शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी प्रहारचे बच्चू कडू सध्या सातबारा कोरा अशी पदयात्रा काढताहेत. ही यात्रा सध्या शेवटच्या टप्प्यात असून शेतकऱ्यांचा सातबारा भाजपच्या नावाने करायला हवा. मंत्री शिरसाट यांच्याकडे पैसे न सापडायला ते काही शेतकरी नाहीत,असं म्हणत बच्चू कडू यांनी मोदी,शिंदे गट यांच्यावरचौफेर टीका केली.
कर्जत ते मुरबाड महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली आहे.
पाच ते सहा किलोमीटरच्या रांगा
पर्यटक मुंबईच्या दिशाने जात असताना वाहतूक कोंडी
तसेच माथेरानून नेरळला पर्यटक जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगांचा रांगा
पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक माथेरान कर्जत येत असतात
अशाच वेळेला मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा राहिल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे
काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये भूमिपूजनावरून वाद...
भूमिपूजनासाठी आमदार अमित देशमुख.. भूमिपूजनाला विरोध भाजप शहराध्यक्ष अजित कवेकरांचा विरोध..
शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर काळं टाकलं आणि मला मारण्याचा प्रयत्न केला. सध्याच्या सत्ताकाळात पुरोगामी विचाराचे कार्यकर्ते असुरक्षित आहेत. कधी पक्ष फोडले जातात, कार्यकर्ते फोडले जातात. मग त्यांच्या मनासारखी गोष्ट करता आली नाही तर सत्य विचारसरणीने आम्ही कार्य करतो, आमचा विचार हा राज्य घटनेला अभिप्रेत असलेल्या समता, बंधुता आणि स्वातंत्र्यतेचा आहे. देशात मानवता प्रस्थापित व्हावी, यासाठी संभाजी ब्रिगेडचे काम सुरू आहे आणि ते सुरू राहणार आहे. पण काही सामाजिक संघटनेबद्दल गैरसमज पसरवले जातात. मग हिंदुत्वादी विचारसरणीच्या कार्यकर्त्याकडून माझ्यावर हल्ला करण्यात आला आहे. मी त्याचा निषेध करणार नाही. पण हे ज्यांनी पण घडवून आणले आहे, त्यांना निश्चितपणे सांगतो की ही शेवटाची सुरुवात आहे, एवढं मी निश्चितपणे सांगतो.
संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर शाही फेकल्याबद्दल, या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारचाही जाहीर निषेध. कारण महाराष्ट्र सरकारने जनसुरक्षा कायदा आणून महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, फुले,शाहू आंबेडकर यांच्या विचाराने आणि संविधान जनजागृती आणि लोकशाही वाचवण्यासाठी काम करणाऱ्या संघटनांवर निर्बंध लधण्यासाठी आणि त्यांच्या मान्यता रद्द करण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सरकारचे षडयंत्र आहे. त्या कायद्यामध्ये कडवे डावे असे म्हटले आहे. व कडवे डावे असे म्हटले असेल तर मग कडवे उजवे नाहीत का? या असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते शिवानंद भानुसे यांनी उपस्थित केला आहे...
