्यांनी जीवन संपवले आहे. कौटुंबिक नैराश्येतून त्याने आत्महत्या करून जीवन संपवण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ऊसाच्या शेतात चारही पाय तोडलेल्या मादी बिबट्याचा मृतदेह

सातारा तालुक्यातील मत्त्यापूर येथील बरड शिवारात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला.शेतकरी रविंद्र आबाजी घोरपडे यांच्या ऊसाच्या शेतात चारही पाय तोडलेल्या मादी बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

बुलढाणा जिल्ह्यात लवकरच दाखल होणार 150 ईव्ही एसटी बस

पर्यावरणाला आळा घालण्यासाठी राज्यभरातच ईव्ही एसटी बस दाखल झाल्या आहेत, त्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यातील सात आगारांसाठी विद्यार्थी आणि राजकीय नेत्यांच्या मागणीनुसार 150 ईव्ही एसटी बसची मागणी करण्यात आली होती.. त्यापैकी पहिल्या टप्प्यात या आठवड्यात 12 बस दाखल होणार आहेत, तर काही दिवसात उर्वरित बस देखील टप्प्याटप्प्याने येणार आहेत..

१६ डिसेंबरला महाविकास आघाडीचा भव्य मोर्चा

पनवेल शहरातील विविध महत्त्वपूर्ण नागरी प्रश्न, महापालिकेची धोरणे आणि नागरिकांवर वाढत असलेला ताण, महानगरपालिकेचा वाढीव मालमत्ता कर, शहरातील रस्ते, पाणीटंचाई, तळोजा एमआयडीसी परिसरातील गंभीर प्रदूषण यांसह अनेक तातडीच्या समस्यांकडे लक्ष वेधले.

या सर्व प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी पनवेल महाविकास आघाडीच्या वतीने १६ डिसेंबर रोजी पनवेलमध्ये भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. या मोर्चात महाविकास आघाडीतील राज्यपातळीवरील प्रमुख नेतेही सहभागी होणार आहेत

मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी आरोपीचा समर्थन करणाऱ्या लोकांवर कारवाई करावी : धनंजय देशमुख

बीडसह छत्रपती संभाजीनगर मध्ये काल दिवसभर सुनावणी पार पडली पुढच्या तारखेपर्यंत चार्ज फ्रेम होईल अशी अपेक्षा आहे. संभाजीनगर येथे कोर्टाला व्हिडिओ दाखवण्यात आले.. कोर्ट ते पाहू शकलं नाही आम्हाला आश्रु अनावर झाले. आम्ही या दुःखातून बाहेर निघालेले नाहीत. आणि कधी निघू शकणार नाहीत.. एवढ्या निर्गुणपणे ही हत्या करण्यात आली. आणि आरोपीचा समर्थन करणारी टोळी सक्रिय झालीये तिला वारंवार सोशल मीडिया असेल बोलताना आरोपीची आठवण येत आहे.. या लोकांवर कारवाई झाली पाहिजे यासाठी मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना कारवाई करावी. अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे.

शिक्षण विभागाची मोठी कारवाई, मुंबईतील दोन शाळांची मान्यता रद्द

मोफत शिक्षण कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबईतील दोन शाळांची मान्यता रद्द करण्यात आली.

श्रीमती मनरादेवी एज्युकेशन संस्था आझादवाडी, दामू नगर, कांदिवली पूर्व मुंबई, तर हनुमंत विद्यामंदिर शाळा कावरपाडा सातीवली पूर्व केंद्र वालीव तालुका वसई जिल्हा पालघर इंग्रजी माध्यम आणि हिंदी माध्यम या दोन शाळांची मान्यता शिक्षण विभागाने केली रद्द

DHULE धुळ्यात आज तापमानाचा पारा 6°c वर

धुळ्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा दहा अंशांच्या खाली नोंदविला गेला आहे, धुळ्यात आज तापमानाचा पारा 6°c वर आहे, वाढत्या थंडीमुळे धुळेकर नागरिक चांगलेच गारठले असून, थंडीपासून आपला बचाव करण्यासाठी नागरिक शेकोटीचा आधार घेत गरम व उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे,

हवेमध्ये वाढलेला प्रचंड गारवा यामुळे धुळेकरांना वाढत्या थंडीचा सामना करावा लागत आहे, यापुढे देखील थंडीचा जोर असाच कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे, त्यामुळे पुढील काळात देखील अशाच प्रकारे धुळेकरांना थंडीचा सामना करावा लागणार असल्याचा अंदाज आहे.

