महाराष्ट्र

वसईच्या पाचुबंदरमधून मच्छीमार बोटीसह खलाशी गायब, कस्टम व पोलिसांची शोध मोहिम

साम टिव्ही ब्युरो

>> चेतन इंगळे

वसई: वसई पाचूबंदर येथील एक मासेमारी बोट अचानक चोरीला गेल्याने सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. बोटीसोबत खलाशी देखील गायब झाले आहे. मत्स्य विभागाने कुठलेच सहकार्य न केल्याने मच्छिमार वर्गात संतप्त वातावरण आहे. (Mumbai News)

मिळालेल्या माहितीनुसार, पीटर पेद्रू डांबर यांच्या मालकीची सावपेद्रू नावाची बोट पाचूबंदर येथे किनाऱ्यावर ठेवली होती. मंगळवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत बोट जागेवर होती. मात्र त्यानंतर अचानक बोट गायब झाली. बोट गायब झाली त्यावेळी त्यावर विकास नावाचा खलाशी झोपला होता. तो सुद्धा गायब असल्याचे मालकाच्या लक्षात आले.  (Latest Marathi News)

घडलेला प्रकाराची माहिती पीटर यांनी मत्स्य विभागाचे सहायक आयुक्त दिनेश पाटील यांना दिली. तसेच त्यांच्याकडून काही सहकार्य मागितले. परंतु त्यांनी याबाबत असमर्थता दर्शवली. यानंतर वसई युवा बलचे अध्यक्ष व्हेलेन्टाईन मिरची यांनी बोट मालक, कुंटुबाला आधार देत वसई पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.

पोलिसांनी तक्रारीची दखल घेत तपास सुरु केला आहे. सदर बोट कुलाबा, श्रीवर्धन बाजूला गेल्याचा मच्छिमारांचा प्राथमिक अंदाज आहे. अशा पद्धतीने बोट गायब झाल्याची ही पहिलीच घटना आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राजन तेलींनी भाजप का सोडली? नारायण राणेंचे नाव घेत केला थेट आरोप

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीच जागा वाटप उद्या पूर्ण होणार

Maharashtra Assembly Election : नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का, गिरीश महाजन यांचा विश्वासू नेता तुतारीच्या वाटेवर

Rishabh Pant: शस्त्रक्रिया झालेल्या गुडघ्यालाच दुखापत, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला मुकणार पंत? BCCI ने दिली महत्त्वाची अपडेट

Assembly Election 2024: '५१, ००० रुपये द्या अन् आमदारकीचे तिकीट घ्या...', पक्षाने ठेवली अजब अट; इच्छुकांची कोंडी

SCROLL FOR NEXT