बीड पासून जवळच असलेल्या पालवन गावातील शिवारात सयाजी शिंदे यांनी उभे केलेल्या देवराईला अचानक आग लागली आहे यामध्ये शेकडो झाडे जळून खाक झाले आहेत आग विझवण्याचे काम चालू आहे वाळलेले गवत असल्यामुळे आगीचा भडका चालूच आहे वन विभागाचे अधिकारी आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी सर्व भाजप आमदार उद्या मुंबईत
जागा वाटपाची अंतिम बैठक मुंबईत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विधानसभा मतदारसंघ निहाय बैठक होणार
प्रत्येक आमदार त्यांच्या विधानसभा मतदारसंघ निहाय प्रभागातील जागांवर मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून जागांचा आढावा सादर करणार
संभाजीनगर महापालिका निवडणूक लढवण्यासाठी ८ उमेदवारांची घोषणा
जालना महापालिकेसाठी १ तर नाशिक महापालिका निवडणूक लढवण्यासाठी ३ उमेदवारांची घोषणा
अंकली ते चोकाक दरम्यान भूसंपादन होणाऱ्या जमिनीसाठी मिळणार चौपट मोबदला
आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेताच निघाला जीआर
या अनेक वर्षापासून मोबदल्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी थांबवलं होतं महामार्गाचे काम
यवतमाळ च्या शेंदूरसणीत आढळलेल्या जन्म मृत अवैध नोंदी साठी राज्य सरकार च्या गृह विभागाने नेमली चौकशी समिती.
सायबर अतिरिक्त पोलीस महासंचालक यशस्वी यादव,यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य उपसंचालक बबिता कमलापूरकर जिल्हा आरोग्य अधिकारी सुभाष ढोले यांची समिती.
दीड हजार लोकवस्तीच्या गावात 28 हजार पेक्षा जास्त नोंदी आढळल्याने उडाली होती खळबळ
काँग्रेसची उद्या पार्लमेंट्री बोर्डची बैठक असणार
राज्यातले प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले असे दिग्गज नेते या बैठकीमध्ये उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्राने दिली आहे.
नागपूर रत्नागिरी महामार्गासाठी अंकली ते चोकाक भूसंपादनाचा मार्ग मोकळा
अंकली ते चोकाक दरम्यान भूसंपादन होणाऱ्या जमिनीसाठी मिळणार चौपट मोबदला
आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेताच निघाला जीआर
या अनेक वर्षापासून मोबदल्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी थांबवलं होतं महामार्गाचे काम
प्रशांत जगताप यांचा राजीनामा जवळपास निश्चित असल्याचं बोललं जात आहे.
सुप्रिया सुळे यांच्याशी केलेली चर्चा ठरली निष्फळ?
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा जगताप राजीनामा देण्याच्या तयारीत
सुप्रिया सुळे या पक्ष कार्यालयात असल्यामुळे प्रशांत जगताप यांनी तिथे जाणं टाळलं
छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणूक लढण्यासाठी दोन दिवसात तीन हजार एकशे सत्तर उमेदवारी अर्ज वितरित; आज दिवसभर १३५४ अर्ज उमेदवारांनी खरेदी केले; काल पहिल्याच दिवशी १८१६ अर्ज उमेदवारांनी खरेदी केले होते; शहरातील २१,२२ आणि २७ प्रभागात सर्वाधिक अर्ज खरेदी केले
कोल्हापुरातील महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात झालेल्या जागा वाटपा संदर्भात महत्त्वाचे पत्रकार परिषद होत आहे. काँग्रेस आमदार सतेज पाटील शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवाडकर यांच्यासह अन्य नेते या पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत... या पत्रकार परिषदेचा लाईव्ह आउटपुट देऊन ठेवतो... साडेपाच वाजता ही पत्रकार परिषद सुरू होईल
भाजपच्या आमदारांची बैठक सुरू झाली आहे.
जागा वाटपा संदर्भात बैठक हॉटेल रामी ग्रँड या ठिकाणी.
विधानसभा निहाय बैठका सुरू खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर बैठकीतून बाहेर पडले
काही जागांवरती निर्णय बाकी तर काही जागा फायनल झाल्या
भाजपमध्ये अनेक मतदारसंघात काही खुशी कभी गम होण्याची शक्यता ?
शरद पवार जे ठरवतील ते आम्हाला मान्य असेल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. ते पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
जळगाव राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष यांच्यात युतीची अधिकृत घोषणा होताच, त्याचे पडसाद जळगावच्या राजकारणात उमटले आहेत.
राजकीय वर्तुळातील मोठी बातमी
काँग्रेस आणि वंचितची आघाडी होणार नाही
वंचितकडून मोठी घोषणा
'पहले आप, पहले आप'वरून थांबली वंचित आणि काँग्रेसमधील आघाडी
काँग्रेसकडून आघाडीचा प्रस्ताव नाही
तर वंचितकडून आम्हाला प्रस्ताव नसल्याची काँग्रेसची भूमिका.
अकोला महापालिकेत वंचित लढणार स्वबळावर
5 नगरसेवक पदाचे उमेदवार केले जाहीर
आशिष शेलार -
भीतीपोटी ठाकरेसेना- मनसे एकत्र
घाबरलेल्या मनस्थितीत दोघे एकत्र आले
ठाकरे बंधू एकत्र येणे हा माहयुतीसाठी दिलासा
भाजप नेते आशिष शेलार यांनी मनसे-शिवसेना युतीवरून टीका केली
ठाकरे बंधूंना आमचे काही प्रश्न आहेत
दोन पक्ष आधी वेगळे का झाले होते?
४ कारकून आणि बडवे कोण?
स्वत:च्या फायद्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र आले
राष्ट्रीय समज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची घेणार भेट
थोड्याच वेळात टिळक भवन येथे दोन्ही नेत्यांची होणार भेट
महानगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीतील आघाडीबाबत होणार चर्चा
नाशिक -
नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला
नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं जागावाटप देखील झाल्याची दोन्ही पक्षांच्या नेत्यांची माहिती
उद्या परवापर्यंत जागावाटप जाहीर करणार, मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची माहिती
सोलापूर -
- राज–उद्धव युतीनंतर सोलापुरात शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचा जल्लोष
- सोन्या मारुती मंदिर परिसरात संयुक्त आनंदोत्सव
- शिवसैनिक–मनसैनिकांची जोरदार घोषणाबाजी
- “मुंबई आमच्या हक्काची… नाही कोणाच्या बापाची” नारे
- ढोल-ताशे, फटाके व जल्लोषात परिसर दणाणला
- राज–उद्धव एकत्र म्हणजे मराठी अस्मितेला नवी ऊर्जा
- महाराष्ट्रातील मराठी माणसाची मान-शान उंचावल्याची भावना..
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत युतीची घोषणा केल्यावर राज्यभरातील दोनही ठाकरे बंधूंच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला... नवी मुंबईत देखील मनसे आणि शिवसेना उबाठा गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नेरुळ येथे जल्लोष साजरा करत एकमेकांना लाडू, पेढे भरवत तोंड गोड केलंय.... नेरुळ मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन करत चौकात जल्लोष साजरा केलाय.... नवी मुंबईत दोन्ही पक्ष एकत्रित लढणार असल्याने फायदा होणार असल्याचा दोन्ही पक्षातील नेत्यांना विश्वास यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय... तर ठाकरे बंधू एकत्र आल्याने राज्याच्या राजकारणातील ताकद वाढली असून सत्ताधाऱ्यांना त्यांची जगा या निवडणुकीत दाखवून देऊ अश्या प्रतिक्रिया यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्यात...
मनसे शिवसेना उबाठा युती, कात्रज चौकात वसंत मोरेंचा जल्लोष..
फटाके फोडत आणि लाडू-पेढे वाटून केला आनंदोत्सव साजरा...
मनसेबरोबरच्या शिवसेना उबाठा गटाच्या जल्लोषामध्ये जाणे टाळले...
सिग्नल वर उभा असणाऱ्या वाहन चालकांना लाडू पेढे भरवत आनंदोत्सव साजरा...