कोकणात थंडीने जोर धरल्यामुळे आंबा काजू कलमांना जोमदार मोहर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात थंडीने मागील आठवड्यापासून जोर धरल्याने कोकणातील किनारी भागात आंबा आणि काजू कलमांना मोठ्या प्रमाणात मोहर आल्याचे दिसून येत आहे. देवगड,वेंगुर्ला, म्हापण, खवणे, निवती या पट्ट्यात समुद्राची खारट हवा आणि थंडी यामुळे आंबा बागायतींमध्ये कलमांना जोमदार मोहर आला आहे. पुढील १५ दिवस थंडी कायम राहिल्यास यंदा कोकणात आंबा, काजू, जांभूळ पीक जोरदार येण्याची शक्यता आहे.

पाथरी तालुक्यात अवैध रेती उत्खननाविरोधात महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई

पाथरी तालुक्यात अवैध रेती उत्खननावर प्रशासनाची कडक कारवाई करण्यात आली . महसूल व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने गोंडगाव येथे कारवाई करत अवैध रेती उत्खननासाठी वापरण्यात येणारे तराफे जागेवरच नष्ट केले आहेत. नायब तहसीलदार रमेश धोपे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईत पोलीस निरीक्षक , ग्राम महसूल अधिकारी तसेच संबंधित कर्मचारी सहभागी होते. अवैध रेती उत्खननामुळे पर्यावरणाचे होत असलेले नुकसान रोखण्यासाठी आणि कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

nashik-chandvad-रस्त्याच्या वादातून सख्या भावाने भावाला जाळण्याचा केला प्रयत्न

नाशिकच्या चांदवड तालूक्यातील गंगावे येथे रस्त्याच्या वादातून सख्या भावाने च भावाला जाळण्याचा प्रयत्न शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान घडला.गंगावे येथील नरोटे वस्तीवर राहणा-या काशिनाथ चिंधा नरोटे व त्यांचा भाऊ दामू चिंधा नरोटे यांच्यात शेत रस्त्याच्या व मागील भांडणाची कुरापत काढून दामू चिंधा नरोटे याने शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान घरातील लोकांच्या मदतीने घराबाहेर खाटेवर झोपलेल्या भावाच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला त्यात काशिनाथ नरोटे गंभीर जखमी झाले ही घटना लक्षात येताच त्यांना तातडीने प्राथमिक उपचारासाठी चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करुन पुढील उपचारासाठी नाशिक येथे पाठवण्यात आले असून चांदवड पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे.

बदलापुरातल्या घोरपडे चौकात भीषण आग

बदलापूर आतल्या घोरपडे चौकात आज भीषण आग लागली. इथल्या स्पर्श हॉस्पिटलच्या ग्राउंड फ्लोअर वरील अल्फा फार्मसीला या आग लागली. पहाटे 4 च्या सुमारास ही आग लागली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

गेल्या २४ तासांत थंडीचा पारा पुन्हा अर्धा ते एक अंशाने खाली आला.

पुणे शहरासह जिल्ह्यात गेल्या २४ तासांत थंडीचा पारा पुन्हा अर्धा ते एक अंशाने खाली आला. त्यामुळे थंडीची लाट आणखीन तीव्र झाली आहे

बारामातीसह पाषाण आणि शिवाजीनगर परिसरात कडाक्याच्या थंडी आणि दाट धुके होते.दरम्यान, पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यातील हवामान कोरडे राहील, पहाटे धुक्याचे प्रमाण वाढेल तर किमान तापमानात काही अंशी घट होणार असल्याने थंडीची लाट कायम राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

आजचे तापमान

पाषाण ८.३

शिवाजीनगर ८.८

कोरेगाव पार्क १३.३

चिंचवड १४.१

वडगावशेरी १५.३

मगरपट्टा १५.६

हवेली ७.१

बारामती ७.७

माळीण ८.५

दौंड ९.३

तळेगाव ९.४

आंबेगाव १०

निमगिरी ११.२

भोर १३.१

मुदखेडमध्ये भीषण आग: दोन दुकाने जळून खाक. लाखो रुपयाची नुकसान 

नांदेडच्या मुदखेड शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या अनुसया मार्केटमध्ये मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत दोन नामांकित दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली असून व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे झाले आहे.शहरातील अनुसया मार्केटमधील स्वामी समर्थ फूटवेअर आणि कार्तिक ड्रायक्लीनर्स या दोन दुकानाला आग लागली. आगीने रौद्र रूप धारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु या घटनेत दोन्ही दुकानदारांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले.

