आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरातील विकासकामांना अंतिम रूप देण्यात येत असून सुरक्षा, गर्दी नियंत्रण आणि दर्शन व्यवस्थेची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. ऑनलाइन नोंदणी, मर्यादित प्रवेश आणि कडक नियोजनामुळे भाविकांना सुकर दर्शनाचा अनुभव देण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे.
माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज पुण्यात सर्व पक्षीय शोकसभेचे आयोजन
शोकसभेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार शरद पवार राहणार उपस्थित
संध्याकाळी ५ वाजता पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिरात शोकसभेचे आयोजन
राज्यातील अनेक नेते शोकसभेले येण्याची शक्यता
वैभववाडी नगरपंचायत प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे आणि रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे सांगुळवाडी येथे एक रिक्षा उलटून अपघात झाला. या अपघातात तिघे जण जखमी झाले असून, या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून जोरदार ‘रास्ता रोको’ आंदोलन केले.या खराब रस्त्यामुळे आतापर्यंत येथे चार अपघात झाले आहेत, मात्र तरीही नगरपंचायत प्रशासनाला जाग आलेली नाही. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांनी यापूर्वी प्रशासनाला लेखी निवेदनही दिले होते, परंतु प्रशासनाने या मागणीकडे सपशेल दुर्लक्ष केले. प्रशासनाच्या याच हलगर्जीपणामुळे आजचा अपघात घडल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.
राष्ट्रीय अन्न योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळावा, यासाठी बनावट लाभार्थी शोधण्याच्या दृष्टीने शासनाच्या 'मिशन सुधार' मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील २३,५७४ रेशनकार्डाची पडताळणी होणार आहे. यापैकी दुबार असलेली १,५५३ आणि आधार क्रमांक नसलेली अशी ४,१७६ मिळून एकूण ५,७२९ रेशनकार्ड रद्द करण्यात येणार आहेत. तसेच दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ वापरात नसलेली कार्डही रद्द केली जाणार आहेत. त्याचप्रमाणे वार्षिक उत्पन्न, उत्पन्नाचे स्रोत, वाहन आदी निकषांवर उर्वरित रेशनकार्डाची पडताळणी होणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर रेश्मा काळे महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना आपली साथ देणार असून आपला प्रचार ते आता थांबवणार आहे अधिकृतरित्या त्यांनी यावेळी नंदकिशोर महाजन यांना पाठिंबा जाहीर केला असून जळगावतही आता बंड शमणार आहे या संदर्भात रेशमा काळे यांनी अधिक माहिती दिली
चिखली येथील रामकृष्ण परमहंस मौनीबाबा शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनुराधा इंजिनिअरिंग व पॉलिटेक्निक महाविद्यालयांच्या परवानग्यांसाठी सादर करण्यात आलेली काही प्रमाणपत्रे बनावट असल्याचा आरोप असून, त्याआधारे शासनाचा निधी मिळविण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 465, 467, 468, 471 आणि 120-ब अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीनसिंह चौहान करीत आहेत.
विरार पूर्वेतील फुलपाडा परिसरात वीज दुरुस्तीचे काम करताना महावितरणच्या २२ वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू गौरव सुरेश मोरे असे मृत कामगाराचे नाव आहे.
विरारच्या चोरघे टॉवरजवळील वीज खांबावर गुरुवारी दुरुस्तीचे काम सुरू असताना गौरव याला अचानक विजेचा तीव्र धक्का बसला. धक्क्यामुळे तो खांबावरून खाली कोसळून गंभीर जखमी झाला होता.
स्थानिक नागरिक आणि सहकाऱ्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी विरार पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
पाच महिन्यांनंतर १५ जूनपासून श्रीक्षेत्र भिमाशंकर मंदिर भाविकांसाठी खुले होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज भिमाशंकरमध्ये दाखल होत असून विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या कामांचा, सुरक्षा व्यवस्थेचा आणि भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या सुविधांचा सखोल आढावा घेणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.