shivsena & bjp
shivsena & bjp Saam TV
महाराष्ट्र

BJP-Shivsena: 'अजूनही शिवसेनेनं भाजपबरोबर जावं असं सर्वांना वाटतंय'

गोविंद साळुंके, साम टीव्ही, शिर्डी

अहमदनगर : अजूनही शिवसेनेनं भाजपबरोबर जावं असं सर्वांना वाटतं असल्याच वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं आहे. मुंबई महानगरपालिकेत (BMC) रिपब्लिकन पक्षाला (Republican Party) 35 ते 40 जागा मिळाव्या असा आमचा प्रयत्न असुन यावेळी मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या हातातून हिसकून घेतला शिवाय राहणार नाही असंही केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Aathavale) म्हणाले ते आज अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर असुन दौऱ्या दरम्यान आठवले यांनी शिर्डीत पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर यावेळी टीका केली.

आम्हाला राज्यातील सरकार पाडायचे नाही -

ते म्हणाले, 'शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस (NCP and Congress) बरोबर गेल्याने जनता आणि शिवसैनिकांन मध्ये नाराज असुन अजूनही सर्वांना वाटत आहे की शिवसेनेनी भाजप बरोबर जावे. महाविकास आघाडी सरकार मधील आमदारांनावर कारवाई करून आम्हाला राज्यातील सरकार पाडायचे आहे, असा आरोप आमच्यावर केला जातोय. या आरोपात काही तथ्य नसल्याचे आठवले म्हणाले.

दरम्यान, नवाब मलिक (Nawab Malik) यांना अटक व्हायला नको होती. नवाब मलिक चांगला माणूस असुन चांगला प्रवक्ता आहे. मात्र त्यांचा जमिनीचा व्यवहार चांगला नाही. ईडीला मलिक यांच्या विरोधात पुरावे मिळाले असल्याने नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. या मध्ये आमच्या भाजप सरकारचा काही संबंध नसल्याचे यावेळी आठवले यांनी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dia Mirza : हँसता हुआ नूरानी चेहरा; काली ज़ुल्फ़ें रंग सुनहरा...

Skin Care Tips: चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे; जाणून घ्या

Maharashtra Politics: भाषणादरम्यान रोहित पवार ढसाढसा रडले, अजित पवारांनी भरसभेत केली नक्कल; VIDEO

Today's Marathi News Live : सोलापूरचं तापमान ४४.४ अंशावर, नागरिक उष्णतेने हैराण

Dehydration Treatment : 'या' ज्यूसचे सेवन केल्याने रखरखत्या उन्हात डि-हायड्रेशन पासून राहाल दूर

SCROLL FOR NEXT