चिखलदऱ्यात वनविभागाद्वारे पॅरोमोटरिंग सुरू; 3500 फूट उंचावरून सायकलिंग करण्याचा पर्यटक अनुभवत आहे थरात, विकेंड मुळे पर्यटकांची चिखलदऱ्यात तोबा गर्दी
पुण्यात लक्ष्मीबाई स्मृती पुरस्काराच आयोजन
अमृता फडणवीस यांच्या हस्ते देण्यात येणार लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार
समाजातील विवीध क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या महिलांचा अमृता फडणवीस यांच्या हस्ते होणार गौरव
शहापूर पोलिसांनी पहाटे चारच्या सुमारास धडक कारवाई करत तीन लाख दहा हजारांचा गांजा केला जप्त
धुळे येथून बाईकवर गांजा तस्करी करणारे दोन युवक शहापूर पोलिसांच्या ताब्यात गस्तीवर असलेल्या शहापूर पोलिसांना पहाटे चारच्या सुमारास आटगाव येथे दोन संशयित तरुण बाईक वरून जातांना आढळून आले
त्याची चौकशी केली असता त्यांच्याकडे गांजा आढळून आला
शहापूर पोलिसांनी केलेल्या या कारवाई एकूण १० किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याचे बाजार मूल्य तीन लाख इतके आहे
या सोबतच एक बाईक व ३ मोबाईल ही ताब्यात घेण्यात आली असून त्याचे एकत्रित मूल्य एक लाख दहा हजार इतके असून एकूण चार लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त करत दोन आरोपींना ताब्यात घेतले असल्याची माहिती शहापूर पोलिस निरीक्षक मुकेश ढगे यांनी दिली
पुढील तपास शहापूर पोलीस करत आहेत
अमृता फडणवीस यांच्या हस्ते देण्यात येणार लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार
समाजातील विवीध क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या महिलांचा अमृता फडणवीस यांच्या हस्ते होणार गौरव
शासनाने अशा प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई करावी अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाईलने आम्ही भ्याड हल्याचं उत्तर देऊ
संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अतुल गायकवाड यांची मागणी
संभाजी ब्रिगेड सारख्या पुरोगामी संघटना संपवण्याचे सरकारचा हा कूटील डाव आहे
छञपती संभाजी महाराज यांचा खरा आणि ज्वलंत इतिहास जगासमोर आणण्याचं काम संभाजी ब्रिगेडने केल
मनोवृत्ती प्रवृत्तीच्या लोकांना केवळ वाद निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे
जुलै महिना अर्धा संपत आला तरी देखील अद्यापही भात लावणीच माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साक्री तालुक्यामध्ये अद्यापही भात लावणीला सुरुवात करण्यात आलेली नाहीये, जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नसल्यामुळे भात लावणी लांबणीवर पडली आहे,
दरवर्षी जुलै महिन्याच्या सुरुवातीला भात लावणीला सुरुवात केली जाते, परंतु यंदा मात्र जुलै महिना अर्धा संपत आला तरी देखील समाधानकारक पाऊस झाला नसल्यामुळे भात लावनीसाठी आवश्यक इतका पाऊस अद्यापही झालेला नाही, आणि त्यामुळे साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यामध्ये भात लावणीला सुरुवात करण्यात आलेली नाही, त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांच्या अद्यापही आभाळाकडेच नजरा लागून असल्याचे दिसून येत आहे.
डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह हे नांदेड शहरातील महापालिकेचे एकमेव सांस्कृतिक सभागृह आहे.या प्रेक्षागृहाची दयनीय अवस्था झाली होती.महापालिकेने या प्रेक्षागृहाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले होते. अखेर हे काम पूर्ण झाल्याने आज या प्रेक्षागृहाचा लोकार्पण सोहळा पार पडला. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते या प्रेक्षागृहाच्या नूतनीकरणाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नांदेडकरांची उपस्थिती होती.
- प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले असताना घडली घटना
- शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्तांनी काळं फसल्याची माहिती
- प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने शिवधर्म फाउंडेशन आक्रमक होते
- त्याचबरोबर स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान केल्याचा देखील राग पदाधिकाऱ्यांच्या मनात होता
- यापूर्वी शिवधर्म फाउंडेशन ने संभाजी ब्रिगेडच्या विरोधात उपोषण देखील केले होते
- दरम्यान आज अक्कलकोट मध्ये प्रवीण गायकवाड यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता त्यावेळी त्यांना काळं फासण्यात आलं
खासदार बजरंग सोनवणे यांच्या समर्थकांनी चक्क हॉटेलमध्ये बंदुकीसोबत फोटोसेशन केलं आणि ते फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसवर टाकून मिरवले.
मात्र, हे ‘शो ऑफ’ चांगलंच अंगलट आलं.
या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळताच तात्काळ कारवाई करत चार जणांविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गणेश मुंडे, रामदास मुंडे, पांडुरंग मुंडे, रामचंद्र ओमासे असे या आरोपीचे नावं आहेत.
याप्रकरणी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज, फोटो, आणि मोबाईल डिटेल्सच्या आधारे तपास सुरू आहे.
चारही आरोपींवर याआधी देखील सावकारी, जीवे मारण्याचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे आहेत. या चारही आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.
