बंडातात्या कराडकर Saam Tv
महाराष्ट्र

''वारी बाबत सरकारची भूमिका म्हणजे न्हाणिला बोळा आणि दरवाजा उघडा''

सरकार ने राजकीय कार्यक्रम, निवडणूक, जाहीर सभा या वर बंधने न घालता वारी वर बंधने घातल्याने आता वारकरी संतप्त झाले आहेत.

ओंकार कदम

सातारा: आषाढी वारी (Ashadhi Wari) बाबत सरकारची भूमिका म्हणजे न्हाणीला बोळा आणि दरवाजा उघडा अशी टीका बंडातात्या कराडकर यांची सरकार वर केली आहे. आळंदीतून 3 तारखेला वारकरी पायी वारीला सुरवात करणार असा ईशारा बंडातात्यांनी दिला आहे. कोरोनाच्या संकटामुळे अखंडपणे सुरू असणाऱ्या वारीला मागील वर्षी खंड पडला. परंतु या वर्षी वारकरी सरकारने वारीवर घातलेल्या बंधनामुळे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

सरकार ने राजकीय कार्यक्रम, निवडणूक, जाहीर सभा या वर बंधने न घालता वारी वर बंधने घातल्याने आता वारकरी संतप्त झाले आहेत. त्यामुळे सरकारने कोणतेही नियम घातले तरी 3 तारखेला आळंदी मधून पायी वारीला सुरवात होणार असल्याचा इशारा बंडातात्या कराडकर यांनी दिला आहे.

आषाढी वारी बाबत सरकारची भूमिका म्हणजे न्हाणीला बोळा आणि दरवाजा उघडा अशी असल्याचे देखील त्यांनी या वेळी बोलत असताना सांगितले आहे. अजूनही सरकारने किमान संख्येवर पायी चालण्यासाठी वारकऱ्यांना परवानगी द्यावी अन्यथा वारकऱ्यांच्या प्रचंड प्रक्षोभला आणि मोठ्या संख्येला समोर जाण्याशिवाय सरकारला पर्याय राहणार नाही असा इशारा सुद्धा बंडातात्या कऱ्हाडकर यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

SCROLL FOR NEXT