Solapur Breaking : दीड वर्षांत 5 हजार लोकांना चावले कुत्रे SaamTvNews
महाराष्ट्र

Solapur Breaking : दीड वर्षांत 5 हजार लोकांना चावले कुत्रे

सोलापूर शहरातील भटक्या कुत्र्यांनी दीड वर्षात पाच हजारहून अधिक नागरिकांना चावा घेतल्याचं सोलापूर महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : सोलापूर शहरातील भटक्या कुत्र्यांनी दीड वर्षात पाच हजारहून अधिक नागरिकांना चावा घेतल्याचं सोलापूर महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. मात्र, या भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी पथक नसल्याचे महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागातून सांगण्यात येत आहे.

हे देखील पहा :

शहरातील अनेक भागात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. लोक शिळे अन्न रस्त्यावर टाकून देतात. चायनीज गाडे, हॉटेल चालक, मांस-मच्छी विक्रेते शिल्लक मांस रस्त्यावरच टाकून देतात. यातून भटकी कुत्री अधिक हिंस्र होत असल्याचे प्राणीमित्रांचे म्हणणे आहे.

महापालिकेने दोन वर्षांपूर्वी भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी चार ते पाच जणांचे पथक नेमले होते. पुढचा-मागचा विचार न करता या कामगारांना अचानक काढून टाकण्यात आले. पशुवैद्यकीय विभागाकडे सध्या केवळ एक कामगार असल्याचे सांगण्यात येते. हा एकटा माणूस शहरातील कुत्र्यांचा कसा बंदोबस्त करणार, असा सवाल नगरसेवकांमधून उपस्थित होत आहे.B

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रात 21 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे झाली नियुक्ती?

Rashi Bhavishya: वैशाख पौर्णिमेला करिअर अन् पैशांत होणार मोठी वाढ, या राशींचे नशीब चमकणार; वाचा शुक्रवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रातील माणसाने फक्त मराठीमध्ये बोलावं - राज ठाकरे

Supriya Sule: यापुढे पवारांविरोधात लढणार नाही, दुसरा मतदारसंघ शोधेन; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

Raj Thackeray Speech : राजकीय नेत्यांमुळं महाराष्ट्राचं वाटोळं; राज ठाकरेंचा जोरदार प्रहार

SCROLL FOR NEXT