राजेंद्र विठ्ठल शिंदे आणि कल्पेश सिंग अशी रक्त चंदनाची तस्करी करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीची नाव आहेत.
2 मार्च 2025 ला मालमत्ता विरोधी गुन्हे विभागाचे पोलीस पेट्रोलिंग करत असताना त्यांना पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर अवैधरीत्या रक्तचंदनाची वाहतूक करणारा एक कंटेनर आढळून आला होता.
या प्रकरणात करण्यात आलेल्या तपासात मालमत्ता विरोधी गुन्हे पोलिसांनी आतापर्यंत एकूण सहा आरोपींना बेड्या ठकल्या होत्या.
मात्र या प्रकरणातील मुख्य सूत्रधार राजेंद्र विठ्ठल शिंदे आणि कल्पेश सिंग हे पोलिसांना गुंगारा देत जवळपास चार महिन्यापासून फरार होते.
मात्र पोलिसांनी मुंबई परिसरातून या दोन्ही आरोपींना आता बेड्या ठोकल्या आहेत.
नांदेडमधील मुखेड उपजिल्हा रुग्णालयात 108 रुग्णवाहिकेच्या सेवेची दिरंगाई चव्हाट्यावर आली आहे.
भेंडेगाव येथील एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी रुग्णवाहिका न मिळाल्याने नातेवाईकांना खासगी वाहनाने रुग्णालया गाठावे लागले आहे.
रुग्णवाहिकेसाठी दोन तास वाट पाहूनही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही, असा आरोप रुग्णाचे नातेवाईक मनोज पांचाळ यांनी केला आहे.
सुदैवाने, या घटनेत आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत. मात्र यामुळे 108 रुग्णवाहिकेच्या कामगिरीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
महाराष्ट्र मध्य प्रदेश सह गुजरात राज्यातील पर्यटक मोठ्या संख्येने तोरणमाळ ला दाखल...
तोरणमाळचा प्रसिद्ध सीताखाई पॉईंटवर सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी पर्यटकांची गर्दी....
राज्यातील दुसरा क्रमांकाचा थंड हवेचे ठिकाण असल्या तोरणमाळला नैसर्गिक सौंदर्याची पर्यटकांना भुरळ....
सीताफाई पॉईंट यशवंत तलाव गोरक्षनाथ गुफा तोरणमाळ आकर्षण....
पुणे, मुंबई सह राज्यातील एकूण 22000 बार उद्या बंद
पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलइयर असोसिएशन यांनी दिली माहिती
दारूवरील वॅट रद्द करा, 60 टक्के उत्पादन शुल्क वाढ सुसह्य स्तरावर आणा या प्रमुख मागण्या
दारुवरील व्हॅट ५ टक्क्यावरून वरून १० टक्के पर्यंत दुप्पट करण्यात आला, परवाना शुल्कात 15 टक्के वाढ, देशी विदेशी दारू वर उत्पादन शुल्कात 60 टक्के वाढ करण्यात आली
या निर्णयामुळे महाराष्ट्रातील 19,000 व पुण्यामधील 4200 कायदेशीर परवाना कक्षेतील बार्स आणि लाउंज बार्स प्रभावित झाल्याचा आरोप
राज्य सरकारची लाडका भाऊ योजना फेल.....
मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थी आपल्या विविध मागण्यासाठी आक्रमक....
तुकाराम बाबा महाराज यांचा नेतृत्वाने 50 हजाराहून अधिक प्रशिक्षणातील छत्री आंदोलनाला होणारा सहभागी...
बेरोजगार तरुणांच्या हातांना काम द्या या मागणीसाठी मोर्चाची तयारी...
पर्यटकांचे आकर्षण असलेल्या लोणावळ्यातील भुशी डॅम वर पर्यटकांची मोठी गर्दी झालेली आहे.
रविवारची सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आणि वर्षाविहार व निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक लोणावळ्यात दाखल झालेले आहेत.
त्यामुळे भुशी डॅम वर पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे..
दरम्यान मोठ्या प्रमाणात पर्यटक लोणावळ्यत दाखल झाल्यामुळे वाहनांची मोठी गर्दी झालेली आहे.
