महाराष्ट्र

अंगणातील खड्ड्यात विद्युत प्रवाह; महिलेचा जागीच मृत्‍यू

अंगणातील खड्ड्यात विद्युत प्रवाह; महिलेचा जागीच मृत्‍यू

Rajesh Sonwane

जळगाव : शहरातील बिलाल चौक येथील ५० वर्षीय महिलेचा विजेच्‍या धक्‍क्‍याने जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. पाऊस पडल्‍याने बाहेर पाणी होते. कपडे सुकवायला गेल्‍यानंतर बाहेर पडलेल्‍या विद्युत तारेला स्‍पर्श होवून महिलेचा मृत्‍यू झाला. (jalgaon-news-road-main-electric-supply-current-women-death)

जळगाव शहरातील तांबापूरा परिसर असलेल्‍या बिलाल चौकातील रहिवासी जिन्नताबी हुसेन शेख (वय ५०) असे मृत झालेल्‍या महिलेचे नाव आहे. जिन्नताबी हुसेन शेख ह्या आज दुपारी कपडे सुकवण्यासाठी अंगणात आल्या. यावेळी अंगणातील खड्ड्यात विद्युत तार पडलेली होती. त्‍यांचे लक्ष नसल्‍याने त्यांच्या पाय त्या खड्ड्यातील पाण्यात पडला. यात त्यांना विजेचा जोरदार झटका बसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना दुपारी तीनच्या सुमारास घडली. त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

पाऊस पडल्‍याने सावधान

पावसाळ्याच्‍या दिवसात प्रामुख्‍याने विजेचा धक्‍का लागण्याच्‍या घटना अधिक घडत असतात. पाऊस पडल्‍यानंतर ओल्‍या जागेतच अनेकदा पाणी भरताना मोटरचा करंट लागून मृत्‍यू होण्याच्‍या घटना देखील घडल्‍या आहेत. यामुळे पावसाळ्याच्‍या दिवसात सावधानता बाळगणे महत्‍त्‍वाचे ठरते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेतून ६ लाख शेतकऱ्यांना वगळले? तुम्हाला ₹२००० मिळणार की नाही? असं करा चेक

Lagnanantar Hoilach Prem Video : जीवा-नंदिनी अन् पार्थ-काव्याचा संसार मोडला? 'लग्नानंतर होईलच प्रेम' मध्ये मोठा ट्विस्ट

मोठी बातमी! काँग्रेस नेत्या प्रज्ञा सातव यांचा आमदारकीचा राजीनामा; भाजपमध्ये आज प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: नाशिक महापालिकेसाठी आजपासून शिंदेंच्या शिवसेनेच्या मुलाखती

Gharkul Yojana : मावळात कातकरी-ठाकर समाजाला मिळणार हक्काचे घर, सरकार थेट कॉलनी उभारणार

SCROLL FOR NEXT