नाशिकच्या मालेगाव महापालिकेचा निवडणूक कार्यक्रम व प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या जाहीर झाल्याने इच्छुकांकडून याद्यांची खरेदी केली जात आहे. राज्य निवडणूक आयोगाने यंदा याद्यांची प्रती पृष्ठ दोन रुपये दराने विक्रीचे आदेश दिले होते.गत पंचवार्षिकला हा दर प्रती पृष्ठ पाच रुपये होता. २९ प्रभागांच्या याद्या खरेदीसाठी तब्बल ८३,३०० रुपये मोजावे लागत आहे. दोन दिवसात ४० याद्यांची विक्री झाली आहे.प्रत्येक उमेदवारास दहा याद्यांची गरज भासते. त्या खरेदीसाठी किमान ४० ते ५० हजाराचा खर्च अपेक्षित आहे. हा खर्च उमेदवाराच्या निवडणूक खर्चात समाविष्ट होत नाही. उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच निवडणूक खर्च सुरू होतो. एका प्रभागातून चार उमेदवार निवडून जाणार आहेत. पॅनलमधील उमेदवारांमध्ये याद्यांचा खर्च विभागाला जावू शकतो. मात्र, अपक्ष उमेदवारांना हा खर्च पेलावाच लागणार आहे.
घेरलं होतं मातोश्रीवरील "विठ्ठलाला" बडव्यांनी..
तुमच्या मते, पक्षाचा ताबा घेतला होता चार कारकुनांनी...
एवढ्या मोठ्या संघटनेला संपवण्यात तुम्हाला व्हायचे नव्हते "भागीदार"
सगळ्या पदांचे राजीनामे देत भाषण केले होते खुमासदार !
आज तेच बडवे आणि तेच कारकून चालणार का?
त्यांच्यासोबत बेमालूमपणे भागीदार होणार का?
"लाव रे तो व्हिडीओ" असे आता मुंबईकर म्हणतील
तुमची जुनी भाषणे काढून आरसा समोर धरतील!
तुमचा चेहरा बघून तुम्हाला भीती नाही ना वाटणार?
एकत्र येऊन पालिकेची तिजोरी नाही ना लुटणार?
मुंबईकर गल्लोगल्लीत तुम्हाला विचारणार...
"नेमके कशासाठी झाला होतात त्यावेळी वेगळे?"
"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"
ठाकरे बंधूंची युती होतेच ठाण्यात मनसे व शिवसेना ठाकरे पक्षाचा एकत्र जल्लोष..
मनसेच्या मध्यवर्ती शाखेत दोन्ही पक्षांकडून साजरा करण्यात येतो जल्लोष..
ढोल ताशा वाजवत पेढे भरवत फटाके फोडून करण्यात येतोय जल्लोष..
मुंबई, नाशिकमध्ये युती झाली आहे. इतर महापालिकेत चर्चा सुरू आहे. उद्यापर्यंत त्यावर शिक्कामोर्तब होईल, काँग्रेससोबत सध्या चर्चा सुरू आहे, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. जे काही बोलायचे त्यावेळी जाहीर सभेवेळी बोलूच. पण माझी एक मुलाखत झाली होती. त्या मुलाखतीत कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, असे म्हटले होते. तेथूनच आम्ही एकत्र येण्याची सुरूवात झाली. कोण किती जागा लढवणार, आकडा काय.. हे आम्ही तुम्हाला सांगणार नाही. महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुले पळवणाऱ्याच्या टोळ्या फिरताता. त्यामध्ये दोन टोळ्या अॅड झाल्या आहेत. ते राजकीय पक्षातील मुले पळवतात. ते उमेदवाराला पळवातात.
निवडणुका लढवणाऱ्या सर्व उमेदवाराला दोन्ही पक्षाकडून उमेदवारी दिली जाते. कधी भरायची ते आपल्याला कळवले जाईल. शिवसेना आणि मनसेची युती झाली, हे आज मी जाहीर करतो. धन्यवाद- असं राज ठाकरे म्हणाले.
सगळे ठाकरे घराणे मुंबईसाठी संघर्ष करत होते. त्यानंतरचा इतिहास मी सांगत नाहीत. महाराष्ट्राने मुंबई मिळवल्यानंतर उपरे नाचायला लागले. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली. पुढच्या वर्षी शिवसेनेला ६० वर्षे होतील. इतके वर्षे व्यवस्थित गेली. पण पुन्हा एकदा मुंबईच्या चिंधड्या उडवला तयार झाले.दिल्लीमध्ये बसलेल्या दोन जणांनी हे कट रचलाय. पण आता आपण भांडत बसलो तर हुत्मात्यांचा अपमान होईल. आम्ही एकत्र राहण्यासाठी एकत्र आलोय. मुंबई-महाराष्ट्रावर वाकड्या नजरेने पाहिले अथवा मुंबईला तोडण्याचा प्रयत्न केला तर त्याचा राजकीय खात्मा केल्याशिवाय राहणार नाही, असेउद्धव ठाकरे म्हणाले.