धाराशिवच्या परंडा तालुक्यातील दूध व्यवसायिकाच्या चार चाकी गाडीची काच फोडून गाडीत ठेवलेले 1 लाख 30 हजार रुपये घेऊन चोरट्यानी पळ काढलाय.तब्बल बारा किलोमीटरचा पाठलाग करत गाडीवर लक्ष ठेवून चिंचपुर येथील क्षत्रगुण रामा गरड या दूध व्यावसायिकाने शेतकऱ्यांच्या पगारी करण्यासाठी बँकेतून काढलेली रोकड चोरट्याने पळविल्याचे घटना सीसीटीव्ही कॅमेरात ही कैद झाली आहे.दिवसा ढवळ्या दूध व्यवसायिकाच्या पैशावर चोरट्याने मारलेल्या डल्ल्यामुळे परंडा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांमधून प्रश्नचिन्ह उपस्थित केल जात आहे.याबाबत अंभी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असुन पोलिस तपास करत आहेत.
ऐतिहासिक वारसा असलेल्या दापोलीतल्या हर्णे येथील सुवर्णदुर्ग किल्ल्याची नोंद युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये झाल्यामुळे शिवप्रेमी, दुर्गप्रेमी आणि स्थानिकांमधून आनंद व्यक्त केला जातोय. संपूर्ण दापोली तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरलं आहे. 'छत्रपती शिवाजी महाराज की जय'च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. मोठ्या संख्येने नागरीकही यावेळी उपस्थित होते..समुद्रात असलेला सुवर्णदुर्ग किल्ला आता जागतिक पर्यटनाच्या नकाशावर अधोरेखित होणार आहे, यामुळे दापोलीतील पर्यटनावर आणखी मोठा सकारात्मक परिणाम भविष्यकाळात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विधानभवनाच्या आवारातील कॅन्टिनच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करून कसलाही पश्चाताप न झालेले आमदार संजय गायकवाड यांचा सोलापुरातील उद्धव सेनेच्या वतीने 'कॅन्टिन केसरी' किताब देऊन उपरोधिक सत्कार करून आंदोलन करण्यात आले.
सोलापुरातील चार हुतात्मा चौकात हे आंदोलन करण्यात आले.यावेळी शिवसैनिकांनी संजय गायकवाड यांच विडंबन असलेले पोस्टर फडकाविले. विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात जेव्हा अळ्या किडे निघतात त्यावेळी संजय गायकवाड यांना का राग येत नाही किंवा ते संबंधित मंत्र्याला का मारत नाहीत असा प्रश्न शिवसैनिकांनी विचारला. याप्रसंगी शिवसैनिकांनी संजय गायकवाड यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
एसटी महामंडळाला पांडुरंग पावला..
अमरावती विभागाला 1कोटी 64 लाखांचे उत्पन्न
अमरावती विभागातून 175 बसेस द्वारे 517 फेऱ्या सुखरूप पूर्ण
3 ते 13 जुलै दरम्यान पंढरपूर साठी विशेष बसची करण्यात आली व्यवस्था..
या दरम्यान हजारो एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली..
भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील भरड, थुवाणी आणि अठ्ठी ही तीन गावे आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. रस्ते, वीज, पाणी आणि शिक्षणाच्या अभावामुळे येथील सुमारे 300 ते 400 ग्रामस्थांना प्रचंड हालअपेष्टांना सामोरे जावे लागत आहे.
या गावांमध्ये पक्के रस्ते नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज 15 किलोमीटरची पायपीट करावी लागते. पिण्याच्या पाण्याची सोय नाही आणि एकही हँडपंप उपलब्ध नाही. धक्कादायक बाब म्हणजे, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातही या गावांमध्ये वीज पोहोचलेली नाही. अंगणवाडी एका तात्पुरत्या कुडाच्या घरात भरते.
धामणगाव गढी येथील चेक पोस्टवर वाहतुकीचे नियोजन नसल्याने वाहतूक कोंडी...
दर शनिवारी आणि रविवारी होत आहे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी..