अंबड येथील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच लावले एलईडी स्क्रीन 

जालना जिल्ह्यातल्या अंबड तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच आता राजकीय पक्षाचे नेते,पदाधिकारी, आणि सर्वसामान्य नागरिकांना स्ट्रॉंग रूम मधील सर्व चित्रीकरण 24 तास पाहता येणार आहे. प्रशासनाकडून या ठिकाणी एलईडी स्क्रीन लावण्यात आलं असून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना सर्व चित्रीकरण पाहता येणार असून त्यांच्या मनातील भीती दूर होऊन पारदर्शकता दिसून येईल अशी प्रतिक्रिया अंबड चे तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिलीय. अंबडच्या स्ट्रॉंग रूम अवतीभवती त्रिस्तरीय पोलीस बंदोबस्त तैनात असून सीसीटीव्ही कॅमेऱ्याची देखील करडी नजर आहे शिवाय त्यातच आता भर पडून एलईडी स्क्रीन सुद्धा लावण्यात आली आहे.

थंडीत नदीचा अनोख नजरांना,यवतमाळ जिल्ह्यात हुडहुडी कायम

हवामान विभागाने थंडीची लाट येणार असल्याचा अंदाज वरती दिला होता यंदाच्या हंगामातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद काल करण्यात आली.दरम्यान उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे यवतमाळ अनेक जिल्हे गारठले असून थंडीमुळे पहाटे दरम्यान नदीतून वाहणाऱ्या पाण्यातून वाफा निघत असल्याचे चित्र पाहायला मिळतेय

केडीएमसीचा अजब कारभार पुन्हा उघड, झोपडीला २.३३ लाखांचा मालमत्ता कर

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कारभारातील गळथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी मयत आणि सेवेतून निवृत्त कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निघाल्याचा प्रकार ताजा असतानाच, आता टिटवाळ्यातील कातकरी पाड्यात राहणाऱ्या एका आदिवासी विधवा महिलेला तब्बल २ लाख ३३ हजार रुपयांचा मालमत्ता कर भरण्याची नोटीस पाठविण्यात आली आहे.

बिबट्याने घेतला चार वर्षीय चिमुकल्याचा बळी.. संगमनेर तालुक्यातील घटना

संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग गावात सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बिबट्याने एका चार वर्षीय चिमुकल्याचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना घडलीय..यामुळे चिमुकल्याचे नातेवाईक आणि ग्रामस्थ संतप्त झाले असून जोपर्यंत नरभक्षक बिबट्याला ठार केले जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पावित्रा घेतल्याने वातावरण तणावपूर्ण बनलय.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाटकं करू नये - चव्हाण

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड जन गण मन या पुस्तकाच प्रकाशन करण्यात आल. या कार्यक्रमांत बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडकवीस यांच्यावर कडवी टीका केली आहे. विधानसभेतील विरोधी नेते पद देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्ष तसेच सभापती यांच्या मागे लपू नये म्हणत मुख्यमंत्री यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र सरकारने मुख्यतः देवेंद्र फडणवीस यांनी मोठे पना दाखवत विरोधी पक्षाला स्थान दिले पाहिजे l... विरोधी नेते पदाला एक पद मिळते त्यांना कॅबिनेटच्या दर्जा मिळतो l, त्यांना एक कार्यालय मिळतो, मात्र ते देण्यासाठी त्यांनी विधानसभा अध्यक्ष असेल किंवा सभापती असेल यांच्या मागे त्यांनी लपू नये हा सर्व अधिकार त्यांचा आहे.त्यामुळे त्यांनी बाकी काही नाटक करू नका तुम्हाला जर करायचे असेल तर लगेच करून टाका किंवा नसेल करायचे तर तसे सांगून टाका अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai: खरंच मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार का? मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्टच सांगतिलं...

आईची अस्थी घेऊन जाताना कारचा अपघात; भरधाव बसची मागून धडक, २ सख्ख्या भावांसह चौघांचा मृत्यू

Meditation Benefits: दररोज सकाळी १० मिनिटे मेडिटेशन केल्याने शरीराला कोणते फायदे होतात, जाणून घ्या

KDMC : केडीएमसीचा गळथान कारभार! झोपडपट्टीला २.३३ लाखांची नोटीस; विधवा महिलेचं घर जप्त करण्याचा इशारा

Box Office Collection: शनिवारी 'धुरंधर' ने बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ; कपिल शर्माच्या 'किस किसको प्यार करूं 2'चं कलेक्शन किती?

SCROLL FOR NEXT