आजचा दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढण्यानंतर मराठी ऐक्याचा मगंलकलश होता. आज पुन्हा एकदा मराठी ऐक्याचा मंगलकलश घेऊ राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आलेले आहेत. तोच आनंदाचा क्षण महाराष्ट्रात आला आहे. मुंबईसह अनेक महापालिकेत विजयी भगवा फडकावल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राला ठाकरेच नेतृत्व देऊ शकतात, अन् महाराष्ट्र ठाकरेंच्याच पाठीशी असतील, असे संजय राऊत म्हणाले.
आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे युतीची घोषणा करणार आहे. त्याआधी ठाकरे बंधूंनी बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन केले आहे.
पुणे महानगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर जय इच्छुकांनी पक्षाकडून मुलाखती दिलेले आहेत त्यांच्याशी साधणार संवाद
गेले काही दिवसापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर चर्चा सुरू आहेत त्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे इच्छुकांशी सांगणार संवाद
विविध कारणांमुळे गेल्या ५ वर्षांपासून रखडलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. नामनिर्देशनपत्र भरण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज प्राप्त झाला नसला, तरी एका दिवसात ५१० नामनिर्देशनपत्रांची विक्री झाली. नामनिर्देशनपत्रांच्या विक्रीचा हा आकडा निवडणुकीतील ईर्ष्या स्पष्ट करणारा आहे.
दरम्यान, प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सुद्धा निवडणूक कामकाजात सहभागी न झालेल्या ५० कर्मचाऱ्यांना निलंबन का करू नये, म्हणून प्रशासकांनी नोटीस काढल्या आहेत. कोल्हापुरातल्या सात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात नागरिकांनी गर्दी केली. एकेक व्यक्ती चार-चार नामनिर्देशनपत्रे घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
हिंगोली शहरात रेल्वे उड्डाणपुलावर मोठी वाहतूक समस्या निर्माण झाली आहे. या भागात वाहतुकीची दररोज कोंडी होत असल्याने नागरिकांसाठी प्रवास करणे डोकेदुखी बनले आहे.
अकोला बायपास परिसरातून हिंगोली शहरात दाखल होताना रेल्वे उडान पूल हा एकमेव प्रमुख मार्ग असल्याने दररोज जड वाहने आणि दुचाकी चालक याच रस्त्याने प्रवास करत आहेत.
लातूर महापालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण आता तापायला सुरुवात झाली आहे , शहरातील वार्ड क्रमांक १५ मध्ये इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे. या वार्डातून निवडणूक लढवण्यासाठी प्रमुख पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर उमेदवारीची मागणी होत आहे.
भारतीय जनता पक्षाकडून वार्ड क्रमांक १५ साठी तब्बल 115 पेक्षा अधिक इच्छुकांनी उमेदवारी अर्जासाठी पक्षाकडे मागणी केल्याची माहिती आहे. तर काँग्रेसकडून देखील 40 पेक्षा अधिक उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारी मागणी केली आहे,त्यामुळे भाजप आणि काँग्रेस या नेतृत्वासमोर योग्य उमेदवाराची निवड करताना मोठे आव्हान उभ राहणार असल्याचं चित्र दिसत आहे.या वार्डासाठी स्पर्धा तीव्र असून, पक्षांतर्गत चाचपणी सुरू आहे.
वा
- नागपूर जिल्ह्यातील गुमगाव येथे गोळीबार
- प्राध्यापक नितीन देवतळे, प्रविण देवतळे आणि एका मित्रावर गोळीबार
- दोन राऊंड फायरिंग झाल्याची माहिती, तीन जखमी एक जण गंभीर
- घरगुती वादातून फायरिंग झाल्याची मातीची
- आज सकाळी आठ वाजताची घटना
- गावातील गज्जू याने व्यक्तीने गोळीबार केल्यची माहिती..
नांदेड शहरातील असर्जन परिसरात पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. मागील 40 वर्षापासून येथे अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे कुटुंब वास्तव्यास आहेत.जवळपास 500 हुन अधिक मतदार या वसाहतीत आहेत.परंतु शासनाने आता या कुटुंबांना ही वसाहत खाली करण्यासाठी नोटीस पाठविल्या आहेत. मागील चाळीस वर्षापासून वास्तव्यास असलेल्या या कुटुंबीयांनी ही वसाहत खाली करण्यास नकार दिलाय.परिणामी महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय या रहिवाशांनी घेतला आहे. शासनाने आमची पर्यायी व्यवस्था करावी, प्रधानमंत्री आवास योजनेतून आम्हाला घरकुल देण्यात यावेत अशी मागणी देखील येथील रहिवाशांनी केली आहे.
