सरकारी बाबूंना पाहिजे पेन्शन योजना; संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आक्रमक पवित्रा  कैलास चौधरी
महाराष्ट्र

सरकारी बाबूंना पाहिजे पेन्शन योजना; संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आक्रमक पवित्रा

जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी आता महाराष्ट्रातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- कैलास चौधरी

उस्मानाबाद : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी आता महाराष्ट्रातील सर्व शासकीय, कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती च्या माध्यमातून 65 संघटनांनी एकत्र येत हे आंदोलन सुरू केले.

हे देखील पहा :

मुंबई येथून पेन्शन यात्रा सुरू करण्यात आली असून ती आज उस्मानाबाद येथे आली होती निमशासकीय, राजपत्रित अधिकारी, शिक्षक, प्राध्यापक, तलाठी, ग्रामसेवक, लीपिकवर्गिय, चतुर्थश्रेणी, कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी एकत्र येत हे आंदोलन सुरू केलं आहे.

यावेळी या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको करत मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. तत्पूर्वी राजमाता अहिल्यादेवी होळकर उड्डाण पुलापासून ते उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत रॅली काढून निषेध व्यक्त करण्यात आला.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: किल्ल्यावर तरुणांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली एक जखमी, टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल

GK: डावखुऱ्या लोकांचा मेंदू जास्त ॲक्टिव्ह का मानला जातो? जाणून घ्या कारणे

'मला I-Phone हवाच' बायको हट्टाला पेटली, नवऱ्याला शिवीगाळ करत छतावरून ढकललं

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

SCROLL FOR NEXT