खासदार खडसे 
महाराष्ट्र

मुख्‍यमंत्रींना शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यास वेळ नाही; किमान शब्द तरी पाळावा : खासदार खडसे

संजय महाजन

जळगाव : शेती नुकसानीचे पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट हेक्‍टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी असे मत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री नसताना औरंगाबाद येथे व्यक्त केले होते. आता मुख्यमंत्री असताना त्यांनी हा शब्द पाळावा. मात्र शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही; असा आरोप भाजप खासदार रक्षा खडसे यांनी केला आहे. (jalgaon-news-bjp-mp-raksha-khadse-cm-udhav-thakarey-target-farmer-help)

मुख्यमंत्री ज्या प्रमाणे शेतकऱ्यांशी बोलले त्याप्रमाणे मात्र ते वागत नाही. राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना ते आता सरसकट नुकसान भरपाई देत नाहीत. पंचनामे केल्यानंतर नुकसान भरपाई देण्यात येईल, असे आता सांगत आहेत. आता त्यानी आपण दिलेला शब्द पाळून नुकसान भरपाई द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

२५ वेळा पत्र दिले परंतु दखल नाही

राज्याचे मुख्यमंत्री शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करीत त्या म्हणाल्या, शेतकऱ्यांचे वीज हे सरकार कट करीत आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांचे वीज कट करू नये, याबाबतीत आपण स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादा भुसे यांना एक नव्हे तर तब्बल पंचवीस पत्रे लिहिली. परंतु त्याची ते दखल घेत नाहीत, असा आरोपही खासदार रक्षा खडसे यांनी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budgam Bus Accident Video: काश्मीरमध्ये पुन्हा भीषण दुर्घटना; BSF जवानांनी खचाखच भरलेली खोल दरीत कोसळली, ४ जणांचा मृत्यू

Israel - Hezbollah War : हिजबोल्ला-इस्त्राइलमध्ये युद्ध पेटलं, स्पेशल रिपोर्ट

Maharashtra News Live Updates : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित

Pune Crime : शाळकरी मुलीवर अत्याचार, इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं; 'गुड टच, बॅड टच'मुळं धक्कादायक घटना उघड

Nitin Gadkari: माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट, नितीन गडकरी यांनी सांगितला 'तो' प्रसंग

SCROLL FOR NEXT