kolhapur fire  saam tv
महाराष्ट्र

Kolhapur Fire : कोल्हापूरच्या शिवाजी पार्कातील झोपडपट्टीला भीषण आग; २० घरं जळून खाक

कोल्हापूरच्या शिवाजी पार्क येथील झोपडपट्टीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

रणजीत माजगांवकर

Kolhapur Fire : कोल्हापूर येथील शिवाजी पार्क भागातून आगीचं वृत्त हाती आलं आहे. कोल्हापूरच्या शिवाजी पार्क येथील झोपडपट्टीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत वीस घरांना आग लागली आहे. आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी पोचले आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील (Kolhapur) शिवाजी पार्क येथील झोपडपट्टीला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत परिसरातील २० घरे जळून खाक झाली आहेत. या आगीमुळे अनेक कुटुंबाच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे. आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान खबर मिळाल्याने घटनास्थळी पोचले. त्यानंतर अथक परिश्रमानंतर जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.

नेमकी आग कशामुळे लागली?

कोल्हापूरच्या शिवाजी पार्कातील झोपडपट्टीत आग लागल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. त्यामुळे झोपड्यांना लागलेली आग विझविण्यासाठी नागरिकांची एकच धावाधाव झाली. अग्नीशमन दलाच्या जवानासहित नागिरकांनी देखील आग विझविण्यासाठी मदत केली.

या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनाी सिलेंडरचा स्फोट झाल्याचा आवाज ऐकला, त्यानंतर भीषण आग लागली असं नागरिक सांगत आहे. या आगीत तांब्यापासून बनवणाऱ्या साधनसामुग्री वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भीषण आगीत झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : शब्द खरा ठरणार, आर्थिक फायदा होणार; ५ राशींच्या लोकांचे आयुष्य बदलणार

जगात अणुबॉम्बची भीती, भारताकडे संजीवनी; रेडिएशनवर भारताचा रामबाण उपाय

‘AI फॉर एज्युकेशन’, १० लाखाहून अधिक मुलांचे शिक्षण होईल ए वन; संपर्क फाउंडेशनची राज्यात ४२ कोटींची गुंतवणूक

iran and israel war News : गॅसनं वाढवलं तळीरामाचं टेन्शन; देशात दारुचा दुष्काळ पडणार?

बीड पुन्हा हादरलं! कृष्णा आंधळे आणि जयराम चाटे यांच्या टोळीकडून एकावर डोळ्यात मिरची पावडर टाकून जीवघेणा हल्ला

SCROLL FOR NEXT