हवालाची रक्कम देण्या - घेण्यासाठी व ऑनलाईन गंडा घालण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या 34 बँक खात्यावर सांगली सायबर पोलिसांनी कारवाई केली. कमिशन बेसवर या बँक खात्याचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. तर 34 बँक खात्यावरून गैरप्रकार करणाऱ्या जैब जावेद शेख याला सांगलीतून अटक करण्यात आलीये. जैब शेख हा हवालाची रक्कम देण्या - घेण्यासाठी, ऑनलाइन गंडा घालण्यासाठी, क्रिप्टो करन्सी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी या 34 बँक खात्यांचा वापर करीत होता. ज्यांच्या नावे बँक खाते होते, त्यांना या बदल्यात कमिशन देण्यात येत होते. दरम्यान या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात सांगली सायबर पोलिसांना यश आले असून 34 बँक खात्यावर कारवाई करण्यात आलीये. तसेच डेबिट कार्ड, चेक बुक आणि पासबुक जप्त करण्यात आलेत. या खात्यावरून कोट्यावधी रुपयांचा व्यवहार केल्याची शक्यता असल्याने त्या दृष्टीने ही सायबर पोलिसांचा तपास सुरू आहे.
रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला मोटरसायकलची पाठीमागून जोरदार धडक बसल्याने मोटरसायकल वरील तिघांपैकी दोन जण जागेवरच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला. नांदेडच्या माहूर तालुक्यातील वाई बाजार जवळील वाघाई टेकडी जवळ हा भीषण अपघात झाला. वाघाडी टेकडी जवळ रस्त्याच्या बाजूला उभे असलेल्या ट्रकला पाठीमागून मोटरसायकल धडक दिली.या अपघातात आसोली साईनगर येथील तिघेजण माहूर कडे जात होते. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाची आता आणखी एक नवी डेडलाईन
एप्रिल 2026 पर्यंत या महामार्गाचं काम पुर्ण केलं जाणार
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभा अधिवेशनादरम्यान दिली नवी डेडलाईन
सध्या मुंबई गोवा महामार्गाचे काम 90% पूर्ण
संगमेश्वर ते वाकेड दरम्यानचं काम रखडलेलं
महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांना जोडणारा मुंबई गोवा महामार्ग
आता तरी नवी डेडलाईन पाळली जाणार का...केला जातोय प्रश्न उपस्थित...
नाशिकच्या नांदगाव शहरातील श्रीकृष्ण नगर आणि भावसार गल्ली परिसरात घरासमोर खेळणाऱ्या पाच अल्पवयीन मुलांवर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला चढवून त्यांचे लचके तोडले. या हल्ल्यात ५ मुले जखमी असून त्यातील एका मुलाची प्रकृती गंभीर आहे. त्याच्या गालावर आणि कमरेला दुखापती झाल्या आहेत. नांदगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठीं मालेगाव येथे हलवण्यात आले आहे. मुलांचा आरडाओरडा ऐकून पालकांनी काठ्यांसह धाव घेतली, मात्र तोपर्यंत कुत्र्याने पाच मुलांना चावा घेऊन जखमी केले होते. दरम्यान भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणावे, त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता नागरिकांकडून करण्यात येत आहे.
पैशांची चणचण भागविण्यासाठी दुचाकी चोरून विक्री करणाऱ्या सराईताला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. संग्राम शिवाजी गायकवाड असे त्याने नाव आहे. चोरट्याकडून 17 लाख रुपये किमतीच्या 34 दुचाकी जप्त केल्या. चोरीच्या दुचाकी विक्रीला मदत करणाऱ्या 4 एजंटांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शहरात वाढत्या दुचाकी चोरीबाबत तपासासाठी स्थानिक 'पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेते पथक नेमले होते. चोरीची दुचाकी घेऊन एकहेरले येथे येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिस अंमलदार सुरेश पाटील, रूपेश माने यांना मिळाली होती. पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना सांगून त्यांनी पथकासह या भागात सापळा रचला होता. संशयित संग्राम गायकवाडला पकडून चौकशी केली असता त्याच्याजवळीस दुचाकी चोरीची असल्याचे समोर आले. त्याने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांसह कर्नाटकातून 33 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याजवळून चोरीच्या एकूण 34 दुचाकी आढळल्या.