रविवार असल्याने पर्यटकांची चिखलदऱ्याला जाण्यासाठी मोठी गर्दी
मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या सभोवताली दुरुस्तीचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे. दुरुस्ती होईपर्यंत राजकोट किल्ल्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरीही शिवपुतळा पाहण्यासाठी त्याठिकाणी पर्यटक गर्दी करू लागले आहेत. शिवपुतळ्यासोबत फोटो काढण्याबरोबरच अजूबाजूच्या निसर्गरम्य परिसराचा पर्यटक आनंद घेत आहेत. पावसाळा असला तरी तसेच किल्ला बंद करण्यात आल्यावरही पर्यटकांची राजकोट येथे गर्दी होत आहे.
मावळ तालुक्यात महिनाभर पावसाची संततधार सुरू आहे. अनेक भाताच्या शेतात पाणी साचल्याने भात शेती करण्यास अवघड झाले आहे. त्यातच मजुरांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. यावर शेतकऱ्यांनी एक शक्कल लढवली आहे. आज तुझ्या शेतात भात लागवड करू उद्या माझ्या शेतात सर्व मिळून भात लागवड करू. अशी एक शक्कल लढवल्याने दोन्ही शेतकऱ्यांचे काम पण होते आणि मजुरांची कमतरता आहे. त्यावरही एक उपायही मिळाला आहे. मावळच्या अनेक शेतकऱ्यांनी एकमेकांच्या साह्याने भाताची शेती लागवड करायला सुरुवातही केलेली आहे
पुणे महानगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर बैठक
पुणे शहराचे अध्यक्ष पदाधिकारी बैठकीला उपस्थितीत
बैठकीला शहराध्यक्ष सुनील टिंगरे सुभाष जगताप महिला आयोग,अध्यक्ष रूपाली चाकणकर,प्रवक्त्या रुपाली पाटील,माजी नगरसेवक पदाधिकारी उपस्थितीत
बैठकीला डिझाइन बॉक्स कंपनीचे सी इ ओ नरेश अरोरा उपस्थितीत
पुण्यात बारामती हॉस्टेल येथे होणार बैठक
काही वेळात अजित पवार पोहचतील
धाराशिव जिल्ह्यातील कसबे तडवळे येथील शिष्यवृत्ती पॅटर्नचा जिल्ह्यात पुन्हा एखदा डंका वाजला असुन गावातील 37 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले आहेत इयत्ता आठवी व पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला यामध्ये आदर्श कन्या शाळेतील 22 मुली,जिल्हा परिषद आदर्श केंद्रीय प्राथमीक शाळेतील ९ मुले आणि व जय हिंद विद्यालय येथील ६ विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत.तर कन्या शाळेतील जान्हवी संतोष जाधव २७८ गुण घेवुन राज्य गुणवत्ता यादीत झळकली आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
लातूरच्या शिरूर अनंतपाळ तालुक्यात कवळ्या सोयाबीन पिकांवर हरिण आणि वन्य प्राण्यांचा हैदोस पाहायला मिळतोय. तालुक्यातल्या शेकडे हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पीक हरिणांनी फस्त केल आहे. हरिणांची कळप दिवसेंदिवस वाढत चालली आहे.. त्यामुळे या हरीण आणि जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
लातूरच्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सुमठाणा गावात घरगुती शेतीच्या वादावरून एका वृद्ध महिलेला सुनेकडूनच मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओत त्या वृद्ध महिलेचे केस ओढत,तिला फरफटकांना, आणि लाथा बुक्क्यांनी मारताना दिसत आहे.. . दरम्यान या प्रकरणी अद्याप कुठलाही गुन्हा दाखल नाही.
सासवड मध्ये कार्यकर्त्यांच्या भावना घेणार जाणून
१६ जुलैला संजय जगताप भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा
तसे संजय जगताप यांनी काँग्रेसच्या सदस्यवाचा राजीनामा दिल्याची माहिती
कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे हे काय बोलून गेले...
लाडकी बहीण सत्ताधाऱ्यांना नकोशी झाली काय?
लाडक्या बहिणींमुळे विकास निधी येण्यास विलंब होतोय कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांचे इंदापुरात विधान...
घरकुलाचा धनादेश वाटपात कार्यक्रमात केले विधान..
याही अगोदर मंत्री दत्तात्रय भरणे यांनी लाडक्या बहिणींमुळे विकास निधी येण्यास विलंब होत असल्याचे केले होते विधान...
कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांना लाडक्या बहिणी नकोशी झाल्यात काय असाच प्रश्न आता समोर आलाय...
सत्तेमधीलच मंत्री जर लाडक्या बहिणीबद्दल असे विधान करत असतील तर लाडकी बहीण ही योजना लवकरच गुंडाळतील की काय असाच प्रश्न आता महाराष्ट्रातील महिलांना पडला आहे...
मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अशा विधानामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना समज देतील का
अमरावती जिल्ह्यातील ग्रामिंन भागात ठिकाणी विद्युत डीपी बॉक्सचे दरवाजे उघडे असल्याने तसेच, दरवाजे नसल्याने ते धोकादायक ठरत आहेत. अशा परिस्थितीत अपघात झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
अचलपूर तालुक्यातील शिदी, पोही, कुष्ठा, काकडा, पथ्रोटातील अनेक परिसरात अशा अनेक उघड्या डीपी आहेत. याबाबत परिसरातील नागरिकांनी महावितरणला अनेकवेळा तक्रारी केल्या आहेत; परंतु याकडे महावितरण कानाडोळा करीत असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नांदुरा शहरातील मोबीनपुरा भागातील शेख मोबिन शेख हनीफ हा व्यक्ती अवैधरित्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कॉम्प्रेसर मशिनचे साह्याने घरगुती व् कमर्शियल गॅस सिलेंडर मधील गॅस ऑटो रिक्षा मधील टाकीमध्ये भरताना नांदुरा पोलिसांनी त्यास अटक केली आहे.... आरोपीच्या ताब्यातून एकूण इंडेन कंपनीचे 24 गॅस सिलेंडर , ऑटो रिक्षा, कॉम्प्रेसर मशीन व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे..... दरम्यान याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी आरोपी विरुद्ध अपराध क्र. 2025 कलम 287 BNS प्रमाणे कारवाई करून त्यास अटक केली आहे...
छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले हे जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित झाले.या 12 किल्ल्यांमध्ये साताऱ्यातील प्रतापगड किल्ल्याचा देखील समावेश आहे.
यामुळे प्रतापगड किल्ल्यावर आनंदाचे वातावरण आहे.पुरातत्त्व विभागाने प्रतापगडावरील नागरिकांना घेऊन गडावर प्रतापगड जागतिक वारसास्थळ अशा फलकाचे अनावरण केलं.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.राज्यातील या सर्व किल्ल्यांमधील प्रतापगड किल्ला हा राबता आहे या ठिकाणी शिवप्रतापदिन,मशाल महोत्सव असे अनेक कार्यक्रम घेतले जातात
त्यामुळे प्रतापगड किल्ल्याचा जागतिक वारसास्थळ जाहीर झाल्याचा अभिमान वाटत असल्याचे ग्रामस्थानी सांगितलं आहे.
पुणे पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने छापेमारी करत जप्त केला ८ लाख रुपयांचा अमली पदार्थ
अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत पुण्यात गांजा तस्करी करणाऱ्या ४ आरोपींना ठोकल्या बेड्या
राजस्थान राज्यातून अमली पदार्थाची तस्करी करत पुण्यात आरोपी करत होते विक्री
राकेश अर्जुनदास रामावत, ताराचंद सिताराम जहांगीर, मुसीम सलीम शेख, महेश नारायण कळसे असं अटक केलेल्या आरोपींची नावे
पुण्यातील हडपसर आणि खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अमली पदार्थाची विक्री
विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात पीएमपी कारवाई तीव्र केली आहे.
गेल्या दोन महिन्यांत विनातिकीट प्रवास करणाऱ्या २ हजार ५८७ फुकट्या प्रवाशांवर तर १ हजार ४०० कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून,२१ लाख ३३ हजार रुपयांचा दंड केला आहे.
