Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News: अंबडच्या जंगी तलावात हजारो माशांचा मृत्यू; संसर्गजन्य रोगाची शक्यता

अंबडच्या जंगी तलावात हजारो माशांचा मृत्यू; संसर्गजन्य रोगाची शक्यता

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालना शहरातील मोती तलावात हजारो माशांचा मृत्यूची घटना ताजी असताना अंबड (Ambad) शहरातील जंगी तलावात तब्बल ३५ ते ४० टन मासे मृत अवस्थेत आढळून आले आहेत. यामुळे मच्छिउत्पादकात एकच खबळ उडालीय. (Letest Marathi News)

अंबड शहरातील जंगी तलावात सैफाल फारुकी या मच्छि उत्पादक गुतेदाराने अंबड नगरपरिषद यांच्याकडे १८ लाख २२ हजार रुपये भरून मच्छि उत्पादनासाठी टेंडर ही घेतले आहे. दरम्यान जास्त पाऊस झाल्याने त्यांनी तलावात दोन वेळा बीज टाकूनही ते बीज सांडव्यातून वाहून गेले. त्यात त्यांनी इकडून तिकडून पैसे जमवत तिसऱ्यांदा तलावात बीज सोडले. त्यासाठी त्यांनी ९ लाख ६० हजाराचा खर्च ही केला. उत्पन्न बाजारात नेण्या योग्य झाले असताना आज त्यांना तलावात तब्बल ३५ ते ४९ टन माशांचा मृत्यु झाल्याची बाब लक्षात आली. यात त्यांचे तब्बल यात ३२ लाखाचे नुकसान झाले आहे.

या प्रकरणी नगर परिषद प्रशासनाने तात्काळ मृत माशांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठून नुकसान भरपाई द्यावी; अशी मागणी या मच्छि उत्पादक गुतेदारांनी केली. दरम्यान गेल्या आठवड्यात जालन्यातील मोती तलावात अशाच प्रकारच्या माशांचा मृत्यू संसर्गजन्य आजारानं झाला असावा असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला होता. त्यामुळे आज झालेल्या माशांच्या मृत्यूमुळे मच्छि उत्पादकात एकच खबळ उडालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT