लातूर: दिवंगत केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांचे स्वप्न होत की लातूर हे शांघाय शहरासारखं बनलं पाहिजे, पण आता शहराचा आंबेजोगाई ते नांदेड जाणारा रिंगरोड मृत्यूचा सापळा असलेला मार्ग बनला आहे. यामुळे मी लातूरकर ग्रुपच्या वतीनं लातूरचे नामकरण शांघाय करण्यात आले आहे, तर यास अमित विलासराव देशमुख मार्ग अन् नामकरण सुध्दा करत लोकप्रतिनिधींना उपहासात्मक टोला लगावला आहे. जे जे नवं, ते ते लातूरला हवं असं दिवंगत केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख भाषनात सांगत असत लातूर शहर प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असताना शहराच्या सभोवती राष्ट्रीय महामार्ग बनत आहेत.
पण आंबेजोगाई नाका ते नांदेड नाका या दरम्यानचा रस्ता हा खड्डेयुक्त बनलाय रस्त्याचं हस्तांतरण महानगरपालिकेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे झाले या दरम्यान मी लातूरकर ग्रुपने अर्धनग्न आंदोलन केली वारंवार प्रशासनाला विनंत्या केल्या निवेदन दिली पण उदासीन आणि निष्क्रिय प्रशासन या रस्त्याच्या बाबतीत गंभीर कधीच झाली नाही म्हणून आजतागायत हा रस्ता खड्डेमय झालाय या रस्त्यावर अनेक अपघात झाले, असून मृत्यू सुद्धा झाले आहेत.
मी लातूरकर ग्रुपने आक्रोश व्यक्त करण्यासाठी आज या रस्त्याचं नामकरण करत शांघाय शहर केलं तर रस्त्याला पालकमंत्री अमित विलासराव देशमुख अस नाव दिलं आहे. पालकमंत्री अमित देशमुख यांची प्रतिमा चांगली आहे पण रस्ता अत्यंत वाईट झालाय आता तरी लोकप्रतिनिधी लाजून रस्त्याच्या निर्मितीकडे लक्ष देतील का हा प्रश्न आहे.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.