तपासणी पथकाने मे आणि जून महिन्यात २ हजार ५८७ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करून १२ लाख ८९ हजार रुपयांचा दंड आकारला आहे, तर गैरवर्तणूक आणि कर्तव्यात कसूर केल्याबद्दल १ हजार ४५३ वाहक आणि चालकांवर कारवाई करून आठ लाख ४४ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे
कल्याण आहिल्यानगर महामार्गावर माळशेज घाटातील दरीच्या बाजूला असलेली संरक्षक भिंत आणि कठडे धुक्यामुळे दिसेनासे होत असल्याने अनेकदा वाहनचालकांना केवळ अंदाजावर गाडी चालविण्याची कसरत करावी लागतेय अशा स्थितीत अपघाताची शक्यता वाढतेय आणि नागरिकांचा जीव धोक्यात येतोय. त्यामुळे घाटातील संरक्षक भिंतींवर रिफ्लेक्टर लावावेत, अशी मागणी प्रवासी करत आहेत. यासोबतच, घाटातील रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे प्रवाशांसाठी अजूनच त्रासदायक ठरत असून प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
भाविकांची संख्या रोडावल्याच्या पाश्र्वभूमीवर रवीवार आज पासुन रवीवार,मंगळवार व शुक्रवार व पोर्णिमेला तुळजाभवानी मंदीर पहाटे एक ऐवजी चार वाजता उघडणार असल्याची माहिती तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.तुळजाभवानी मंदीरातील भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेवुन मंदीर संस्थानने मंगळवार,शुक्रवार व रवीवार व पोर्णिमेला मंदीर 1 वाजता उघडण्याचा निर्णय यापुर्वी घेतला होता.माञ मागील काही दिवसात लग्नसराई संपल्याने तसेच शाळा महाविद्यालये चालु झाल्यानंतर भाविकांची संख्या कमी झाली आहे.त्यामूळे मंदीर पहाटे एक ऐवजी 4 वाजता घडण्याचा निर्णय संस्थानच्या वतीने घेण्यात आला आहे.
यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी महसूल अधिकाऱ्यांची बैठक घेतली राजस्व अभियान, फेरफार प्रलंबित आधी मुद्द्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांची चांगली झाडाझडती घेतली तसेच दिग्रस आणि उमरखेड येथील मंडळ अधिकाऱ्याला बैठकीतून बाहेर काढत निलंबनाचे आदेश दिले कामात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शोकाॅज बजावा असे निर्देश एचडीपीओंना दिले त्यामुळे महसूल वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे...
जयंत पाटील राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नसताना अनेक वेळा त्यांच्या मतदारसंघातील विविध विकासकामांच्या उद्घाटनाला देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती असायची...
मात्र ते प्रदेशाध्यक्ष झाल्यावर ते थांबले... जयंत पाटील हे राजकीय दृष्ट्या राष्ट्रवादीत अस्वस्थ आहेत असं बोललं जायचं...
अस्वस्थपणामुळे त्यांनी राजीनामा दिला असावा...
ते वेगळ्या पक्षात जातील अशीही चर्चा सुरू असल्याबाबत संग्राम जगताप यांना विचारले असता ते जर राष्ट्रवादी अजित पवार गटात आले तर आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांचे स्वागतच करतील असं आमदार जगताप यांनी म्हंटले आहे.
तिरुवल्लूर स्थानकावर डिझेल भरलेल्या मालगाडीच्या टँकरला अचानक भीषण आग लागल्याने खळबळ उडाली.
आग लागल्यानंतर परिसरातील रहिवाशांना तातडीने हलवले गेले असून, आगीमागचं कारण अद्याप स्पष्ट नाही.
जुलैचे जवळ जवळ वीस दिवस बाकी असताना पुणेकरांच्या वर्षाच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
मे पासून पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा २१ टीएमसी (७० टक्के) वर गेला आहे. त्यामुळे जुलै महिन्यात प्रथमच पुणेकरांची पाणी चिंता मिटली आहे.
मागील वर्षी याच दिवशी हा पाणीसाठा ८.३५ टीएमसी होता.यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत तब्बल तीन पट अधिक पाणीसाठा आहे.
विशेष म्हणजे आतापर्यंत खडकवासला धरणातून मुठा नदीत ५ टीएमसी पाणी सोडले आहे.
खडकवासला १.१५ टीएमसी
पानशेत ७.५७ टीएमसी
वरसगाव ९.८३ टीएमसी
टेमघर २.४६ टीएमसी
रुग्णालयाला जाण्यापूर्वीच रस्त्यातच आईने दिला मुलाला जन्म.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील मेथी गावातील घटना.