ख्रिश्चन बांधवांचा नाताळ सण अवघ्या एका दिवसांवर येऊन ठेपला असून नाशिकच्या मनमाडमध्ये नाताळ सणाची धुम पाहायला मिळत आहे.मनमाडमध्ये ख्रिश्चन बांधवांची मोठी संख्या असून.शहरात सात चर्च आहे.नाताळ निमित्त सर्वच चर्चवर आकर्षक रोषणाई करण्यात आल्याने चर्च विद्युत दिव्यांनी उजळून निघाले आहे.ख्रिश्चन बांधवांना आता ख्रिसमसचे वेध लागले असून घरोघरी आकाश कंदील , जिंगल बेल लावून सजावट केली जात आहे.
सकाळी ११ वाजल्यापासून पक्ष कार्यालयात उपस्थितीत राहणार
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र येणार या चर्चा सुरू आहेत,यावर सुप्रिया सुळे आज पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सोबत संवाद साधणार
सकाळी 11 ते दुपारी चार वाजेपर्यंत सुप्रिया सुळे पक्ष कार्यालयात असणार
पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी काल सुप्रिया सुळे यांची मुंबईमध्ये भेट घेतल्यानंतर आज दुपारी चार वाजता ते पक्ष कार्यालयात आपली भूमिका जाहीर करणार आहेत.
त्या अगोदर सुप्रिया सुळे कार्यकर्त्यांची संवाद साधणार आहेत.
त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का यावर काय चर्चा होते ते पाहावं लागणार आहे
आरटीओ थर्टी फर्स्ट च्या पार्श्वभूमीवर मध्ये पण करून वाहन चालवणाऱ्या वर कारवाईला सुरुवात केली आहे
31 डिसेंबर पर्यंत ही कारवाई सुरू राहणार आहे.यासाठी आठ सुरक्षा पथके तयार केले असून त्यांच्या मार्फत ब्रेथ अनालायझर द्वारे तपासणी केली जाणार आहे
थर्टी फर्स्ट च्या पार्श्वभूमीवर मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.
पुणे आरटीओ कडून त्यासाठी आठ रस्ता सुरक्षा पथके तयार करण्यात आली आहेत.
या पथकांना स्थानिक पोलीस ठाण्याच्या संपर्कात राहून कारवाई करण्याचे निर्देश आरटीओकडून देण्यात आले आहेत
रात्री साडे अकरा ते पहाटे चार दरम्यान ही कारवाई करावी असे स्पष्ट सूचना पथकाना देण्यात आल्या आहेत
अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपची उमेदवार यादी अंतिम टप्प्यात, शेवटच्या क्षणी घोषित होणार...
बंडखोरी टाळण्यासाठी भाजपचा विशेष प्लॅन तयार;अंतिम यादीतील उमेदवारांशी थेट संपर्क साधणार नेतृत्व...
मित्रपक्षांना जागावाटप करताना भाजपकडून कडक भूमिका.
इच्छुकांची संख्या जास्त असल्याने पक्षांतर्गत तणाव वाढला,भाजपकडून निवड झालेल्यांनाच तिकीट देण्यावर भर.
नाराज इच्छुकांना शांत ठेवण्यासाठी समजूत काढण्याची तयारी.
अमरावती महापालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग.
निवडणुकीआधीच ठाकरेंची शिवसेना शहरात शून्यावर,शेवटच्या दोन माजी नगरसेवकांचा ही जय महाराष्ट्र
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आता २०१७ मध्ये निवडून आलेला एकही नगरसेवक शिल्लक राहिलेला नाही.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर नाना भानगिरे वगळता सर्व नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले होते.
मात्र आता एकही नगरसेवक शिल्लक नसल्याने शिंदे यांच्या शिवसेनेलाच शहरातील अस्तित्व टिकून ठेवावे लागणार आहे.
२०१७ पुणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे १० नगरसेवक निवडून आले होते.शिवसेनेत फूट पडल्यानंतर यातील ९ नगरसेवक हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. मात्र,आता गेल्या तीन वर्षात एकएक करून शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना 'जय महाराष्ट्र' करत दुसऱ्या पक्षामध्ये उड्या मारल्या आहेत
त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एकही नगरसेवकच उरलेला नाही. 'शिवसेना उबाठा मुक्त पुणे' अशी स्थिती निर्माण झाली आहे.
