Jalgaon unlock 
महाराष्ट्र

जळगाव जिल्‍ह्यात बाजारपेठ रात्री ८ पर्यंत खुली

जळगाव जिल्‍ह्यात बाजारपेठ रात्री ८ पर्यंत खुली

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : कोरोना संसर्गाचा दर कमी असलेल्या राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये मंगळवारपासून (ता.३) निर्बंध शिथिल होत आहेत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातही आता सोमवार ते शुक्रवार सर्व दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत सुर असतील, तर शनिवारी ती दुपारी ३ पर्यंतच खुली राहणार आहेत. याशिवाय अन्य निर्बंध कायम असतील. (jalgaon-news-coronavirus-jalgaon-district-unlock-proccess-start-today)

राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असून त्याठिकाणी निर्बंध शिथिल करण्याबाबत प्रस्ताव विचाराधीन होता. त्यासंबंधीचे आदेश आज शासनाने पारित केले. त्यानुसार आता या २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल झाले आहेत. जळगाव जिल्ह्याचाही त्यात समावेश आहे.

या बाबींचा दिलासा

शासनाच्या आजच्या आदेशानुसार बाजारपेठेतील सर्व दुकानांना मोठा दिलासा मिळाला आहे.

- सर्व प्रकारची दुकाने रात्री ८पर्यंत सुरु राहणार

- शनिवारी ह दुकाने दुपारी ३ पर्यंतच सुरु ठेवता येणार

- रविवारी जीवनावश्‍यक वस्तूवगळता सर्व दुकाने पूर्ण बंद असतील

- उद्यान, पार्क, मैदानांवर केवळ मॉनिंग वॉकसाठी मुभा असेल

- योगा सेंटर, जिम, सलून, स्पा ही ठिकाणे ५० टक्के उपस्थितीसह सुरु ठेवता येतील

- हॉटेल दुपारी ४ वाजेपर्यंतच ५० टक्के क्षमतेसह सुरु राहतील, नंतर पार्सल सुविधा देता येईल

- सर्व प्रार्थनास्थळे, सिनेमागृह, नाट्यगृहे, शाळा, महाविद्यालये बंद असतील

- रात्री ९ ते पहाटे ५ यावेळेत संचारबंदी कायम असेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर

Shocking News : कबड्डी खेळताना खेळाडू मैदानात कोसळला अन् मृत्यू झाला , धक्कदायक कारण आलं समोर

Actress Opps Movement: 'आज तरी पूर्ण कपडे...'; प्रसिद्ध अभिनेत्री झाली ऊप्स मूव्हमेंटची शिकार

Side effects of earbuds use: २ वर्षे इयरबड्स वापरले, कान खराब झाले; धोका टाळण्यासाठी काय कराल?

कल्याण डोंबिवलीकरांवर पाणी कपातीचे संकट! 'या' दिवशी १२ तास पाणी येणार नाही, कारण काय?

SCROLL FOR NEXT