आई आश्विन नालापले व नवजात बालक सुखरूप.
108 वर फोन करूनही रुग्णवाहिका वेळेवर पोहोचली नसल्याची नातेवाईकाचा आरोप
आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाची सत्ता कोणत्याही परिस्थितीत आली पाहिजे यासाठी ग्रामीण भागासह शहरी भागातील सर्व शिवसैनिकांनी आप आपल्या स्तरावर संवाद यात्रा सुरू करा असे आवाहन खासदार अरविंद सावंत यांनी केले. यवतमाळ येथील उत्सव मंगल कार्यालयात शिवसेना ठाकरे गटाचा पदाधिकारी मेळावा पार पडला यामध्ये सावंत बोलत होते.
पहाटे सहा पासून अजित पवार आयटी पार्क हिंजवडीत विविध समस्या सोडवण्यासाठी दौऱ्यावर आहेत, रस्त्या आणि वाहतूक कोंडी समस्येसाठी थेट आता अजित पवारच रस्त्यावर उतरले आहेत, सरकारी रस्ता अडवणाऱ्या व्यक्तींवर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी 353 कलमानुसार गुन्हे दाखल करा, त्यांना उचला, असा स्पष्ट आदेश पीएमआरडी आणि संबंधित प्रशासनाला..., अजित पवारांनी दिलाय, रस्त्याला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मोबदला देऊ, असं अजित पवारांनी सांगितलंय...
माजीमंत्री आणि प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू सध्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी यामागणीसाठी देशाचे पहिले कृषीमंत्री डाॅक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जन्मभूमी ते देशातील पहिली शेतकरी आत्महत्या झालेल्या यवतमाळच्या चिलगव्हाण अशी कडू सातबारा कोरा पदयात्रा काढताहेत.
सध्या कडू हे महागांव तालुक्यातील काळीदौलत इथे दाखल झाले असून उद्या या यात्रेची सांगता होणार आहे.
यानिमित्त शिवसेना ठाकरे गटाचे भास्कर जाधव राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील हे येणार असल्याची माहिती बच्चू कडूंनी दिलीये.
दरम्यान बच्चू कडू यांना शेतकरी आणि शेतमजुरांनी दिलेलं अनोखं स्वागत पाहून स्वतः बच्चू कडूही क्षणभर भावुक झाले होते.
उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरात एका रिक्षा चालकावर मिरची स्प्रे फवारून जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
गणेश सकपाळ असे जखमी चालकाचे नाव असून ते कॅम्प ४ मधील मराठा विभागात राहतात.
सोमवारी पहाटे ते स्थानकाजवळ रिक्षा रांगेत थांबले असताना अचानक डोळ्यांत मिरची स्प्रे जाण्यामुळे त्यांनी जवळच्या इडली विक्रेत्याकडे चौकशी केली.
तेव्हा हृदय करमचंदानी नावाचा तरुण पुढे येत "मिरची स्प्रे मीच मारला" असे म्हणत वाद घालू लागला. काही क्षणातच त्याने सकपाळ यांच्या डोळ्यांत मिरची फवारली आणि हातातील स्टील कड्याने डोक्यावर व तोंडावर जोरदार मारहाण केली.
अंबरनाथ पूर्वेतील शिवगंगा नगरमधील जय शिवश्रद्धा इमारतीत शनिवारी रात्री हेल्मेट घालून आलेल्या दरोडेखोराने वृद्ध दांपत्याच्या घरात दरोडा टाकला.
आरोपीने घरात शिरताच वृद्धाच्या डोक्यात हातोडीने तीन वेळा प्रहार केला, तर मदतीस आलेल्या शेजारील महिलेच्या डोक्यात बाटली फोडून दोघांनाही गंभीर जखमी केलं.
त्यानंतर घरातील सोनंनाणं लुटून आरोपी पसार झाला.
जखमी वृद्ध गणेश गायकवाड यास उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून,याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून डीसीपी सचिन गोरे, एसीपी शैलेश काळे यांनी घटनास्थळी भेट दिली.
क्राईम ब्रँचकडूनही समांतर तपास सुरू असल्याची माहिती डीसीपी गोरे यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.