Rohit Pawar questions government on call surveillance saamtv
महाराष्ट्र

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

Rohit Pawar questions government on call surveillance: आता मंत्र्यांचेच फोन टॅप होत असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र हा दावा कुणी केलाय? आणि खरंच मंत्र्यांचे फोन टॅप होत आहेत का? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये.

Bharat Mohalkar

राज्यातील मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची चर्चा असतानाच रोहित पवारांनी मंत्र्यांचे फोन टॅप होत असल्याचा दावा केलाय. इतकच नाही तर फोन टॅपिंगमुळेच मंत्र्यांचे फोन नॉट रिचेबल असल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिलीय. खरंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना नाना पटोले, संजय राऊत, बच्चू कडू यांच्यासह मंत्रिमंडळातील नेत्यांचे तत्कालीन गुप्तचर विभागाच्या प्रमुख रश्मी शुक्ला यांच्या माध्यमातून फोन टॅप केल्याचा दावा केला जात होता. आता पुन्हा एकदा रोहित पवारांनी थेट मंत्र्यांचे फोन टॅप होत असल्याचा दावा केल्याने राऊतांनी सरकारवर टीकास्त्र सोडलंय.

तर मंत्र्यांचे फोन टॅपिंग सुरु असल्याचा दावा केल्याने सरकारची कोंडी झालीय.. मात्र विरोधकांनी केलेला दावा प्रसिद्धीसाठी असल्याचा टोला सत्ताधाऱ्यांनी लगावलाय. अनेक मुद्यांवरुन महायुतीत धुसफूस सुरु आहे. सरकारमध्ये एकनाथ शिंदेंची नाराजी लपून राहिली नाही. त्यातच आता मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा सुरु असतानाच फोन टॅपिंगची चर्चा सुरु झालीय. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करुन दूध का दूध आणि पानी का पानी होणार का? आणि मंत्र्यांमध्ये निर्माण होत असलेला अविश्वास कमी होण्यासाठी त्याचा फायदा होणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EVM: उंदराने भेदला स्ट्राँगरुमचा पहारा, स्ट्राँगरुमचा दरवाजा उघडला, राज्यात खळबळ

Prithviraj Chavan: 19 डिसेंबरला होणार मराठी पंतप्रधान'; पृथ्वीराज चव्हाणाचं वक्तव्य, राज्यात खळबळ

Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईतील स्थानिक गुंडांकडून भररस्त्यात पोलिसांवर हल्ला

IND vs SA 3rd T20I: भारतीय 'धुरंधरां'चा करिष्मा; ७ विकेट राखत टीम इंडियाचा शानदार विजय, मालिकेत २-१नं आघाडी

ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना बसणार मोठा धक्का; बड्या महिला नेत्या भाजपमध्ये प्रवेश करणार?

SCROLL FOR NEXT