Inflation  SaamTvNews
महाराष्ट्र

महागाईचा परिणाम; २९ टक्के भारतीय वळले कमी दर्जाच्या खाद्यतेलाकडे!

विशेष म्हणजे यात केवळ अल्प उत्पन्न गटातीलच नाही तर मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांचाही समावेश आहे.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : वाढत्या महागाईचे चटके सर्वसामान्यांना सोसावे लागत आहेत. महागाईमुळे (Inflation) सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे 29 टक्के भारतीय कमी दर्जाच्या खाद्यतेलाकडे (Edible Oil) वळल्याचं एका निष्कर्षात पुढं आलंय. विशेष म्हणजे यात केवळ अल्प उत्पन्न गटातीलच नाही तर मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांचाही समावेश आहे.

हे देखील पहा :

भारतीयांच्या आहारात खाद्यतेलाचं महत्त्व आहे. तेलाशिवाय स्वयंपाकघर अर्थवटचं मानलं जातं. मात्र, खाद्यतेलाचे दर सहा महिन्यात दुप्पट झाले. त्यामुळं सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट (Budget) कोलमडले आहे. परिणामी अनेकांनी ब्रॅण्डेड तेलाऐवजी कमी दर्जाचे तेल वापरणं सुरू केलंय. लोकल सर्कल या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब पुढं आलीय. देशभरातील 356 जिल्ह्यातील 36 हजाराहून अधिक नागरिक यात सहभागी झाले होते.

या सर्वेक्षणात तेल महागल्याने 24 टक्के लोकांनी तेलाचा वापर कमी केल्याचं आढळून आलं. तर 67 टक्के लोकांनी इतर खर्चातून बचत करत तेलाचा वापर तेवढाच ठेवला तर 21 टक्के भारतीयांनी कमी दर्जाच्या तेलाची निवड केल्याचं आढळून आलं. मात्र, या कमी दर्जाच्या तेलामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यामुळं खाद्यतेलाचे दर नियंत्रित होणं गरजेचे आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Monsoon hepatitis symptoms: पावसाळ्यात गर्भवती महिलांना हिपॅटायटीस संसर्गाचा धोका; 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Building Scam : ईडीची वसईत १२ ठिकाणी छापेमारी, माजी आयुक्तांच्या घरी टाकली धाड, नेमकं प्रकरण काय?

Walnut Benefits: दररोज ३ ते ४ अक्रोड खाल्ल्याने दूर होते आरोग्याची 'ही' त्रासदायक समस्या

Maharashtra Politics : माणिकराव, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतेय, अजित पवारांकडून राजीनाम्याचे संकेत

SCROLL FOR NEXT