आज विधीमंडळांच्या लाँबीत कार्यकर्तांची हाणामारी म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय व्यवस्थेला काळीमा फासणारी घटना मात्र याची सुरवात झाली कुढू ते पाहूया . जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील वादाची सुरुवात 2022 मध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यापासून झाली. आव्हाड यांनी मंडल आयोग आणि ओबीसी आरक्षणाबाबत बोलताना,
भाजपाच्या ओबीसींवर माझा विश्वास नाही, कारण मंडल आयोगाच्या वेळी ते लढले नाहीत,"असे वक्तव्य केले. या वक्तव्यावर गोपीचंद पडळकर यांनी तीव्र आक्षेप घेतला आणि आव्हाड यांच्यावर
असा टोला लगावला. यामुळे दोघांमधील तणाव वाढला.हा वाद 2025 मध्ये पुन्हा तीव्र झाला, तो पडकरांच्या असंस्कृत अशा टीपणीनं . हा प्रकार अत्यंत गल्लीछं आणि राजकारणाचा दर्जा खालावणारा होता
पडळकर यांच्या याच वक्तव्यानंतर 16 जुलै 2025 रोजी विधानभवनाच्या गेटवर दोघांमधील शाब्दिक बाचाबाची झाली. आव्हाड यांनी पडळकर यांच्यावर त्यांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला, तर पडळकर यांनी याला प्रत्युत्तर देत वाद तीव्र केला. यावेळी आव्हाड यांनी पडळकर यांना "मंगळसूत्र चोर" अशी टीका केली होती
याचीच परिणिती गुरवारी विधानभवनाच्या लॉबीत दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली, ज्यामुळे हा वाद आणखी चिघळला हे मात्र नक्की की महाराष्ट्रातल्या नागरिकांला लाज वाटवी आपल्या प्रतिनिधी बद्दल इतका विधीमंडळाला काळीमा फासणारी ही घटना म्हणावी लागेल .
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.