राज्यातील वारकऱ्यांना मानधन देण्याचा शासनाचा विचार... भारत नागणे
महाराष्ट्र

राज्यातील वारकऱ्यांना मानधन देण्याचा शासनाचा विचार...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वारकरी संप्रदायातील गायक, वादक, कीर्तनकार‌आणि प्रवचनकार यांना ५ हजार रुपये मानधन

भारत नागणे

पंढरपूर : कोरोनाच्या Corona पार्श्वभूमीवर राज्यातील वारकरी संप्रदायातील गायक, वादक, कीर्तनकार‌आणि प्रवचनकार यांना ५ हजार रुपये मानधन देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असल्याची माहिती वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी दिली आहे.

यासंदर्भात काल सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख आणि महसूल मंत्री बाळासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये वारकरी साहित्य परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये वारकऱ्यांना प्रति महिना ५ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे राज्यभरातील धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम बंद आहेत.

हे देखील पहा-

याचा फटका कीर्तनकार ,प्रवचनकार, वादक आणि गायक अशा लोकांना बसला आहे. याबरोबरच फडकरी महाराज मंडळींचे कार्यक्रम बंद आहेत. यामुळे महाराज मंडळींवर उपासमारीची वेळ आली आहे. यासंदर्भात वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी महाराज मंडळींना प्रति महिना ५ हजार रुपये मानधन द्यावे, कलाकारांच्या मानधनात दुप्पट वाढ करावी.

यासह इतर प्रमुख मागण्या केल्या होत्या. या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. या बैठकीमध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी वारकऱ्यांना मानधन देण्याच्या प्रश्नाबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. यामुळे लवकरच आता राज्यातील महाराज मंडळींना दिलासा मिळणार असल्याचे विठ्ठल पाटील यांनी यावेळी सांगितले आहे.

Edited By- digambar jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दारूचे पैसे न दिल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण; घटना CCTVत कैद

Bus Accident : भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस १५ फूट खोल नदीत कोसळली, दोन जणांचा मृत्यू, २५ जण जखमी

Stamp Duty Government Decision: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, सर्वप्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे ₹500 चे मुद्रांक शुल्क माफ

Manoj Jarange: विठ्ठला... सरकारला सद्बुद्धी दे, मराठा आरक्षण लवकर मिळू दे, जरांगे पाटलांचे साकडे|VIDEO

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

SCROLL FOR NEXT