Rain Alert 
महाराष्ट्र

जळगाव जिल्‍ह्यात दोन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस

जळगाव जिल्‍ह्यात दोन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : आठवडाभरापासून पावसाने विश्रांती घेतल्‍यानंतर पुन्‍हा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. जिल्ह्यातील काही भागात शनिवार व रविवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. (jalgaon-news-Rain-with-strong-winds-for-two-days-in-Jalgaon-district)

सतत मुसळधार पाऊस झाल्‍याने शेतीतील बहुतांश कामे रखडली आहे. कापूस वेचणीच्‍या कामाला आता सुरवात झाल्‍यानंतर पुन्‍हा पावसाची अंदाज वर्तविल्‍याने बळीराजा चिंतेत पडला आहे. यामुळेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील शेतमालाची काढणी व शेतात साठवून ठेवलेला शेतमाल सुस्थितीत योग्य ठिकाणी ठेवावा. जेणेकरुन होणाऱ्या वादळी वारा, अवकाळी पावसापासून शेतमालाचे संरक्षण होईल, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

शेतकरी हवालदील अन्‌ आता पुन्‍हा संकट

जळगाव जिल्ह्यात यंदा अनेकदा अतिवृष्टी झाली. यामुळे खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे पिक काळवंडली तसेच शेतात पाणी साचले, नदी, नाल्याला आलेल्या पुरात काठावरील शेतांमध्ये पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नसल्याने शेतकरी हवालदील झाले आहे. त्यामुळे शनिवारी व रविवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊसाची शक्यता वर्तवल्याने शेतऱ्यांनी आपल्या पिकांची व शेतमालाची काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : कल्याणमध्ये पोलिसांकडून २ वर्षांच्या मुलीवर गंभीर गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण? Video

Chandrashekhar Bawankule : फोन टॅपिंगनंतर आता मोबाईल सर्व्हिलन्स? बावनकुळेंच्या वक्तव्याने राज्यात खळबळ, VIDEO

Saturday Horoscope : विनाकारण कामांमध्ये येणाऱ्या अडचणीमुळे मनोबल कमी होईल; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Government : राज्यात बांगलादेशी घुसखोरांना आळा बसणार; फडणवीस सरकारने उचललं मोठं पाऊल

Satara News : डॉक्टर महिलेचे आरोपीसोबत १५० हून अधिक कॉल, आत्महत्येपूर्वी काय घडलं? पोलीस तपासात महत्वाची माहिती समोर

SCROLL FOR NEXT