Kolhapur Rain News Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur Rain Update: कोल्हापूर जिल्ह्यात संततधार सुरुच; २८ बंधारे पाण्याखाली

एनडीआरएफच्या देन तुकड्या कोल्हापुरात दाखल झाल्या आहेत.

सुमित सावंतसह, संभाजी थोरात साम टीव्ही

कोल्हापूर: दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे (Rain) कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नद्यांवरील २८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राजाराम बंधाऱ्यावर ३० फूट पाणी आहे, तर राधानगरी धरणातून ११०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यात अजूनही पावसाची रिपरिप सुरुच आहे.

धरण क्षेत्रात पावसाने मुसळधार सुरुवात केली आहे, त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच एनडीआरएफच्या देन तुकड्या कोल्हापुरात (Kolhapur) दाखल झाल्या आहेत.

मुंबईत ९ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट

राज्यात काल (मंगळवार) पासून मुसळधार पावसाने (Rain) सुरुवात केली आहे. हवामान विभागाने मुंबईत ९ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. देशातील सर्वच राज्यांत मान्सून सक्रीय झाला आहे. ५, ८ आणि ९ जुलै रोजी तेलंगणातील विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर आज सकाळी मुंबईत पावसाने थोडी विश्रांती घेतली होती, पण नवी मुंबईत सकाळपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे.

कोकणात काही ठिकाणी दरड कोसळली आहे, तर चिपळूनमध्ये पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली. एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा, गोरेगाव आणि सडक-अर्जुनी परिसरात मुसळधार पाऊस (Rain) पडला आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक १५०.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तिरोडा तालुक्यात १४० मिमी आणि गोरेगाव तालुक्यात १०६ व गोंदिया तालुक्यात ८१ .४ मिमी पावसाची नोंद झाली. पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे, त्यामुळे गोंदिया जिल्हा प्रशासन अलर्टवर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

Red Fort History: ऐतिहासिक लाल किल्ल्याचे बांधकाम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले?

Pitru Paksha 2025 : पितृंचे तर्पण करताना लक्षात ठेवा हे नियम

'ही शान कुणाची, लालबागच्या राजाची!' मंडपाबाहेर येताच देशभक्तीवर गाणं वाजलं, भाविकांच्या अंगावर काटा अन् डोळ्यात अश्रू

Akshay Kumar: अक्षय कुमारचा दिलदारपणा; पूरग्रस्तांना केली ५ कोटींची मदत, म्हणाला 'ही माझी...

SCROLL FOR NEXT