बोपोडी येथील मोक्याच्या 13 एकर आणि मुढवा येथील 40 एकर सरकारी जमिनीचा अपहर केल्याप्रकरणी अटकपूर्व जामीन पेटल्यानंतर उच्च न्यायालयात जाण्यासाठी अंतर अटकपूर्व जामीनाची मुदत वाढवण्याची आरोपी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेची मागणी पुणे न्यायालयाने फेटाळली आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी वाय लांडेकर यांनी हा आदेश दिला त्यामुळे येवलेच्या अडचणी वाढल्या आहेत.
महापालिका निवडणूक उमेदवारी अर्ज विक्रीच्या पहिल्या दिवशी मंगळवारी सहाही विभाग मिळून विक्रमी १,७६३ अर्जांची विक्री झाली. सर्व ठिकाणी अर्ज घेण्यासाठी उमेदवारांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडी याचा अद्याप फैसला होऊ शकला नसल्याने तिकीट वाटप आणि उमेदवारी अधांतरी आहे. त्यामुळे इच्छुक बुचकळ्यात आहेत. त्यामुळे दिवसभरात फक्त पंचवटी विभागात शिवसेना शिंदे गटाच्या एका महिला उमेदवाराने अर्ज दाखल केला. २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत उमेदवारांना अर्ज खरेदी आणि दाखल करता येणार आहे. त्यामुळे सहाही विभागांत अर्ज खरेदीला मोठी गर्दी होती. अनेक ठिकाणी पहिल्या एक दीड तासातच अर्ज विक्री गेले. अर्ज शिल्लक नसल्याने अनेकांना अर्ज मिळवण्यासाठी काही वेळ प्रतीक्षा करावी लागली. सर्वाधिक ५४४ अर्जांची विक्री नवीन नाशिकमध्ये झाली. जुने नाशिकमधील दुबई वार्ड म्हणून परिचित असलेल्या प्रभाग क्रमांक १४ मध्ये सर्वाधिक १४२ उमेदवारी अर्जांची विक्री झालीय.
- उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही
- नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकार्याकडे एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही.
- सर्वच राजकीय पक्षांचे जागा वाटप रखडले असल्याने सोमवारी पासून प्रमुख राजकीय पक्षाचे उमेदवार अर्ज दाखल करण्याची शक्यता
- उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या 10 झोन कार्यालयांमध्ये निवडणूक निर्णय अधिका-यांची नियुक्ती केली आहे.
- येत्या 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे
- या अर्जांची छाननी येत्या 31 डिसेंबरला होणार आहे. उमेदवारांसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत 2 जानेवारी 2026 राहणार आहे. येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवार निवड प्रक्रिया नाना पेठ येथील शिवसेना संपर्क कार्यालयात पार पडली
इच्छुकांनी मुलाखती दिल्या आत्तापर्यंत शिवसेनेच्या सर्व 41 प्रभागांमधून एकूण 336 इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत.
महाविकास आघाडीत शिवसेनेला किती जागा मिळणार हे पहावे लागणार
आज शिवसेना मनसे युती झाल्यावर पुण्यातही युती होणार
प्रवासासाठी आता बारा मिनिटे विलंब
पुणे मुंबई पुणे हेलिकॉप्टर प्रवासाचा कालावधी 8 ते 12 मिनिटांनी वाढणार आहे. 24 डिसेंबर पासून पुणे मुंबई हेलिकॉप्टर सध्याच्या मार्गात बदल होत आहे.
नवीन मार्ग हा आत्ताच्या मार्गापासून काहीसा दुरचा असल्याने परिणामी प्रवासाला वेळ वाढणार आहे.
बदललेल्या मार्गाचा प्रवास शुल्कावर परिणाम होईल का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
रत्नागिरी पंचायत समितीने एका दिवसात मिशन बंधारे उपक्रमांतर्गत 95 ग्रामपंचायतीमध्ये पाचशेहून अधिक बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेतली. कोतवडे गावच्या घारपुरेवाडीत बचतगट महिलांच्या लक्षणीय आणि ग्रामस्थांच्या श्रमदानातून वेतोशी नदीवर वनराई बंधारा बांधण्यात आला. वेतोशी नदीतील पाणी वाहून पुढे जात होते. त्यामुळे त्याचा गावाला फारसा फायदा होत नव्हता. या मोहिमेंतर्गत नदीवर वनराई बंधारा बांधल्याने याचा फायदा गावाला होणार आहे. विशेषतः शेतीसाठी, प्राणीमात्रांसाठी वा अन्य कामांसाठी आता उपयोगात येणार आहे.
नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर लष्कर भागातील महात्मा गांधी रस्त्यावर नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी लष्कर परिसरात २४ आणि २५ डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून तात्पुरता वाहतूक बदल करण्यात येणार आहे.
वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी हा आदेश काढला आहे.
त्यानुसार वाय जंक्शनवरून एम. जी. रस्त्याकडे येणारी वाहतूक १५ ऑगस्ट चौक येथे बंद करून, ती कुरेशी मशीद आणि सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात येणार आहे.
इस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. ती एसबीआय हाऊस चौकातून उजवीकडे वळवून तीनतोफा चौक मार्गे लष्कर पोलिस ठाणेमार्गे वळविण्यात येणार आहे. व्होल्गा चौकातून महम्मद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येऊन ती सरळ ईस्ट स्ट्रीट रस्त्याने इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात येईल.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली असताना आज पहिल्या दिवशी संपूर्ण शहरातील एकाही प्रभागात उमेदवारी अर्ज भरण्यात आलेला नाही.
१५ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून आत्तापर्यंत २ हजार ८८६ अर्जांची विक्री झाली आहे. तर इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी तब्बल २४ हजारापेक्षा जास्त अर्ज दाखल केले आहेत.
: बातमी आहेये वंचित आणि काँग्रेसच्या आघाडी संदर्भातील. अकोल्यासह इतर महापालिकेत वंचित आणि काँग्रेसची आघाडी होणार, अशी जोरदार चर्चा बाहेर सुरुये. मात्र, प्रस्ताव कोणी द्यावा, यावरून आता दोन्ही पक्षात ओढातानी सुरू झालीय. 'पहले आप, पहले आप'..वरूनचं दोन्ही पक्षातील आघाडीचे चर्चा थांबलीये. आघाडीबाबत वंचितकडून प्रस्ताव आला नसल्याचं काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटलंये. त्यावर आता प्रकाश आंबेडकरही स्पष्टच बोलून गेलेये.. आघाडीबाबत अनेकदा चर्चा झाल्या खरी, मात्र त्यांच्याकडून कळवल्या जात नाही.. आताही काँग्रेसची नेहमीप्रमाणेचं भूमिका आहेये.. 'आम्ही तयार आहो, पण ते तयार नाहीत', हेचं दाखवण्याचा काँग्रेसकडून प्रयत्न सुरुये. दरम्यान, यायचं बसायचं, आमची झालीये म्हणायचं... मग, बाहेर भलतंच काहीतरी पसरून द्यायचं.. अशी भूमिका काँग्रेसकडून आहेये.. मात्र, काँग्रेसपेक्षा वंचितचा परफॉर्मन्स चांगला असल्याचेही आंबेडकर म्हणालेये.
कल्याण पूर्व भागात भारतीय जनता पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्याला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे आणि केंद्र सरकारच्या कार्याचे भरभरून कौतुक केले.
रवींद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणात कल्याण पूर्व व पश्चिम या दोन्ही भागांकडे विशेष लक्ष देणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. या भागातील प्रलंबित समस्या सोडवायच्या असतील तर येत्या १५ तारखेला होणाऱ्या निवडणुकीकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था या तिन्ही पातळ्यांवर एकमताचे, स्थिर सरकार असणे विकासासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
खेड तालुक्यातील गाडकवाडी येथे थकीत वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या वायरमनला दोन भावांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडलीय. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या समोर आलाय.
थकीत वीज बिल वसुलीसाठी गेलेले वायरमन संतोष बो-हाडे आणि त्यांचे सहकारी यांच्यावर संदीप सरडे आणि रामदास सरडे या दोन भावांनी शिवीगाळ करत जमावासमोर मारहाण केली. या प्रकरणी खेड पोलिसांत दोघांविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विकसित करण्यात आलेला ‘महाविस्तार AI’ हा अत्याधुनिक शेती मार्गदर्शक मोबाईल अँप सध्या शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय ठरत आहे. बदलत्या हवामान परिस्थितीमध्ये आणि वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर हा अँप शेतकऱ्यांसाठी एक प्रभावी डिजिटल साधन ठरत असून, शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारा उपक्रम म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.