- जितेंद्र आव्हाड-किरिट सोमय्या
- जितेंद्र आव्हाड-किरिट सोमय्या - Saam Tv
महाराष्ट्र

Breaking : मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक? किरीट सोमय्यांचं ट्विट!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील बंगल्यावर अनंत करमुसे या सिव्हिल इंजिनिअर तरुणाला एप्रिल २०२० मध्ये झालेल्या मारहाण प्रकरणी त्यावेळी आव्हाडांच्या तीन बॉडीगार्डवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. हे तिघेही पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचारी होते. यातील दोघे जण मुंबई पोलीस दलातील तर एक जण ठाण्यातील पोलीस कर्मचारी होता आहे. या प्रकरणात एकूण नऊ जणांना अटक करण्यात आली होती.

याच प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना कधी अटक होणार? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनेक वेळा उपस्थित केला होता. अनंत करमुसे प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारला गेल्या वर्षी भाजपने चांगलेच धारेवर धरले होते.

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्यानंतर सिव्हिल इंजिनिअर असलेल्या अनंत करमुसे यांना आव्हाड यांच्या बंगल्यावर १५ ते २० जणांनी अपहरण करून बेदम मारहाण केल्याचा आरोप करमुसे यांनी केला होता. या प्रकरणानंतर राज्यातील भाजपा महाविकास आघाडी सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात आक्रमक झाली होती.

अनंत करमुसे प्रकरणात ठाकरे सरकारने सहा महिन्यांनी ऑक्टोबर २०२० मध्ये आव्हाड यांच्या तीन अंगरक्षकांना अटक केली होती. त्यानंतर आता ऑक्टोबर २०२१ मध्ये जितेंद्र आव्हाडांना अटक झाल्याचे ट्विट किरीट सोमय्यांनी केले आहे.

दरम्यान, नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार आव्हाड यांना अटक होऊन जामीन देखील मंजूर झाला आहे. कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court: ...तर मानधन सोडा, घशाला आराम द्या; रोहतगींच्या त्या विनंतीवर CJI चंद्रचूड यांचं उत्तर

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

SCROLL FOR NEXT