महाराष्ट्र

साडी सोडून केली झोळी.. विमलबाई ठरल्‍या बहिणाबाई चौधरी गौरव पुरस्काराच्‍या पहिल्‍या मानकरी

साडी सोडून केली झोळी.. विमलबाई ठरल्‍या बहिणाबाई चौधरी गौरव पुरस्काराच्‍या पहिल्‍या मानकरी

Rajesh Sonwane

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा पहिला ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी गौरव पुरस्कार’ वर्डी (ता. चोपडा) येथील विमलबाई हिरामण भिल यांना जाहीर झाला आहे. (jalgaon-news-Vimalbai-bhil-became-the-first-recipient-of-Bahinabai-Chaudhary-Gaurav-Award)

वर्डी शिवारात झालेल्या विमान अपघातात जखमी तरूणीसाठी अंगावरची साडी सोडून त्याची झोळी बनवून रूग्णवाहिकेपर्यंत पोहचविण्यासाठी मदत करून मानवतेचा आदर्श घालून दिल्याबद्दल हा पुरस्कार देवून त्यांचा विद्यापीठाच्यावतीने त्यांचा ११ ऑगस्टला सन्मान करण्यात येणार आहे.

विमलबाईंची अशी होती कामगिरी

विद्यापीठाच्यावतीने यावर्षीपासून कवयित्री बहिणाबाई चौधरी गौरव पुरस्कार दिला जाणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली होती. १६ जुलैला एमव्हीकेएम संस्थेअंतर्गत शिरपूर येथे सुरू असलेल्या विमान प्रशिक्षण केंद्रामधील प्रशिक्षणार्थी विमान चोपडा तालुक्यातील वर्डी शिवारात कोसळले होते. या दुर्घटनेत वैमानिकाचा मृत्यू झाला. तर प्रशिक्षणार्थी वैमानिक अंशिका गुर्जर ही जखमी झाली. ५० फुट खोल दरीत हे विमान कोसळले डोंगराळ भाग असल्यामुळे रूग्णवाहिका घटनास्थळापर्यंत पोहचू शकत नव्हती. आदिवसाी बांधवांनी विमानाची काच फोडून या तरूणीला बाहेर काढले. यावेळी ३ किमी लांबवर असलेल्या रूग्णवाहिकेजवळ तिला तात्काळ नेण्यासाठी स्ट्रेचर उपलब्ध नसल्यामुळे विमलबाई भिल यांनी तात्काळ अंगावरची साडी काढून त्याची झोळी तयार करण्यासाठी दिली. त्यामुळे तात्काळ रूग्णवाहिकेजवळ आणून इस्पितळात दाखल करता आले व या तरूणीचा प्राण वाचला.

त्‍या अकरा युवकांचाही सन्‍मान

सदर घटनेत विमलबाई भिल यांनी प्रसंगावधान दाखवत मानवतेचा आदर्श घालून दिल्याबद्दल प्रभारी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्याचे ठरविले आहे. ११ हजार रूपये, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र आणि साडी- चोळी देवून हा पुरस्कार दिला जाणार आहे. यावेळी विमलबाई भिल यांच्यासोबत अपघातस्थळी मदत करणाऱ्या ११ तरूणांचादेखील स्मृतीचिन्ह देवून सत्कार केला जाणार आहे. ११ ऑगस्टला विद्यापीठाच्या नामविस्तार सोहळ्यानिमित्त होणाऱ्या कार्यगौरव पुरस्कार सोहळ्यात विमलबाई भिल यांना हा पुरस्कार पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दिला जाणार आहे. अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन राहणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

DA Hike: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट मिळणार! केंद्र सरकार मोठी घोषणा करण्याच्या तयारीत

Success Story: वडील घरोघरी जाऊन कपडे विकायचे, लेकाने मोठ्या जिद्दीने UPSC क्रॅक केली; IAS अनिल बसाक यांचा प्रवास

Maharashtra Politics : कोण होणार नाशिकचा पालकमंत्री? भुसे, महाजन, भुजबळांमध्ये रस्सीखेच? वाचा स्पेशल रिपोर्ट

Monday Horoscope : वाहने जपून चालवावी, मनोबल कमी होणार; ५ राशींच्या लोकांचा ताण वाढणार, वाचा सोमवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT